शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
3
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
4
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
5
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
6
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
7
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
8
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
9
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
10
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
11
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
12
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
13
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
14
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
15
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
16
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
17
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
18
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
19
रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट
20
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

पाणीटंचाई उपायातील अपहारावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:22 PM

शहरातील पाणीटंचाई उपाययोजनेच्या निविदा प्रक्रियेतील अपहारावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. तीन महिन्यापूर्वीच ‘लोकमत’ने या प्रकाराचा भंडाफोड केला होता.

ठळक मुद्देनगरपरिषद : तीन महिन्यांपूर्वीच ‘लोकमत’ने केला होता भंडाफोड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील पाणीटंचाई उपाययोजनेच्या निविदा प्रक्रियेतील अपहारावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. तीन महिन्यापूर्वीच ‘लोकमत’ने या प्रकाराचा भंडाफोड केला होता. त्यानंतर नगराध्यक्षांनी तक्रारही केली होती. परंतु कारवाई ऐवजी पाणीपुरवठा विभाग प्रमुखाला अभय देण्यात आले होते.शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यासाठी विहीर स्वच्छ करणे, टँकर आदींबाबत निविदा मागविण्यात आल्या. यातील अटी व शर्ती सोईच्या ठेवण्यात आल्या. मर्जीतील कंत्राटदारांना नेमून पाणीपुरवठा विभाग प्रमुखाने अव्वाच्या सव्वा इस्टीमेट तयार केले. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्यावेळी पालिका प्रशासन व नगरसेवकांनीही दखल घेतली नाही. टंचाई उपाययोजनेच्या कामाची चौकशी केल्यास फौजदारी कक्षेत बसतील, अशा चुका आहेत. विहिरीतील गाळ काढण्यासाठी टक्केवारी ठरवित इस्टीमेट तयार केले आहे. नवीन विहीर होईल, एवढा खर्च गाळ काढण्यावर दाखविण्यात आला. पाच फूट गाळासाठी आठ लाखांची देयके मंजुरीसाठी ठेवली. यातून पाणीटंचाई ‘कॅश’ झाल्याचे दिसून येते.येथील विभाग प्रमुख ऋषिकेश देशमुख वणी येथून आले आहे. ते तेथे वादग्रस्त ठरले होते. त्यांचे कारनामे माहीत असतानाही त्यांच्याकडे पाणी टंचाई उपाययोजनेचा करोडो रुपयांचा व्यवहार देण्यात आला. या प्रमुखाने लेखा परीक्षकांच्या स्वत:च स्वाक्षऱ्या करून ते मुख्याधिकारी व नगराध्यक्षांपुढे ठेवल्या होत्या. हा प्रकार लक्षात येताच नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. परंतु प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही. उलट आर्थिक लाभामुळे प्रमुखाला आणखी संधी देण्यात आली. पाणी वाटपात गोंधळ झाल्यानंतर देशमुख यांचा पदभार काढला. आता सर्वसाधारण सभेत बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती यांनी देशमुख यांच्यावर आरोप करीत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. विहिरीतील गाळ काढण्यावर कशी उधळपट्टी झाली हे सांगत त्यांनी टँकर देयके थांबविण्याचा प्रस्ताव दिला. त्याला सर्व सदस्यांनी अनुमती दिली. नगरपरिषद प्रशासन पाणी पुरवठा विभागातील गौडबंगालाची चौकशी करून दोषी विरोधात फौजदारी दाखल करण्याचे औदार्य दाखविते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मोटारपंपाचा हिशेबच नाहीपाणीटंचाईच्या काळात नगरसेवकांनी मोटारपंप विकत घेण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेकडे ठेवला होता. परंतु जाणीवपूर्वक मोटारपंप भाड्याने घेण्यात आले. दर दिवसाला दोन हजार आणि नंतर दीड हजार रुपये ठरविले. टंचाई काळात कुठे आणि किती पंप लागले याचा हिशेब सर्वसाधारण सभेत देता आला नाही. आता यावर कुणीही बोलायला तयार दिसत नाही.