शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

तोट्यातील शेती आणली नफ्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:43 IST

निसर्गाचा लहरीपणा, शेतमालास न मिळणारे दर आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेती व्यवसाय घाट्यात आला आहे. या दुष्टचक्रात गुरफटलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या संघर्षमय शेतीचे चित्र पालटावे म्हणून अरविंद उद्धवराव बेंडे यांनी जीवाचे रान केले.

ठळक मुद्देमेहनतीवर शासनाच्या कृषीभूषण पुरस्काराची मोहोर : शेडनेट, ड्रिप, सोलर पंपाच्या जोरावर आमूलाग्र क्रांती

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाचा लहरीपणा, शेतमालास न मिळणारे दर आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेती व्यवसाय घाट्यात आला आहे. या दुष्टचक्रात गुरफटलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या संघर्षमय शेतीचे चित्र पालटावे म्हणून अरविंद उद्धवराव बेंडे यांनी जीवाचे रान केले. घाट्यातली शेती नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तंत्रज्ञानासोबत नवीन प्रयोगाची जोड दिली. यातून शेतीचा चेहरामोहरा बदलला. घाट्यात गेलेली शेती त्यांनी नफ्यात आणली आहे. हे यशस्वी प्रयोग पाहून राज्य शसनाने अरविंद बेंडे यांना वसंतराव नाईक शेतकरी कृषीभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. यवतमाळ तालुक्यातील रातचांदना गावाचे शेतकरी अरविंद उद्धवराव बेंडे यांना २०१६ चा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन पुरस्कार जाहीर करण्यात आला. बेंडे यांच्याकडे पूर्वी चार एकर शेती होती. या शेतशिवारात संपूर्ण कुटुंब राबत होते. परंपरागत पीक घेतले जात होते. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि शेतमालास न मिळणाऱ्या दरामुळे पेरणीचा खर्च निघणेही अवघड झाले होते. यामुळे बेंडे यांनी शेती सोडण्याचा निर्णय घेतला होता. याचवेळी ते रावेरी कृषी विद्यापीठात शेडनेट प्रशिक्षणाला गेले. तेथून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.शेडनेट हाउसमुळे उत्पन्नात दुप्पट वाढ होणार आणि शेतीची सुरक्षा होणार याची हमखास खात्री होती. यासोबत पीक पद्धती बदलणे गरजेचे होते. यामुळे त्यांनी शेतामधील पीक पद्धती बदलविली. आता ते २४ एकर शेत पाहातात. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली. यासोबत शेणखताचा आणि धरणातील गाळाचा त्यांनी वापर केला आहे. गोमूत्राने शेतशिवार सुपीक झाले आहे. विशेष म्हणजे, साडेचार एकर शेडनेट आणि ड्रिपसोबत मल्चींगची व्यवस्थाही त्यांनी केली आहे. निसर्गाच्या लहरीपणाने उत्पादनाला फटका बसतो. मात्र शेडनेटमुळे हे नुकसान कमी करता आले, असे ते म्हणाले.त्यांनी आपल्या शेतात शिमला मिरची, टमाटर, वांगे, भेंडी, साधी मिरची, काकडी आणि दोडक्याचे पीक घेतले आहे. उत्पादित भाजीपाला उपराजधानीपर्यंत ते पाठवितात. त्यांना २४ एकरात २४ लाखांचे उत्पन्न झाले. तर १४ लाख रुपये उत्पादनखर्च आला. १० लाख रूपयाचा नफा झाला. याकरिता परंपरागत पीक पद्धती बदलावी लागली. सोबत पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला. विशेष म्हणजे, वेळेवर सर्व कामे करावी लागली. यानंतरच पीक दिसत आहे. शेतकºयांनी पीक पद्धती बदलवून प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा. शेतीला जोडधंदा असावा आणि वेळच्या वेळी कामे व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.एकत्र कुटुंब पद्धतीनेच हे यश मिळाल्याचे ते सांगतात. त्यांची आई निर्मला बेंडे, शशिकला बेंडे, भाऊ राजेंद्र आणि राम यांची त्यांना शेतीत मोलाची मदत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी मंगला बेंडे, वहिणी अरूणा आणि सुषमा याही शेतात राबतात. सर्वांच्या परिश्रमासोबत काटकसरीने शेतीचा विकास साधता आला, असे मत अरविंद बेंडे यांनी ‘लोकमत’कडे नोंदविले.राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखलअरविंद बेंडे यांच्या शेतात दररोज शेकडो शेतकरी भेटी देतात. त्यांच्या यशाचे गणित जाणून घेतात. त्यांच्या शेताला तत्कालीन राज्यपाल एस. सी. जमीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या. १ जुलै २००९ रोजी त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला, २००८ मध्ये राज्यपालांनी उत्कृष्ठ गोपालक पुरस्कार देऊन गौरविले. २०११ मध्ये पुसदच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उत्कृष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.