शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:04 PM

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहिलांचा मोर्चा धडकला : नगरसेवकांचे नेतृत्व, प्राधिकरणाला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराला जीवन प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असून याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक व महिलांनी सोमवारी दुपारी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली.शहरात मोठ्याप्रमाणात डेंग्यूची, टायफाईडची साथ सुरू आहे. यात आणखी भर घालण्याचे काम जीवन प्राधिकरण दूषित पाणीपुरवठ्यातून करत आहे. कधी नव्हे तो यवतमाळात कॉलराची लागण झाली. डायरियाचे रुग्ण आताही वाढत आहे. जीवन प्राधिकणर चक्क मानवी आरोग्याशी खेळण्याचे काम करत आहे. अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतरही नळ येत नाही. पाणीपुरवठ्याचे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प तुडूंब भरलेले असताना नियमित नळ येत नाही. कधी तरी आलेल्या नळातून हातही लावता येणार नाही, असे पाणी येत आहे. ही समस्या शहरातील सर्वच भागात आहे.दूषित व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे संतापलेल्या बांगरनगर, गिरीनगर, विठ्ठलवाडी, छत्रपतीनगर, अभिनव कॉलनी, संदीप टॉकीज परिसर, साईनगर, कामगारनगर, वंजारी फैल, बुटले ले-आऊट आदी परिसरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी परिसरातील नगरसेवक विशाल पावडे, उध्दवराव साबळे, कोमल कार्तिक ताजने, साधना काळे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन नियमित व शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.आरोग्याशी खेळखंडोबादूषित पाणीपुरवठा करून जीवन प्राधिकरण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. पिण्यायोग्य तर सोडाच दैनंदिन वापरायोग्य पाणी नळातून येत नाही. उन्हाळ््यापासून कोलमडलेले पाणीपुरवठ्याचे नियोजन अजूनही सुरळीत झाले नाही. शहरात ठिकठिकाणी नळाची मुख्य पाईपलाईन लिक आहे. हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.