शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

यवतमाळ जिल्हा; अखेर २९ शेतकऱ्यांना ७ लाखांची विमा भरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:41 AM

दारव्हा तालुक्यात खरीप २०१७ चा पीकविमा मंजूर असताना आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे २९ शेतकऱ्यांची अडकलेली सहा लाख ९३ हजार ८९६ रुपये नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देपाठपुराव्याला यशदोन दिवसात रक्कम मिळणार

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दारव्हा तालुक्यात खरीप २०१७ चा पीकविमा मंजूर असताना आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे २९ शेतकऱ्यांची अडकलेली सहा लाख ९३ हजार ८९६ रुपये नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. वरील रक्कम कंपनीकडून बँकेला प्राप्त झाली असून दोन दिवसात ती शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे.याविषयी सुरुवातीला कोणतीही हालचाल झाली नव्हती. विम्याच्या प्रीमियमची रक्कम परत करण्याचा पर्याय समोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परंतु लोकमतने शेतकऱ्यांचा हा प्रश्न लावून धरल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा प्रशासनाने दखल घेत विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यानंतर आता त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दारव्हा शाखेंतर्गत २२ ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यापैकी १९ संस्थांना नियमित कर्ज वाटप झाले. या संस्थांमध्ये ४८९ नियमित कर्जदार सभासद असून त्यांच्या ८५७.१९ हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी विमा काढण्यात आला होता. संबंधित संस्थांनी विमा प्रस्ताव तयार करून बँकेला सादर केले. त्यापोटी येणारी १४ लाख ५८ हजार रुपये प्रीमियमची रक्कम संस्था कर्ज नावे करून बँकेच्या पीक विमा खात्यात वर्ग करण्यात आली. त्यानंतर बँकेच्या वतीने नियमित सभासदांचे कामकाज ऑफलाइन पोर्टलवर करण्यात आले. परंतु १० ग्राम विकास विविध कार्यकारी संस्थेमधील ३० सभासदांची यादी बँकेत सादर करताना आधार कार्ड क्रमांक सोबत न दिल्यामुळे ऑफलाइन पोर्टलवर ती नावे स्वीकारली नाही. परंतु या सभासदांच्या प्रीमियमची रक्कम मात्र विमा कंपनीकडे जमा होती. यामधील २९ सभासद पीक विमा भरपाईस पात्र असून त्यांची नुकसान भरपाईची रक्कम सहा लाख ९३ हजार ८९६ एवढी असल्याचा अहवाल देखील बँकेच्या जिल्हा कार्यालयाला पाठविण्यात आला होता.परंतु तरीसुद्धा कंपनीकडून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नव्हती. लोकमतने हा विषय उचलून धरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा केला. कंपनीने राज्य शासन व केंद्र शासनाचा भरपाईचा हिस्सा मिळण्याकरिता त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. दरम्यान बँकेचा पाठपुरावा चालूच होता. शासनाकडून प्रस्ताव मंजूर होऊन आल्यानंतर कंपनीने भरपाईची रक्कम बँकेकडे वर्ग केली.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणअडकलेली पिकविमा नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याची सूचना केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी या प्रश्नाची दखल घेत यासाठी स्वतंत्र बैठक घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वसंतराव घुईखेडकर, प्रकाश मानकर व प्रा शिवाजी राठोड यांनीसुद्धा संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला. परंतु बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व घडामोडीचे वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित झाल्यानंतर या प्रयत्नाला गती आली. त्यामुळेच न्याय मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून विम्याची रक्कम मंजूर झाल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी