शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

झिरो मशागत शेतीने उत्पन्नाच्या धनराशी; शेतीची पोत सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न

By रूपेश उत्तरवार | Updated: October 25, 2022 14:12 IST

वाहून जाणारी माती आता शेतातच, पोत सुधारला उत्पन्नही वाढले

यवतमाळ : शेती करताना विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने मशागतीवर सर्वाधिक खर्च होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने त्यामध्ये आणखीच भर पडली आहे. शेतीची मशागत न करता बेड पद्धतीने झिरो मशागत शेती करताना उत्पन्नाच्या राशी शेतकऱ्यांच्या घरात आल्या आहेत. या यशस्वी प्रयोगाला एक तपानंतर वेगळी ओळख मिळाली आहे. शिक्षक शेतकऱ्याने केेलेला हा प्रयोग जिल्ह्यात पाय रोवत आहे.

यवतमाळातील नौशाद खान यांची वाई हातोला येथे शेती आहे. या शिक्षकाने आपल्या शेतशिवारात झिरो मशागत शेतीचा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे दहा ते बारा वर्षांपासून याच पद्धतीचा अवलंब करीत त्यांनी विक्रमी उत्पादन आपल्या शेतात घेतले आहे. उत्पन्नाची ही वेगळी तऱ्हा पाहून इतरही शेतकरी या प्रयोगाकडे वळत आहेत.

झिरो मशागत पद्धतीमध्ये दरवर्षी नांगरणी करण्याचे कामच नाही. यामध्ये एक वेळेस बेड तयार करून त्यावर पिकाची लागवड करता येते. निघालेल्या पिकाचा अवशेष दोन बेडमध्ये अंतरामध्ये कुजविला जातो. इतर वेळेस तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रित केले जाते. दरवर्षी मशागत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब निर्माण झाला आहे. याशिवाय गांडुळाचे प्रमाणही जमिनीत वाढले आहे. अधिक पाऊस आला तर सऱ्यांच्या माध्यमातून पाणी वाहून जाते. कमी पाऊस आला तर बेड पद्धतीमध्ये ओलावा टिकून राहतो. यामुळे पिकाचे उत्पन्न वाढण्यासोबतच जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मिळण्यात लाभ झाला आहे. याशिवाय शेतीमधील मशागतीचा खर्चही वाचला आहे. विशेष म्हणजे सुपीक मातीचा थर शेतातून वाहून जाण्याचे प्रमाण थांबले आहे.

एका एकरामध्ये अडीचशे क्विंटल हळद

या पद्धतीमध्ये शेतकऱ्याने एका एकरात अडीचशे क्विंटल ओली हळद घेतली. वाळून ती ५१ क्विंटल झाली. याशिवाय दोन एकरात ११० टन पपई, एका एकरात १६ क्विंटल, तूर यामध्ये मुख्य पीक तूरच होते. अंतरपीक नव्हते. एका एकरात १३ क्विंटल कापूस, ३५ टन टरबूज, १८ टन खरबूज असे उत्पन्न घेतले आहे.

इतर शेतकरी पीक पद्धतीकडे वळले

झिरो मशागत पद्धतीने बेडवर सोयाबीन असेल तर ते काढून हरभरा लावता येते. याच बेडवर टरबूजही लावता येते. यामुळे मशागतीचा खर्च होत नाही. या ठिकाणी पिकाचे अवशेष हळूहळू कुजतात. यामुळे पिकाच्या अवशेषापासून खत तयार होते. यातून जिल्ह्यात झिरो मशागत पद्धती वाढत चालली आहे.

या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला वाईसाठी लागणारा खर्च वाचविता येतो. यातून आर्थिक बचत होते. जमिनीची सुपिकता सुधारते. मी १२ वर्षांपासून हा प्रयोग करीत आहे. यात नुकसान नाही. अनेकांनी यानुसार अवलंब सुरू केला आहे.

- नौशाद खान, वाई हातोला

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीSocialसामाजिक