शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गावात सतत मारहाण, अपमानाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 11:34 IST

गावात काही जणांकडून सतत होणारा अपमान, मारहाणीला कंटाळून युवकाने गळफास घेत आत्महत्या केली.

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हामृतदेह वडकी पोलीस ठाण्यात नेला

यवतमाळ : त्यांच्याकडून सतत मारहाण केली जाते, माझे गावात राहणे कठीण झाले आहे, म्हणून मी जीवन संपवत आहे, अशी चिठ्ठी लिहून युवकाने गळफास घेत जीवन संपवले. ही घटना वडकी (ता. राळेगाव) येथे मंगळवारी घडली. दरम्यान, गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृतदेह वडकी पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय भास्कर आडे (२८, रा. वडकी) असे मृताचे नाव आहे. त्याने स्वत:च्या घरातच गळफास लावला. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने ज्या लोकांकडून मारहाण आणि त्रास होत होता त्यांची नावे नमूद केली. याच आधारे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडकी पोलीस ठाण्यालगतच अजयचे घर आहे. तेथून जवळच राहत असलेल्या लोकांकडून त्याला त्रास होत होता.

शवविच्छेदन केल्यानंतर अजयचा मृतदेह पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. पोलिसांनी तेथून अर्ध्या तासातच चिठ्ठीत नावे असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे काही वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दोघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे करीत आहेत.

अशी आहे आरोपींची नावे

अजय भास्कर आडे याच्या आत्महत्येप्रकरणी प्रेमिला भास्कर आडे यांनी तक्रार नोंदविली. यानुसार सुजल भीमा सलाम (२५), पिंटू धुर्वे (४०), राेहित पिंटू धुर्वे (२२), अक्षय सुनील आडे (२४), गौरव सुरेश येलके (२४), अनिल करपते, प्रतीक धुर्वे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल व प्रतीक घटनेपासून फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू