शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

सर्वच प्रकारचे मातृत्व सन्माननीय का मानू नये ?

By admin | Updated: March 18, 2016 02:34 IST

या जिल्ह्यातील कुमारी मातांचा प्रश्न राज्यभरात चर्चिला जात आहे. पण, सर्वच प्रकारचे मातृत्व सन्माननीय का मानू नये?

श्रीपाल सबनीस : कुमारी मातांचा प्रश्न अस्वस्थ करणारा, स्वतंत्र विदर्भानेही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही अविनाश साबापुरे यवतमाळ या जिल्ह्यातील कुमारी मातांचा प्रश्न राज्यभरात चर्चिला जात आहे. पण, सर्वच प्रकारचे मातृत्व सन्माननीय का मानू नये? विवाहितेचे मातृत्व सन्माननीय मानले जाते, तसे विधवेचे-कुमारिकेचे मातृत्व सन्मानीय का मानण्यात येत नाही, असा गंभीर प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला.घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे आयोजित फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलनासाठी आले असता सबनीस यांनी ‘लोकमत’शी विविध विषयांवर बातचित केली. मागास समजला जाणारा समाजघटक आज कुमारी मातांचे, त्यांच्या मुलांचे पालनपोषण तरी करीत आहे. पण सुशिक्षित म्हणवून घेणारा समाज तर गर्भातच मुलींना मारतोय. मग खरे मागास कोण? कुमारी माता, भ्रूणहत्या या प्रश्नांकडे निकोप दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या आत्महत्या ही काही यवतमाळ जिल्ह्यासाठी भूषणावह बाब नाही. स्थानिक नेते आणि राज्य-केंद्र सरकारचा हा जसा पराभव आहे; तसाच तो समाजाचाही पराभव आहे. आज शेतकऱ्यांप्रती प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव होणे आवश्यक आहे. साहित्यातून शेतकऱ्यांविषयी आजवर अनेकदा लिहिले गेले. पण ते लिखाण त्या-त्या साहित्यिकाच्या कुवतीइतकेच होते. शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही पाहिजे तसे साहित्यातून उमटलेले नाही. जिथे तीन-तीन वर्षे हिरवळच पाहायला मिळत नाही, तेथे निसर्गकविता काय कामाच्या? असा प्रश्न श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. पाण्यासाठी जनावरांचे हाल होत आहेत. त्यांना बोलता आले असते तर एका-एका जनावराची एकेक महाकथा लिहिली गेली असती. आज शेतकऱ्यांच्या मरणाचे भांडवल केले जात आहे. नेते, कलावंत, साहित्यिक आणि प्रसिद्धीमाध्यमेही त्यातच स्वत:ची प्रतिष्ठा शोधत आहे, अशी टीका त्यांनी केली. आत्महत्या थांबविण्यासाठी तुटपुंजी आर्थिक मदत हा पर्याय नव्हे. त्यासाठी कायमस्वरुपी नियोजन हवे आहे आणि सरकार ते करू शकत नाही. त्यांना पाच वर्षे राहून पुन्हा सत्ता मिळवायची आहे. कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नक्षलभत्ता मिळाला पाहिजे. अन्यथा आज मरणारेच उद्या मारायला उठतील. पण सध्या शासन स्वत:च भांडवलदार झाले. सरकारला टॅक्स हवा की माणसं? असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.वेगळा विदर्भ होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. देशाचे तुकडे करण्यापेक्षा सत्तेचे, पैशाचे, अधिकारांचे विकेंद्रीकरण करा. विदर्भवाद्यांबद्दल आपल्याला आदर आहे. पण वेगळ्या विदर्भाची चळवळ ही मोजक्या डोक्यांची चळवळ आहे. त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाला लुटले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच विदर्भाचा विकास करू शकते. त्यासाठी उपोषण करणार असाल, तर मीही तुमच्यासोबत येईल, असे सबनीस यांनी सांगितले.