शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

‘पेसा’साठी आमच्या गावात आम्हीच सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 9:39 PM

कोणत्या योजना स्वीकारायच्या आणि कोणत्या नाकारायच्या शिवाय त्याचे लाभधारक कोण, हे ठरविण्याचा अधिकार ‘पेसा’ अंतर्गत ग्रामसभेत आले आहे. परंतु त्याची जनजागृती झाली नाही. संपूर्ण देशात २४ डिसेंबर १९९६ रोजी अतीमागास व आदिवासी विभागात हा कायदा लागू झाला. महाराष्ट्रात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास २०१४ उजाडले.

ठळक मुद्देसंडे अँकर । आदिवासींच्या विकासाला गती देण्यासाठी अनोखा प्रयोग, ‘बहुरंग’ची सरकारी मदतीशिवाय निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोणत्या योजना स्वीकारायच्या आणि कोणत्या नाकारायच्या शिवाय त्याचे लाभधारक कोण, हे ठरविण्याचा अधिकार ‘पेसा’ अंतर्गत ग्रामसभेत आले आहे. परंतु त्याची जनजागृती झाली नाही. संपूर्ण देशात २४ डिसेंबर १९९६ रोजी अतीमागास व आदिवासी विभागात हा कायदा लागू झाला. महाराष्ट्रात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास २०१४ उजाडले. आदिवासी समाजासाठी तयार केलेल्या विविध योजना, त्यांना मिळणाऱ्या सवलती, सर्वांगीण विकासासाठीच्या योजना अपवादानेच त्यांच्यापर्यंत पोहोचतात. याचे प्रमुख कारण जनजागृतीचा अभाव हे आहे. आदिवासी जनतेपर्यंत त्यांचे हक्क पोहोचविण्यासाठी बहुरंग पुणेने ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या लघुचित्रपटातील कथानकाच्या माध्यमातून ‘पेसा’ कायद्याची माहिती देण्याचा प्रयत्न डॉ. कुंडलिक केदारी या दिग्दर्शकांनी केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सरकारी मदतीशिवाय हा लघुचित्रपट तयार करण्यात आला असल्याचे डॉ. केदारी यांनी म्हटले आहे. पेसा लागू असलेल्या १३ जिल्ह्यातील ४९ तालुक्यात आणि दोन हजार ८३५ ग्रामपंचायतींमधील पाच हजार ९०५ गावात हा लघुचित्रपट पोहोचविला जाणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव १३०, राळेगाव ४३, केळापूर १०३, घाटंजी ५५ या गावात जनजागृतीपट दाखविला जाणार असल्याचे डॉ. केदारी यांनी कळविले आहे.जनजागृतीसाठी कलावंतांची फौज‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या जनजागृतीपटाची कथा, पटकथा, संवाद दिग्दर्शन डॉ. कुंडलिक केदारी यांचे आहे. गीत मदन धायरे यांनी लिहिले असून दयानंद घोटकर यांनी संगीत दिले आहे. छायांकन एस. समीर, संकलन श्रीवल्लभ मोरे, रंगभूषा बाळ जुवाटकर, वेशभूषा राहुल निगडे, कला संगीत सोनवणे यांनी केली आहे. प्रेम नरसाळे, रेणुका शहाणे, गणेश महिंद्रकर, रामचंद्र धुमाळ, पूजा चांदेकर, महेंद्र गुºहाडे, रामदास चौधरी, नेहा भोसले, गौरी रेंगडे, संजय बोराडे, अनंदत शिंदे, रोहिदास घुले, अंकुश मांडेकर, मिलिंद जाधव, सुरेश वल्ले, शाल्मीरा पुंड आणि डॉ. कुंडलिक केदारी यांच्या भूमिका आहेत.जनजागृती नसल्याने वचक राहिला नाहीअंमलबजावणीबाबत अधिकारी संभ्रमात आहे. त्यांची ‘पेसा’बाधित क्षेत्रात कामांची पद्धत पारंपरिकच आहे. गावपातळीवरील लोकप्रतिनिधींना हा कायदा समजून घेण्यात स्वारस्य नाही. त्याचा फायदा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी घेतात. कायद्याची जनजागृती नसल्याने त्यांच्यावर ग्रामसभेचा वचक राहिला नाही.