शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

यवतमाळात पाण्याचा व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:24 IST

शहरातील पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेच्या पाणवठ्यावर खासगी टँकरचा धुमाकूळ सुरू असून फुकटात मिळालेले पाणी बेभाव विकण्याचा सपाटा बहुतांश खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे.

ठळक मुद्देनगरपरिषदेच्या पाणवठ्यावर झुंबड : खासगी टँकरने विहिरी कोरड्या

सुरेंद्र राऊत।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेच्या पाणवठ्यावर खासगी टँकरचा धुमाकूळ सुरू असून फुकटात मिळालेले पाणी बेभाव विकण्याचा सपाटा बहुतांश खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे. शहरातील विविध भागातील विहिरी अतिरिक्त उपस्यामुळे तळाला जात आहे. या टँकरचालकांवर निर्बंध आणले नाही तर यवतमाळकरांसाठी असलेला एकमेव पर्याय भूगर्भातील जल साठाही संपण्याची भीती आहे.नगरपरिषदेने टंचाई निवारणासाठी ५६ टँकर सुरू केले आहे. एका प्रभागात दोन टँकर याप्रमाणे नियोजन आहे. एका विहिरीवरून दोन टँकर ३६ हजार लिटर पाण्याचा उपसा करते. तुडूंब भरलेल्या विहिरी टँकर लागताच अवघ्या काही तासात तळ गाठत आहे. यात खासगी टँकर माफियांनी स्वत:चे उखळ पांढरे करणे सुरू आहे. पूर्वी ४०० रुपयात मिळणाऱ्या टँकरला आता एक हजार रुपयांपर्यंत मोजावे लागत आहे. नळ नियमित असल्याने भूजलावर इतका ताण नव्हता. आता घरगुती विहिरी, बोअरवेल आणि सार्वजनिक विहिरीतून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. बांधकामांसाठी टँकरने पाणी पुरविले जाते.नगरपरिषदेने २० विहिरींवर सबमर्शिबल पंप बसविले असून त्या प्रभागातील शिपायाच्या नियंत्रणात टँकर भरून दिले जाते. येथे खासगी टँकर माफिया शिपायाला चिरीमिरी देवून टँकर भरून घेतात. इतकेच नव्हेतर काही नगरसेवकांच्या शिफारपत्रावर एमआयडीसीतूनही खासगी टँकर पाणी भरत आहे. काही नगरसेवकांनी शिफारसपत्राचाही गोरखधंदा सुरू केला आहे.पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळत असताना संधीसाधू खासगी टँकरवाले, काही नगरसेवक, पालिकेतील यंत्रणा आपले हात धुवून घेत आहे. वारेमाप उपस्यामुळे सहकारनगर, बोदड, श्रीरामनगर, नेहरू उद्यान येथील भरमसाठ पाण्याच्या विहिरी उपस्यामुळे तळाला गेल्या आहे.शहरात आढळल्या भरमसाठ पाण्याच्या विहिरीलोहारा येथील राधाकृष्णनगरच्या विहिरीतील गाळ काढल्यानंतर भरमसाठ पाणी लागले. कॉटन मार्केट मागील विहीर, व्यंकटेशनगरातील खचलेली विहिरीतही पाणी आहे. भोसा येथील आंब्याची विहीर, मोहा येथील विहिरीत पाणीसाठा आढळून आला. याशिवाय दत्त चौकातील हौदातही भरपूर पाणी असून आता तेथे गाळ काढणेही शक्य होत नाही. या हौदावरही टँकर लावण्याचे नियोजन पालिका करीत आहे. शहरातील अशा विहिरींचे कायमस्वरूपी जतन करण्याची गरज आहे.अशी होते पाण्याची चोरीनगरपरिषदेने एका प्रभागात दोन टँकर दिले आहे. प्रभागाची लोकसंख्या सरासरी दहा हजार इतकी आहे. प्रत्येकी तीन हजार लिटरचे दोन टँकरला दिवसभºयात सहा ट्रिपा म्हणजे ३६ हजार लिटर पाणी एका प्रभागात वितरित करीत असल्याचा दावा पालिका प्रशासनाचा आहे. असे नियोजन असतानाही प्रभागातील पाण्याची वानवा कायम आहे. यावरूनच पाणी चोरी होत असल्याचे उघडपणे दिसून येते. प्रभागात किमान ४० टक्के नागरिकांकडे स्वत:चे जलस्त्रोत आहे. त्यांना टँकरचे पाणी लागत नाही. त्यानंतरही दिवसाकाठी ३६ हजार लिटर पाणी वितरण करूनही टंचाई कायम असल्याचे वास्तव आहे. पालिकेच्या टँकरकडून प्रत्यक्षात किती ट्रीपा होतात, नेमके हे पाणी कुठे मुरते हे कोड कायम आहे.गाळ काढण्याचे सोपस्कारनगरपरिषदेने ७९ विहिरींच्या सफाईचे नियोजन केले असून ६०० रुपये घनमीटर दराने गाळ काढला जात आहे. यात पाणी उपसणे, क्रेन मशीन व बाहेर टाकलेला गाळ उचलणे याचे वेगळे दर आकारले जात आहे. खोदकाम नसल्याने अनेक विहिरींना तात्पुरते पाणी दिसत आहे. लगतच्या काळात या विहिरी खोदल्याशिवाय पाणी पुरणे शक्य नाही. अशाही स्थितीत पालिकेने साफ केलेल्या २० विहिरींपैकी केवळ तेलंगेनगर येथील एक विहीर कोरडी निघाली.

टॅग्स :Waterपाणी