शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

जिल्ह्यातून ‘कॅबिनेट’पदी बढती कुणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 8:56 PM

भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे.

ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्ताराचे वेध : मदन येरावार की संजय राठोड?, लोकसभेतील ‘परफॉर्मन्स’ उपयोगी ठरणार

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे.युती सरकारची साडेचार वर्ष संपली. परंतु अलिकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या झालेल्या घोषणा केवळ फार्स ठरल्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराचे फारसे कुणाला अप्रूप राहिलेले नाहीत. कित्येकांनी तर आता या विस्ताराचा नादही सोडला आहे. काहींना हे पद मिळाले तरी नका आहे, तीन महिन्यात काय ‘परफॉर्मन्स’ दाखवायचा असा त्यांचा सवाल आहे. आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात भाजपकडून मदन येरावार तर शिवसेनेकडून संजय राठोड राज्यमंत्री आहेत. या दोघांपैकी कुणाला कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे कार्यकर्ते येरावारांना तर शिवसैनिक राठोडांना कॅबिनेट पक्के असल्याचे सांगत आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्याकडील अन्न व औषधी प्रशासन या खात्याची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मदन येरावार यांच्याकडे कालपर्यंत सोपविण्यात आली होती. ते पाहता त्यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. मंत्र्यांना बढती मिळते की केवळ त्यांच्याकडील खात्यांमध्ये फेरबदल केला जातो, हे पाहणेही महत्वाचे ठरते.राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील ‘परफॉर्मन्स’ पाहिला जाणार असल्याचे सांगितले जाते. त्याचा विचार केल्यास शिवसेनेच्या भावना गवळी यांना यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून ३७ हजार मतांची आघाडी देणारे भाजपचे मदन येरावार ‘प्लस’ ठरतात. शिवसेनेचे संजय राठोड यांनीही आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून भावनातार्इंना मतांची आघाडी मिळवून दिली. परंतु २०१४ च्या तुलनेत ही आघाडी साडेआठ हजाराने कमी झाली आहे. इकडे यवतमाळात ३७ हजारांच्या मतांच्या आघाडीत शिवसेनेचाच वाटा अधिक आहे, भाजप सक्रिय नव्हते असा दावा सेनेच्या गोटातून केला जात आहे. तर तिकडे दिग्रसमध्ये भावनातार्इंना मिळालेल्या मतांच्या आघाडीत भाजपचाही समान वाटा असल्याचे कार्यकर्ते सांगत आहे. अशीच स्थिती उमरखेड मतदार संघात आहे. त्यामुळे कुठे कुणी कुणाचे काम केले हा राजकीय दृष्ट्या संशोधनाचा विषय ठरला आहे.वणीतील ‘परफॉर्मन्स’ अदखलपात्रवणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना लोकसभेत भाजप उमेदवारासाठी केवळ दोन हजार मतांची आघाडी खेचून आणता आल्याने त्यांचा ‘परफॉर्मन्स’ पक्षाच्या नजरेत अदखलपात्र ठरतो आहे. गेल्या वेळी भाजप उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या आघाडीत वणीमध्ये ५० हजारांवर मतांनी घट झाली आहे. त्यामुळे आमदार बोदकुरवार यांचा ‘परफॉर्मन्स’ ‘मायनस’मध्ये जात असल्याचे स्पष्ट आहे.उमरखेड, आर्णीचाही परफॉर्मन्स जोरदारकेवळ लोकसभेतील कामगिरीचा विचार केल्यास उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने, आर्णीचे आमदार राजू तोडसाम हेसुद्धा सरस ठरतात. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला अनुक्रमे ४२ हजार व ५७ हजार मतांची आघाडी मिळवून दिली.आदिवासी कोट्यातून अशोक उईकेंची चर्चाराळेगावचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. मात्र आदिवासी समाजातील विद्यमान नावात काही फेरबदल करायचे झाले तरच उईकेंचा प्राधान्याने विचार होऊ शकतो, असे सांगितले जाते. या लोकसभा निवडणुकीत भावनातार्इंचे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील गतवेळचे सर्व पाठीराखे यावेळी उघडपणे काँग्रेससोबत असतानाही सेनेला २८ हजार मतांची आघाडी मिळाली. यात उईके यांचा मोठा वाटा आहे. लोकसभेतील त्यांची ही कामगिरी मंत्रीपदावरील वर्णीच्या दृष्टीने महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर शिवसेनेची नजरयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा विजयी झाल्या. मोदी लाटेने त्यांना यावेळीही तारले. ज्येष्ठ खासदारांमध्ये वरच्या क्रमांकावर असल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र यावेळी ‘२० खासदारांमागे एक मंत्रीपद’ असा कोटा भाजपने ठरविल्यामुळे सेनेच्या वाट्याला केवळ एक मंत्रीपद आले आणि तेही मुंबईत स्थिरावले. लगतच्या भविष्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही व संख्याबळामुळे सेनेच्या वाट्याला आणखी मंत्रिपद येण्याची शक्यता कमीच आहे. सेनेने आता लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर दावा ठोकला आहे. या पदावर ज्येष्ठ असलेल्या भावनातार्इंची वर्णी लागते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मला मंत्रीपद नको, मी पक्षातच काम करणार असे भावनाताई सांगत आहेत. मग त्यांची दिल्लीत मंत्रिमंडळ स्थापने दरम्यान अनुपस्थिती व नाराजी कशासाठी असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तार्इंना किमान उपाध्यक्षपद तरी द्यावे, अशी त्यांच्या समर्थक शिवसैनिकांची भावना आहे.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावारSanjay Rathodसंजय राठोड