शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पाण्यासाठी महिला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:20 IST

शहरासह लगतच्या ग्रामीण भागातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने यवतमाळ शहरातील महिलांनी नगरपरिषदेवर तर लगतच्या डोर्ली येथील महिलांनी जिल्हा कचेरीवर सोमवारी धडक दिली.

ठळक मुद्देकाँग्रेसचा नगर परिषदेवर तर डोर्लीवासीयांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासह लगतच्या ग्रामीण भागातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने यवतमाळ शहरातील महिलांनी नगरपरिषदेवर तर लगतच्या डोर्ली येथील महिलांनी जिल्हा कचेरीवर सोमवारी धडक दिली.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात टँकर पोहोचत नाही. त्यामुळे एक ड्रम पाण्यात संपूर्ण कुटुंबाला १५ दिवस काढावे लागते. नगरपरिषद व प्रशासनाने तत्काळ पाण्याची व्यवस्था करावी, यासाठी काँग्रेस महिला आघाडीच्या नेतृत्वात नगरपरिषदेवर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी महिलांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठिय्या दिला. या आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे यांनी केले. जनतेची समस्या घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्यांचा आवाज पालकमंत्री दडपत आहे. आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात पारस अराठे, नगरसेवक पल्लवी रामटेके, ललित जैन, मनीष बोनकिले, प्रशांत शेटे, सागर सूर्यवंशी, नीलेश बावणकर, शुभम बावणकर, शुभम जयस्वाल, ताराबाई नारायणे, कविता नागपुरे, विजया कास्टकर, दीपा पाटे, वर्षा खत्री, सारिका बोरकर, शीतल नागोसे सहभागी झाल्या होत्या.भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या सर्कलमधील डोर्ली गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या एका युवकाने चक्क खासदार निधीतील बोअरवेलवर अतिक्रमण करून पाण्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे येथील महिला संतप्त झाल्या. त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. पोलिसांनी त्यांना तिरंगा चौकातच अडविले. या मोर्चाचे नेतृत्व प्रवीण काळे यांनी केले. शेकडो महिला हातात रिकामे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ जिल्हा परिषद सीईओंना दूरध्वनी करून अभियंत्यांकडून अहवाल मागण्याचे निर्देश दिले. या आंदोलनात विजया डुमारे, लीलाबाई मेश्राम, मीराबाई काकडे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या दोन आंदोलनाने पाणीटंचाईची तीव्रता अधोरेखित केली.नगराध्यक्षांऐवजी अधीक्षकाला निवेदननगरपरिषदेत काँग्रेस महिला आघाडीने पाण्यासाठी सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्या महिला पालिकेत दाखल झाल्या तेव्हापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत नगराध्यक्ष कांचन चौधरी आपल्या कक्षात उपस्थित होत्या. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याऐवजी पालिकेतील अधीक्षक मनोहर गुल्हाने यांना निवेदन दिले. मुख्याधिकारी अनिल अढागळे हे बेंबळा प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. आंदोलकांनी दुपारी ४ वाजता गुल्हाने यांना निवेदन देऊन आपल्या आंदोलनाची सांगता केली. आपल्या कक्षात नगराध्यक्ष उपस्थित असतानाही आंदोलकांनी पालिकेतील एका कर्मचाऱ्याला निवेदन दिले. या प्रकाराची पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.