शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

झिरो मशागत शेतीने उत्पन्नाच्या धनराशी; शेतीची पोत सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न

By रूपेश उत्तरवार | Updated: October 25, 2022 14:12 IST

वाहून जाणारी माती आता शेतातच, पोत सुधारला उत्पन्नही वाढले

यवतमाळ : शेती करताना विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने मशागतीवर सर्वाधिक खर्च होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने त्यामध्ये आणखीच भर पडली आहे. शेतीची मशागत न करता बेड पद्धतीने झिरो मशागत शेती करताना उत्पन्नाच्या राशी शेतकऱ्यांच्या घरात आल्या आहेत. या यशस्वी प्रयोगाला एक तपानंतर वेगळी ओळख मिळाली आहे. शिक्षक शेतकऱ्याने केेलेला हा प्रयोग जिल्ह्यात पाय रोवत आहे.

यवतमाळातील नौशाद खान यांची वाई हातोला येथे शेती आहे. या शिक्षकाने आपल्या शेतशिवारात झिरो मशागत शेतीचा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे दहा ते बारा वर्षांपासून याच पद्धतीचा अवलंब करीत त्यांनी विक्रमी उत्पादन आपल्या शेतात घेतले आहे. उत्पन्नाची ही वेगळी तऱ्हा पाहून इतरही शेतकरी या प्रयोगाकडे वळत आहेत.

झिरो मशागत पद्धतीमध्ये दरवर्षी नांगरणी करण्याचे कामच नाही. यामध्ये एक वेळेस बेड तयार करून त्यावर पिकाची लागवड करता येते. निघालेल्या पिकाचा अवशेष दोन बेडमध्ये अंतरामध्ये कुजविला जातो. इतर वेळेस तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रित केले जाते. दरवर्षी मशागत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब निर्माण झाला आहे. याशिवाय गांडुळाचे प्रमाणही जमिनीत वाढले आहे. अधिक पाऊस आला तर सऱ्यांच्या माध्यमातून पाणी वाहून जाते. कमी पाऊस आला तर बेड पद्धतीमध्ये ओलावा टिकून राहतो. यामुळे पिकाचे उत्पन्न वाढण्यासोबतच जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मिळण्यात लाभ झाला आहे. याशिवाय शेतीमधील मशागतीचा खर्चही वाचला आहे. विशेष म्हणजे सुपीक मातीचा थर शेतातून वाहून जाण्याचे प्रमाण थांबले आहे.

एका एकरामध्ये अडीचशे क्विंटल हळद

या पद्धतीमध्ये शेतकऱ्याने एका एकरात अडीचशे क्विंटल ओली हळद घेतली. वाळून ती ५१ क्विंटल झाली. याशिवाय दोन एकरात ११० टन पपई, एका एकरात १६ क्विंटल, तूर यामध्ये मुख्य पीक तूरच होते. अंतरपीक नव्हते. एका एकरात १३ क्विंटल कापूस, ३५ टन टरबूज, १८ टन खरबूज असे उत्पन्न घेतले आहे.

इतर शेतकरी पीक पद्धतीकडे वळले

झिरो मशागत पद्धतीने बेडवर सोयाबीन असेल तर ते काढून हरभरा लावता येते. याच बेडवर टरबूजही लावता येते. यामुळे मशागतीचा खर्च होत नाही. या ठिकाणी पिकाचे अवशेष हळूहळू कुजतात. यामुळे पिकाच्या अवशेषापासून खत तयार होते. यातून जिल्ह्यात झिरो मशागत पद्धती वाढत चालली आहे.

या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला वाईसाठी लागणारा खर्च वाचविता येतो. यातून आर्थिक बचत होते. जमिनीची सुपिकता सुधारते. मी १२ वर्षांपासून हा प्रयोग करीत आहे. यात नुकसान नाही. अनेकांनी यानुसार अवलंब सुरू केला आहे.

- नौशाद खान, वाई हातोला

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीSocialसामाजिक