शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे पितळ २४ तासात उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:50 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.

ठळक मुद्देगोदणी रोडवरील प्रकार : रबर पॅकिंग तकलादू, पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.भारत सरकारच्या महानेट प्रकल्पाचे काम करताना मजीप्राच्या मुख्य जलवाहिनीला मोठे छीद्र पडले. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहात गेले. याविषयी पोलिसात तक्रार करण्यात आली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. मात्र याठिकाणी प्राधिकरण अधिकाऱ्यांचा अनुभवशून्यतेचा परिचय आला. जवळपास ३०० एमएमच्या या पाईपलाईनचे रबर पॅकिंग करण्यात आले. काम ओके झाल्याचा समज करत सोमवारी पाणीपुरवठ्यासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु फुटलेल्या पाईपमधून पाणी वाहू लागल्याने पुरवठा बंद करण्यात आला.सदर काम करताना सुरुवातीला खराब झालेला संपूर्ण भाग काढून टाकला जाणार होता. मात्र केवळ रबर पॅकिंगचा निर्णय घेण्यात आला. हाच प्राधिकरणाच्या अंगलट आला आहे. कित्येक वर्षांपासून या विभागात काम करणारे अभियंते आणि कंत्राटदारांना सदर काम कशा पद्धतीने केले जावे, हे कळू नये याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे दोन ठिकाणचा कारभार आहे. आठवड्यातून तीन दिवस ते यवतमाळला देतात. कामांमध्ये केवळ चालढकल सुरू आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी उपविभागाकडे असल्याने कार्यकारी अभियंते निश्चिंत असल्याचे सांगितले जाते. प्राधिकरणाकडून होत असलेली अनेक कामे निकृष्ट केली जात असल्याने समस्या वाढत असल्याची ओरड आहे.साधारण कामासाठी तीन दिवसमहानेटच्या कामामुळे फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल तीन दिवस लावण्यात आले. केवळ ३०० एमएमची ही पाईपलाईन आहे. भविष्यात एक हजार एमएमची कामे या विभागाला करावी लागणार आहे. अशावेळी दुरुस्तीसाठी किती कालावधी खाणार हा चिंतायुक्त प्रश्न आहे. अमरावतीसारख्या ठिकाणी हजार एमएमची लाईन दुरुस्तीसाठी केवळ एक दिवस लागतो. यवतमाळात मात्र अनेक दिवस घेतात. अनुभवशून्य आणि चालढकल करणारे कंत्राटदार या विभागात आहेत. त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवत आहे. विशेष म्हणजे, शहरातील छोट्या पाईपलाईन दुरुस्तीची कामे करणारा कंत्राटदार बेंबळाची एक हजार एमएमची पाईपलाईन टाकत आहे. कामे देताना प्राधिकरणाकडूनही योग्य व्यक्तीची निवड होत नसल्याचे स्पष्ट होते.