शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
2
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
3
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
4
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
5
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
6
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
7
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
8
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
10
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
12
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
13
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
14
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
15
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
16
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
17
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
18
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
19
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
20
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

जिल्ह्यातील ३९ गावांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:21 IST

अपुरा पाऊस आणि तळाला गेलेल्या जलस्रोतामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ३९ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक नेरमध्ये : ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली, प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : अपुरा पाऊस आणि तळाला गेलेल्या जलस्रोतामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ३९ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक सहा टँकर नेर तालुक्यात सुरू आहे. आगामी काळात जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्केच पाणी झाले. त्यामुळे हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईची चाहूल लागली होती. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. १४ कोटी रुपयांचा कृती आराखडाही तयार केला. मात्र गावागावातील पाणीटंचाईने आता उग्ररुप धारण केले आहे. जिल्ह्यातील ३९ गावात कोणतेच जलस्रोत नसल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक सहा टँकर नेर तालुक्यात सद्यस्थितीत सुरू आहे. तालुक्यातील खरडगाव झोंबाडी, सातेफळ, अजंती, घुई, चिकणी डोमगा या गावात दररोज टँकर पोहोचत आहे. आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, चिमटा, खडका, पाळोदी, बाभूळगाव तालुक्यातील सारफळी, फत्तेपूर, दारव्हा तालुक्यातील तोरनाळा, तेलगव्हाण, करजगाव, कोहळा, कळंब तालुक्यातील गणेशवाडी, पांढरकवडा तालुक्यातील सुकळी पोड, उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव, वणीच्या पेटूर, नायगाव, सावंगी, यवतमाळातील पांढरी, धानोरा, इथोरी, जांबुळणी, लोहारा, पुसद तालुक्यातील बाळेवाडी, मुंगसाजीनगर, पन्हाळा, म्हैसमाळ, मारवाडी, महागावातील टेंभुरधरा, फुलसावंगी आणि घाटंजी तालुक्यातील ताडसावळी, पारवा, टिपेश्वर पुनर्वसन, चांदापूर, पंगडी या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मारेगाव आणि दिग्रस या दोन तालुक्यात अद्यापपर्यंत टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यातील १८६ गावातील १८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. त्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल दारव्हा तालुक्यात ३२, आर्णी आणि यवतमाळ तालुक्यात २२ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.प्रकल्पांमध्ये केवळ १८.७१ टक्के पाणीयवतमाळ जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम आणि ९१ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये २०२.७८ दलघमी म्हणजे केवळ १८.७१ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पांमध्ये अपुरा जलसाठा असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १५.६४, अरुणावती प्रकल्पात ८.८२, बेंबळा प्रकल्पात १४.४८ टक्के जलसाठा आहे. तर अडाण प्रकल्पात १७.३२, नवरगाव २४.५२, गोखी ८.५५, वाघाडी १०.५५, सायखेडा ५०.४४, अधरपूस ३२.७७, बोरगाव ८.१७ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील १०१ प्रकल्पांची संकल्पीत पाणी साठा क्षमता १०८३.७७ दलघमी असून या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या २०२.७८ दलघमी पाणीसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी