शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या प्रतापाने हरभरा पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:22 IST

जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला.

ठळक मुद्देढाणकी-साखरा : उपकेंद्रावरून वेळी-अवेळी वीज पुरवठा, शेतकऱ्यांचे गणित बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला.अस्मानी संकटासह जाणीवपूर्वक दिल्या जाणाऱ्या सुलतानी संकटामुळे श९तकरी त्रस्त आहे. यातून अन्नदात्याचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे. ढाणकी, साखरा येथील वीज केंद्रावरून पुरवठा होणाऱ्या गावातील शेतकरी अडचणीत सापडले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले जाते. यातून अवेळी आलेल्या विजेमुळे रात्रभर मोटरपंप सुरू राहिल्याने शेकडो हेक्टरवरील हरभरा पाण्याखाली गेला.या संदर्भात विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाºयाशी संपर्क साधला असता ढाणकी व साखरा येथील दोन्ही केंद्रांच्या जबाबदार अभियंत्यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी मुजोरी कायम ठेवली. या दोन्ही केंद्रावरून सातत्याने शेतकऱ्यांना मानासिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. या परिसरात वीज कपात नियमांतर्गत शेतीसाठी केवळ ८ तास वीज पुरवठा केला जातो. मात्र हा पुरवठा कमी दाबाचा असतो. बहुतांश शेतकºयांनी या खंडित वीज समस्येमुळे मोटरपंपास आॅटो स्विच बसविले. मात्र कधीही वीज येत असल्याने संपूर्ण शेत पाण्याखाली जात आहे.आॅटो स्वीचमुळे शेतात साचले पाणीचातारी-मानकेश्वर फिडरवर सोमवार ते गुरुवार, शुक्रवार ते रविवार या काळात वेगवेगळ्या वेळी वुज पुरवठा होतो. मात्र वेळापत्रकाबाबत पूर्वसूचना न देताच अचानक बदल केला जातो. गुरुवार, ३ जानेवारीला १0.३0 पासून ते सकाळी ८.३0 वाजतापर्यंत तीन फेज वीज पुरवठा सुरू होता. निश्चित वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांनी ओलिताचे नियोजन केले होते. मात्र महावितरणने अचानक केलेल्या वीज पुरवठ्याने आॅटो स्विचमुळे रात्रीच मोटरपंप सुरू झाले अन् शेतात सर्वत्र पाणीच पाणी पसरले. यामुळे अनेक शेतकºयांच्या हरबरा, गहु, ज्वारी, ऊस पिकात पाणी साचले. शिवाय लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. संबंधित लाईनमनलाही या बदलाची माहिती नव्हती. सहाय्यक अभियंता नाईक यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती