शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

४७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; इसापूर धरणातून सोडणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:30 IST

Yavatmal : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! शेतकऱ्यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील (इसापूर धरण) आरक्षित ०२,०० दलघमी पाणी टंचाई निवारणार्थ पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले आहेत. यामुळे नदीकाठावरील ४७ गावांतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

ऐन हिवाळ्यातच पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने तसेच पाणीपातळी कमी झाल्याने नदीकाठावरील अनेक गावात उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सोबत जनावरांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अनेक गावातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत होते. येथील गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचेकडेही याबाबत मागणी केली होती.

गटविकास अधिकाऱ्यांनी केली होती विनंती उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तेथील टंचाई निवारणार्थ सन २०२४- २५ (सन २०२५ चा उन्हाळा) या वर्षातील टंचाई कालावधी करीता आरक्षित पाणी साठ्यांपैकी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील (इनापूर धरण पाणी उपरोक्त ४४ गावांकरिता निश्चित केलेले १५ दलघमी आरक्षित पाणी नदी पात्रात सोडण्याची विनंती गटविकास अधिकाऱ्यांनी केली होती.

चार महिने कसे काढायचे उभा राहिला होता प्रश्न सन २०२४-२५ चे आरक्षित पाणीसाठा हा ३० जून २०२५ पर्यंत टंचाई कालावधी संपेपर्यंत असल्याने अजून चार ते पान महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत १५.०० दलघमी पाणी नदीचे पात्रात सोडणे उचीत होईल म्हणून ०२,०० दलघमी पाणी पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याबाबतची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी केली होती.

टॅग्स :water transportजलवाहतूकyavatmal-acयवतमाळ