शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दोनशे रुपयासाठी स्टेट बँकेला साडेतीन हजारांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2022 15:49 IST

यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचा आदेश

यवतमाळ : खातेदाराकडून २०० रुपये वसूल करण्याचा प्रयत्न भारतीय स्टेट बँकेला चांगलाच अंगलट आला. भरपाई म्हणून आता या खातेदाराला तीन हजार २०० रुपये व्याजासह द्यावे लागणार आहेत. नागपूर येथील सेवानिवृत्ताने दाखल केलेल्या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे या बँकेला चांगली चपराक बसली आहे.

नागपूर येथील बेसा भागातील वसुंधरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीत वास्तव्याला असलेले महादेव बारकूजी रोकडे यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या यवतमाळ येथील उमरसरा शाखेत खाते आहे. त्यांनी या खात्याचा एक लाख रुपयाचा धनादेश यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नागपूर येथील देवनगर शाखेच्या नावाने दिला होता. स्टेट बँकेने हा धनादेश वटविण्यासाठी न टाकताच रोकडे यांना परत केला. एवढेच नव्हेतर त्यांच्यावर २०० रुपये दंड बसविण्यात आला.

महादेव रोकडे यांनी या प्रकाराविषयी बँकेशी वारंवार पत्रव्यवहार केला. त्यावर समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात १० मे २०१९ रोजी तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यात रोकडे यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला.

स्टेट बँकेच्या उमरसरा शाखेने महादेव रोकडे यांना तक्रार झाल्यापासून २०० रुपये सात टक्के व्याजासह परत द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी एक हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे दोन हजार रुपये द्यावेत असा आदेश आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या मनमानी आदेशाला चपराक बसली आहे.

बँकेने चूक केली

ग्राहकाच्या खात्यात धनादेश वटविला जाईल एवढी रक्कम शिल्लक होती. त्यामुळे या प्रकरणात त्यांची कुठलीही चूक नाही. अशा परिस्थितीत बँकेने दंड आकारण्याचा अधिकार नव्हता. बँकेने २०० रुपये दंड आकारून चूक केली आहे, असे मत ग्राहक आयोगाने नोंदविताना तक्रारदार नुकसानभरपाईसाठी पात्र असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाconsumerग्राहकnagpurनागपूरYavatmalयवतमाळ