शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कळंबकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’, वर्धा नदी भर उन्हाळ्यातही तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

कळंब शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो, तर दुसरीकडे जुन्या वस्तीमधील ३० वर्षांपूर्वीच्याच नळयोजनेने पाणीपुरवठा केला जात आहे. ही नळयोजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी लिकेज होतात. त्यामुळे नव्याने कळंब शहरासाठी    नळयोजना करण्याची मागणी केली जात आहे.  

गजानन अक्कलवारलोकमत न्यूज नेटवर्ककळंब : वर्धा नदीला मुबलक पाणी आहे. तालुक्यातील इतर तलावांमध्येही पाण्याचा मोठा साठा आहे. जून अखेरपर्यंत प्रकल्पात पाणी राहणार असल्याने शहरासह तालुक्यातील गावांना पाणी टंचाईवर मात करणे सोपे जाणार आहे. कळंब शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो, तर दुसरीकडे जुन्या वस्तीमधील ३० वर्षांपूर्वीच्याच नळयोजनेने पाणीपुरवठा केला जात आहे. ही नळयोजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी लिकेज होतात. त्यामुळे नव्याने कळंब शहरासाठी    नळयोजना करण्याची मागणी केली जात आहे.  पाच-सहा वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. परंतु आता एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. इंधन विहिरीची दुरुस्ती करणे, विहिरीचे खोलीकरण करणे, सार्वजनिक विहिरीची नव्याने निर्मिती करणे आदी उपाययोजना पंचायत समिती स्तरावरून गावपातळीवर करण्यात आल्या आहे.

टंचाई नसली तरी    कृती आराखडा तयार तालुक्यातील एकाही गावात आतापर्यंत तरी टँकरने पाणीपुरवठा करावा लागलेला नाही. जलस्रोतांच्या पाण्याची पातळी कमी होत असले, तरी सद्यस्थितीत पाणीटंचाईची झळ बसलेली नाही. असे असे तरी प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

 कळंबला चार ठिकाणावरून पाणीपुरवठा 

- कळंब शहरातला वर्धा नदी, गायसागर, चक्रवती नदीवरील विहीर, महावीर नगरमधील नळयोजनेची विहीर या चार ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या वर्धा नदीला मुबलक पाणी आहे. त्यामुळे मुख्य नळयोजनेला पाण्याची कमतरता पडणार नाही.

- तीन महत्त्वपूर्ण जलस्रोतांना ‘चार्ज’ करण्यासाठी दत्तापूर व घोटी तलावाचे पाणी सोडले जाणार आहे. वर्धा नदीच्या पात्रामध्ये खोदण्यात आलेल्या विहिरीतून कळंब शहराला पाणीपुरवठा केला जातो.

- वाढलेली लोकसंख्या व जीर्ण झालेली नळयोजनेला लक्षात घेता बेंबळा धरणावरून नवीन नळयोजना सुरू करण्याची कळंबवासीयांची मागणी आहे. यावर्षी पाणीप्रश्न निर्माण झाला नसला तरी भविष्यातील उपाययोजना म्हणून हा प्रयोग अपेक्षित आहे.

नियमित पाणीपुरवठ्याचा प्रयत्न

शहरासाठी चार ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकदा विजेअभावी पाणीपुरवठा खंडित होतो.  सध्या तीन-चार दिवसाआड पाणी सोडले जात आहे. चक्रवती नदीला प्रकल्पाचे पाणी सोडून नदीकाठावरील सर्व जलस्रोतांच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.  - नंदू परळकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कळंब

कळंब तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याचे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध आहे. काही गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.- सुभाष मानकर, गटविकास अधिकारी, कळंब

 

टॅग्स :Waterपाणीriverनदी