शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

पाण्यासाठी महिला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:20 IST

शहरासह लगतच्या ग्रामीण भागातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने यवतमाळ शहरातील महिलांनी नगरपरिषदेवर तर लगतच्या डोर्ली येथील महिलांनी जिल्हा कचेरीवर सोमवारी धडक दिली.

ठळक मुद्देकाँग्रेसचा नगर परिषदेवर तर डोर्लीवासीयांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासह लगतच्या ग्रामीण भागातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने यवतमाळ शहरातील महिलांनी नगरपरिषदेवर तर लगतच्या डोर्ली येथील महिलांनी जिल्हा कचेरीवर सोमवारी धडक दिली.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात टँकर पोहोचत नाही. त्यामुळे एक ड्रम पाण्यात संपूर्ण कुटुंबाला १५ दिवस काढावे लागते. नगरपरिषद व प्रशासनाने तत्काळ पाण्याची व्यवस्था करावी, यासाठी काँग्रेस महिला आघाडीच्या नेतृत्वात नगरपरिषदेवर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी महिलांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठिय्या दिला. या आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे यांनी केले. जनतेची समस्या घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्यांचा आवाज पालकमंत्री दडपत आहे. आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात पारस अराठे, नगरसेवक पल्लवी रामटेके, ललित जैन, मनीष बोनकिले, प्रशांत शेटे, सागर सूर्यवंशी, नीलेश बावणकर, शुभम बावणकर, शुभम जयस्वाल, ताराबाई नारायणे, कविता नागपुरे, विजया कास्टकर, दीपा पाटे, वर्षा खत्री, सारिका बोरकर, शीतल नागोसे सहभागी झाल्या होत्या.भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या सर्कलमधील डोर्ली गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या एका युवकाने चक्क खासदार निधीतील बोअरवेलवर अतिक्रमण करून पाण्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे येथील महिला संतप्त झाल्या. त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. पोलिसांनी त्यांना तिरंगा चौकातच अडविले. या मोर्चाचे नेतृत्व प्रवीण काळे यांनी केले. शेकडो महिला हातात रिकामे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ जिल्हा परिषद सीईओंना दूरध्वनी करून अभियंत्यांकडून अहवाल मागण्याचे निर्देश दिले. या आंदोलनात विजया डुमारे, लीलाबाई मेश्राम, मीराबाई काकडे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या दोन आंदोलनाने पाणीटंचाईची तीव्रता अधोरेखित केली.नगराध्यक्षांऐवजी अधीक्षकाला निवेदननगरपरिषदेत काँग्रेस महिला आघाडीने पाण्यासाठी सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्या महिला पालिकेत दाखल झाल्या तेव्हापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत नगराध्यक्ष कांचन चौधरी आपल्या कक्षात उपस्थित होत्या. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याऐवजी पालिकेतील अधीक्षक मनोहर गुल्हाने यांना निवेदन दिले. मुख्याधिकारी अनिल अढागळे हे बेंबळा प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. आंदोलकांनी दुपारी ४ वाजता गुल्हाने यांना निवेदन देऊन आपल्या आंदोलनाची सांगता केली. आपल्या कक्षात नगराध्यक्ष उपस्थित असतानाही आंदोलकांनी पालिकेतील एका कर्मचाऱ्याला निवेदन दिले. या प्रकाराची पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.