शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

४७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; इसापूर धरणातून सोडणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:30 IST

Yavatmal : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! शेतकऱ्यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील (इसापूर धरण) आरक्षित ०२,०० दलघमी पाणी टंचाई निवारणार्थ पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले आहेत. यामुळे नदीकाठावरील ४७ गावांतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

ऐन हिवाळ्यातच पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने तसेच पाणीपातळी कमी झाल्याने नदीकाठावरील अनेक गावात उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सोबत जनावरांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अनेक गावातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत होते. येथील गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचेकडेही याबाबत मागणी केली होती.

गटविकास अधिकाऱ्यांनी केली होती विनंती उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तेथील टंचाई निवारणार्थ सन २०२४- २५ (सन २०२५ चा उन्हाळा) या वर्षातील टंचाई कालावधी करीता आरक्षित पाणी साठ्यांपैकी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील (इनापूर धरण पाणी उपरोक्त ४४ गावांकरिता निश्चित केलेले १५ दलघमी आरक्षित पाणी नदी पात्रात सोडण्याची विनंती गटविकास अधिकाऱ्यांनी केली होती.

चार महिने कसे काढायचे उभा राहिला होता प्रश्न सन २०२४-२५ चे आरक्षित पाणीसाठा हा ३० जून २०२५ पर्यंत टंचाई कालावधी संपेपर्यंत असल्याने अजून चार ते पान महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत १५.०० दलघमी पाणी नदीचे पात्रात सोडणे उचीत होईल म्हणून ०२,०० दलघमी पाणी पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याबाबतची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी केली होती.

टॅग्स :water transportजलवाहतूकyavatmal-acयवतमाळ