शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जिल्ह्यातील ३९ गावांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:21 IST

अपुरा पाऊस आणि तळाला गेलेल्या जलस्रोतामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ३९ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक नेरमध्ये : ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली, प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : अपुरा पाऊस आणि तळाला गेलेल्या जलस्रोतामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ३९ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक सहा टँकर नेर तालुक्यात सुरू आहे. आगामी काळात जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्केच पाणी झाले. त्यामुळे हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईची चाहूल लागली होती. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. १४ कोटी रुपयांचा कृती आराखडाही तयार केला. मात्र गावागावातील पाणीटंचाईने आता उग्ररुप धारण केले आहे. जिल्ह्यातील ३९ गावात कोणतेच जलस्रोत नसल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक सहा टँकर नेर तालुक्यात सद्यस्थितीत सुरू आहे. तालुक्यातील खरडगाव झोंबाडी, सातेफळ, अजंती, घुई, चिकणी डोमगा या गावात दररोज टँकर पोहोचत आहे. आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, चिमटा, खडका, पाळोदी, बाभूळगाव तालुक्यातील सारफळी, फत्तेपूर, दारव्हा तालुक्यातील तोरनाळा, तेलगव्हाण, करजगाव, कोहळा, कळंब तालुक्यातील गणेशवाडी, पांढरकवडा तालुक्यातील सुकळी पोड, उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव, वणीच्या पेटूर, नायगाव, सावंगी, यवतमाळातील पांढरी, धानोरा, इथोरी, जांबुळणी, लोहारा, पुसद तालुक्यातील बाळेवाडी, मुंगसाजीनगर, पन्हाळा, म्हैसमाळ, मारवाडी, महागावातील टेंभुरधरा, फुलसावंगी आणि घाटंजी तालुक्यातील ताडसावळी, पारवा, टिपेश्वर पुनर्वसन, चांदापूर, पंगडी या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मारेगाव आणि दिग्रस या दोन तालुक्यात अद्यापपर्यंत टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यातील १८६ गावातील १८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. त्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल दारव्हा तालुक्यात ३२, आर्णी आणि यवतमाळ तालुक्यात २२ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.प्रकल्पांमध्ये केवळ १८.७१ टक्के पाणीयवतमाळ जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम आणि ९१ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये २०२.७८ दलघमी म्हणजे केवळ १८.७१ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पांमध्ये अपुरा जलसाठा असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १५.६४, अरुणावती प्रकल्पात ८.८२, बेंबळा प्रकल्पात १४.४८ टक्के जलसाठा आहे. तर अडाण प्रकल्पात १७.३२, नवरगाव २४.५२, गोखी ८.५५, वाघाडी १०.५५, सायखेडा ५०.४४, अधरपूस ३२.७७, बोरगाव ८.१७ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील १०१ प्रकल्पांची संकल्पीत पाणी साठा क्षमता १०८३.७७ दलघमी असून या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या २०२.७८ दलघमी पाणीसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी