शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

साडेचार हजार कोटींच्या वीज कंत्राटात नुकसान किती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:15 IST

राज्यातील पायाभूत विद्युत सुविधांच्या उभारणीसाठी महापारेषण कंपनीने साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट दिले होते. परंतु या कंत्राटात पारेषण कंपनीला नेमके किती कोटींचे नुकसान झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहापारेषण कंपनीवीज नियामक आयोगालाही अंधारात ठेवले

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील पायाभूत विद्युत सुविधांच्या उभारणीसाठी महापारेषण कंपनीने साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट दिले होते. परंतु या कंत्राटात पारेषण कंपनीला नेमके किती कोटींचे नुकसान झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. एवढेच काय, वीज नियामक आयोगालाही याची खबरबात लागू दिलेली नाही.वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, सदस्य आय.एम. बोहरी आणि मुकेश खुल्लर यांनी १२ सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या आदेशात ईपीसी कंत्राटामुळे वीज पारेषण कंपनीला किती नुकसान झाले ही बाब स्पष्ट केलेली नाही. ईपीसी कराराचे हे धोरण पूर्णपणे फसले हे सर्वश्रृत आहे. पाच वर्षांपूर्वी अतिउच्चदाब वीज वाहिन्याची उभारणी व उपकेंद्राच्या निर्मितीसाठी नागपूर, औरंगाबाद, नाशिक, वाशी, अमरावती, पुणे व कराड परिमंडळांतर्गत ईसीआय, अरेव्हा, कल्पतरू, आयसोलेक्स व ज्योती या पाच कंपन्यांना साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट देण्यात आले होते. त्यापोटी कराराच्या दहा टक्के अर्थात १६० कोटींची रक्कम अ‍ॅडव्हॉन्स म्हणून प्रदान करण्यात आली. मात्र करार फसल्याने हे कंत्राट रद्द करण्यात आले. या कामांचे तुकडे पाडून अनेक छोट्या कंत्राटदारांकडून काही कामे करून घेण्यात आली.१६० कोटींच्या अ‍ॅडव्हॉन्स रकमेची कंत्राटदाराकडून वसुली झाली किंवा नाही, हे स्पष्ट नाही. कंत्राटदाराचे साहित्य साईडवर पडून होते. त्याच्या प्रमाणपत्रानुसार (एमआरसी) कंत्राटदाराला कोट्यवधींच्या रकमा दिल्या जात होत्या. मात्र कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने हे साहित्य कंत्राटदाराच्या अखत्यारीत साईडवर पडून होते. काही महिन्यातच वीज पारेषण कंपनीची परवानगी न घेता कंत्राटदारांनी हे साहित्य परस्परच साईडवरून गायब केल्याची माहिती आहे.पारेषणचे या कंत्राटदारांना दिलेल्या रकमेचे नुकसानही झाले आहे. या गंभीरबाबी बाबत खुद्द वीज नियामक आयोगालाही महापारेषण कंपनीने अंधारात ठेवले आहे. या संपूर्ण प्रकरणाची आयोगाने सखोल चौकशी केल्यास ईपीसी करारात पारेषण कंपनीला कसे कोट्यवधींचे नुकसान झाले, हे सिद्ध होण्यास वेळ लागणार नाही. विशेष असे या प्रकरणात पारेषण कंपनीनेही संबंधित कंत्राटदार अथवा यंत्रणेविरुद्ध कठोर कारवाईची भूमिका घेतलेली नाही.

पारेषणला ९० कोटींचा महसुली नफावीज नियामक आयोगाने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी पारेषण कंपनीला ३ हजार ७४४ कोटी ६९ लाखांच्या महसुली खर्चाला मंजुरी दिली. पारेषणचे महसुली उत्पन्न ३ हजार ८३४ कोटी ७५ लाख एवढे होणार असल्याचे नमूद आहे. त्यानुसार पारेषण कंपनी ९० कोटी सहा लाखाने फायद्यात राहणार आहे. मात्र कंपनीला ईपीसी करारातून झालेला तोटा कायम आहे.

टॅग्स :electricityवीज