शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कळंबकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’, वर्धा नदी भर उन्हाळ्यातही तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

कळंब शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो, तर दुसरीकडे जुन्या वस्तीमधील ३० वर्षांपूर्वीच्याच नळयोजनेने पाणीपुरवठा केला जात आहे. ही नळयोजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी लिकेज होतात. त्यामुळे नव्याने कळंब शहरासाठी    नळयोजना करण्याची मागणी केली जात आहे.  

गजानन अक्कलवारलोकमत न्यूज नेटवर्ककळंब : वर्धा नदीला मुबलक पाणी आहे. तालुक्यातील इतर तलावांमध्येही पाण्याचा मोठा साठा आहे. जून अखेरपर्यंत प्रकल्पात पाणी राहणार असल्याने शहरासह तालुक्यातील गावांना पाणी टंचाईवर मात करणे सोपे जाणार आहे. कळंब शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो, तर दुसरीकडे जुन्या वस्तीमधील ३० वर्षांपूर्वीच्याच नळयोजनेने पाणीपुरवठा केला जात आहे. ही नळयोजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी लिकेज होतात. त्यामुळे नव्याने कळंब शहरासाठी    नळयोजना करण्याची मागणी केली जात आहे.  पाच-सहा वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. परंतु आता एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. इंधन विहिरीची दुरुस्ती करणे, विहिरीचे खोलीकरण करणे, सार्वजनिक विहिरीची नव्याने निर्मिती करणे आदी उपाययोजना पंचायत समिती स्तरावरून गावपातळीवर करण्यात आल्या आहे.

टंचाई नसली तरी    कृती आराखडा तयार तालुक्यातील एकाही गावात आतापर्यंत तरी टँकरने पाणीपुरवठा करावा लागलेला नाही. जलस्रोतांच्या पाण्याची पातळी कमी होत असले, तरी सद्यस्थितीत पाणीटंचाईची झळ बसलेली नाही. असे असे तरी प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

 कळंबला चार ठिकाणावरून पाणीपुरवठा 

- कळंब शहरातला वर्धा नदी, गायसागर, चक्रवती नदीवरील विहीर, महावीर नगरमधील नळयोजनेची विहीर या चार ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या वर्धा नदीला मुबलक पाणी आहे. त्यामुळे मुख्य नळयोजनेला पाण्याची कमतरता पडणार नाही.

- तीन महत्त्वपूर्ण जलस्रोतांना ‘चार्ज’ करण्यासाठी दत्तापूर व घोटी तलावाचे पाणी सोडले जाणार आहे. वर्धा नदीच्या पात्रामध्ये खोदण्यात आलेल्या विहिरीतून कळंब शहराला पाणीपुरवठा केला जातो.

- वाढलेली लोकसंख्या व जीर्ण झालेली नळयोजनेला लक्षात घेता बेंबळा धरणावरून नवीन नळयोजना सुरू करण्याची कळंबवासीयांची मागणी आहे. यावर्षी पाणीप्रश्न निर्माण झाला नसला तरी भविष्यातील उपाययोजना म्हणून हा प्रयोग अपेक्षित आहे.

नियमित पाणीपुरवठ्याचा प्रयत्न

शहरासाठी चार ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकदा विजेअभावी पाणीपुरवठा खंडित होतो.  सध्या तीन-चार दिवसाआड पाणी सोडले जात आहे. चक्रवती नदीला प्रकल्पाचे पाणी सोडून नदीकाठावरील सर्व जलस्रोतांच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.  - नंदू परळकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कळंब

कळंब तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याचे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध आहे. काही गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.- सुभाष मानकर, गटविकास अधिकारी, कळंब

 

टॅग्स :Waterपाणीriverनदी