शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

यवतमाळला पहिल्यांदाच चार मंत्री; विधानसभेला युतीचे वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 14:18 IST

आतापर्यंत काँग्रेस व नंतर आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तिघांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता

यवतमाळ : राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच जिल्ह्यातील चौघांचा समावेश झाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्याला चार मंत्रीपदे मिळाली आहे. प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने भाजप-शिवसेना युतीने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

आतापर्यंत काँग्रेस व नंतर आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तिघांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्यात मनोहरराव नाईक, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके यांचा समावेश होता. अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात जिल्ह्याला सातत्याने दोन ते तीन मंत्रीपदे मिळत होती. मात्र, यावेळी भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा केवळ दोघांनाच राज्यमंत्रीपद मिळू शकले होते. त्यात भाजपचे मदन येरावार आणि शिवसेनेचे संजय राठोड यांचा समावेश होता. या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रीपद सोपविले होते. मात्र दोघेही राज्यमंत्री होते. जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले होते. 

मंत्रिमंडळाच्या विस्तारात युतीने राळेगावचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले शिवसेनेचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा थेट कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश केला. युतीच्या काळात पहिल्यांदाच जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपद आता लाभले आहे. या दोन मंत्र्यांमुळे युतीच्या जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात जिल्ह्याला चार मंत्री लाभले आहे. यातून भाजप-शिवसेना युतीने जिल्ह्यावर आपली पकड आणखी घट्ट करण्याची व्यूहरचना आखल्याचे दिसून येत आहे. 

तब्बल सहा जण मंत्री, राज्यमंत्री या चार मंत्र्यांशिवाय दोघांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामजू पवार यांचा समावेश आहे. यामुळे युतीच्या कार्यकाळात जिल्ह्याला मंत्री व मंत्रीपदाचा दर्जा असलेले सहा चेहरे मिळाले आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात जिल्ह्याची ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे. 

प्राचार्य डॉ. अशोक उईकेराळेगावचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक रामाजी उईके यांचा मंत्रिमंडळ विस्तारात थेट कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. त्यापूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रा.डॉ. उईके यांनी राळेगाव मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रा. पुरके यांना लढत दिली होती. मात्र दोनदा त्यांना अपयश आले. तथापि त्यांनी तिसºयांदा भाजपच्या उमेदवारीवर प्रा. पुरके यांचा पराभव केला. दरम्यान प्रा.डॉ.उईके हे बुलडाणा जिल्ह्यात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी गेली १५ वर्ष सातत्याने राळेगाव विधानसभा मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवला होता. 

प्रा.डॉ. तानाजी सावंतउस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण व साखर सम्राट म्हणून ओळख असलेले प्रा.डॉ. तानाजी सावंत यांना शिवसेनेने २०१६ मध्ये प्रथमच यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून उमेदवारी बहाल केली. या संधीचा पुरेपूर लाभ घेत प्रा.डॉ. सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांचा पराभव करून विधान परिषद गाठली. अवघ्या दोन वर्षातच शिवसेनेने त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली. तत्पूर्वी त्यांची शिवसेनेचे उपनेते म्हणून निवड झाली होती. त्याच प्रमाणे शिवसेनेचे उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. शिव जलक्रांतीच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यात पाणी वाचविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. या उपाययोजनांनी प्रभावित होऊनच शिवसेनेने त्यांना प्रथम आमदार व आता मंत्रिपदाची संधी दिल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारYavatmalयवतमाळ