शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात पाण्याचा व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:24 IST

शहरातील पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेच्या पाणवठ्यावर खासगी टँकरचा धुमाकूळ सुरू असून फुकटात मिळालेले पाणी बेभाव विकण्याचा सपाटा बहुतांश खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे.

ठळक मुद्देनगरपरिषदेच्या पाणवठ्यावर झुंबड : खासगी टँकरने विहिरी कोरड्या

सुरेंद्र राऊत।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेच्या पाणवठ्यावर खासगी टँकरचा धुमाकूळ सुरू असून फुकटात मिळालेले पाणी बेभाव विकण्याचा सपाटा बहुतांश खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे. शहरातील विविध भागातील विहिरी अतिरिक्त उपस्यामुळे तळाला जात आहे. या टँकरचालकांवर निर्बंध आणले नाही तर यवतमाळकरांसाठी असलेला एकमेव पर्याय भूगर्भातील जल साठाही संपण्याची भीती आहे.नगरपरिषदेने टंचाई निवारणासाठी ५६ टँकर सुरू केले आहे. एका प्रभागात दोन टँकर याप्रमाणे नियोजन आहे. एका विहिरीवरून दोन टँकर ३६ हजार लिटर पाण्याचा उपसा करते. तुडूंब भरलेल्या विहिरी टँकर लागताच अवघ्या काही तासात तळ गाठत आहे. यात खासगी टँकर माफियांनी स्वत:चे उखळ पांढरे करणे सुरू आहे. पूर्वी ४०० रुपयात मिळणाऱ्या टँकरला आता एक हजार रुपयांपर्यंत मोजावे लागत आहे. नळ नियमित असल्याने भूजलावर इतका ताण नव्हता. आता घरगुती विहिरी, बोअरवेल आणि सार्वजनिक विहिरीतून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. बांधकामांसाठी टँकरने पाणी पुरविले जाते.नगरपरिषदेने २० विहिरींवर सबमर्शिबल पंप बसविले असून त्या प्रभागातील शिपायाच्या नियंत्रणात टँकर भरून दिले जाते. येथे खासगी टँकर माफिया शिपायाला चिरीमिरी देवून टँकर भरून घेतात. इतकेच नव्हेतर काही नगरसेवकांच्या शिफारपत्रावर एमआयडीसीतूनही खासगी टँकर पाणी भरत आहे. काही नगरसेवकांनी शिफारसपत्राचाही गोरखधंदा सुरू केला आहे.पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळत असताना संधीसाधू खासगी टँकरवाले, काही नगरसेवक, पालिकेतील यंत्रणा आपले हात धुवून घेत आहे. वारेमाप उपस्यामुळे सहकारनगर, बोदड, श्रीरामनगर, नेहरू उद्यान येथील भरमसाठ पाण्याच्या विहिरी उपस्यामुळे तळाला गेल्या आहे.शहरात आढळल्या भरमसाठ पाण्याच्या विहिरीलोहारा येथील राधाकृष्णनगरच्या विहिरीतील गाळ काढल्यानंतर भरमसाठ पाणी लागले. कॉटन मार्केट मागील विहीर, व्यंकटेशनगरातील खचलेली विहिरीतही पाणी आहे. भोसा येथील आंब्याची विहीर, मोहा येथील विहिरीत पाणीसाठा आढळून आला. याशिवाय दत्त चौकातील हौदातही भरपूर पाणी असून आता तेथे गाळ काढणेही शक्य होत नाही. या हौदावरही टँकर लावण्याचे नियोजन पालिका करीत आहे. शहरातील अशा विहिरींचे कायमस्वरूपी जतन करण्याची गरज आहे.अशी होते पाण्याची चोरीनगरपरिषदेने एका प्रभागात दोन टँकर दिले आहे. प्रभागाची लोकसंख्या सरासरी दहा हजार इतकी आहे. प्रत्येकी तीन हजार लिटरचे दोन टँकरला दिवसभºयात सहा ट्रिपा म्हणजे ३६ हजार लिटर पाणी एका प्रभागात वितरित करीत असल्याचा दावा पालिका प्रशासनाचा आहे. असे नियोजन असतानाही प्रभागातील पाण्याची वानवा कायम आहे. यावरूनच पाणी चोरी होत असल्याचे उघडपणे दिसून येते. प्रभागात किमान ४० टक्के नागरिकांकडे स्वत:चे जलस्त्रोत आहे. त्यांना टँकरचे पाणी लागत नाही. त्यानंतरही दिवसाकाठी ३६ हजार लिटर पाणी वितरण करूनही टंचाई कायम असल्याचे वास्तव आहे. पालिकेच्या टँकरकडून प्रत्यक्षात किती ट्रीपा होतात, नेमके हे पाणी कुठे मुरते हे कोड कायम आहे.गाळ काढण्याचे सोपस्कारनगरपरिषदेने ७९ विहिरींच्या सफाईचे नियोजन केले असून ६०० रुपये घनमीटर दराने गाळ काढला जात आहे. यात पाणी उपसणे, क्रेन मशीन व बाहेर टाकलेला गाळ उचलणे याचे वेगळे दर आकारले जात आहे. खोदकाम नसल्याने अनेक विहिरींना तात्पुरते पाणी दिसत आहे. लगतच्या काळात या विहिरी खोदल्याशिवाय पाणी पुरणे शक्य नाही. अशाही स्थितीत पालिकेने साफ केलेल्या २० विहिरींपैकी केवळ तेलंगेनगर येथील एक विहीर कोरडी निघाली.

टॅग्स :Waterपाणी