शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे पितळ २४ तासात उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:50 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.

ठळक मुद्देगोदणी रोडवरील प्रकार : रबर पॅकिंग तकलादू, पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.भारत सरकारच्या महानेट प्रकल्पाचे काम करताना मजीप्राच्या मुख्य जलवाहिनीला मोठे छीद्र पडले. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहात गेले. याविषयी पोलिसात तक्रार करण्यात आली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. मात्र याठिकाणी प्राधिकरण अधिकाऱ्यांचा अनुभवशून्यतेचा परिचय आला. जवळपास ३०० एमएमच्या या पाईपलाईनचे रबर पॅकिंग करण्यात आले. काम ओके झाल्याचा समज करत सोमवारी पाणीपुरवठ्यासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु फुटलेल्या पाईपमधून पाणी वाहू लागल्याने पुरवठा बंद करण्यात आला.सदर काम करताना सुरुवातीला खराब झालेला संपूर्ण भाग काढून टाकला जाणार होता. मात्र केवळ रबर पॅकिंगचा निर्णय घेण्यात आला. हाच प्राधिकरणाच्या अंगलट आला आहे. कित्येक वर्षांपासून या विभागात काम करणारे अभियंते आणि कंत्राटदारांना सदर काम कशा पद्धतीने केले जावे, हे कळू नये याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे दोन ठिकाणचा कारभार आहे. आठवड्यातून तीन दिवस ते यवतमाळला देतात. कामांमध्ये केवळ चालढकल सुरू आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी उपविभागाकडे असल्याने कार्यकारी अभियंते निश्चिंत असल्याचे सांगितले जाते. प्राधिकरणाकडून होत असलेली अनेक कामे निकृष्ट केली जात असल्याने समस्या वाढत असल्याची ओरड आहे.साधारण कामासाठी तीन दिवसमहानेटच्या कामामुळे फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल तीन दिवस लावण्यात आले. केवळ ३०० एमएमची ही पाईपलाईन आहे. भविष्यात एक हजार एमएमची कामे या विभागाला करावी लागणार आहे. अशावेळी दुरुस्तीसाठी किती कालावधी खाणार हा चिंतायुक्त प्रश्न आहे. अमरावतीसारख्या ठिकाणी हजार एमएमची लाईन दुरुस्तीसाठी केवळ एक दिवस लागतो. यवतमाळात मात्र अनेक दिवस घेतात. अनुभवशून्य आणि चालढकल करणारे कंत्राटदार या विभागात आहेत. त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवत आहे. विशेष म्हणजे, शहरातील छोट्या पाईपलाईन दुरुस्तीची कामे करणारा कंत्राटदार बेंबळाची एक हजार एमएमची पाईपलाईन टाकत आहे. कामे देताना प्राधिकरणाकडूनही योग्य व्यक्तीची निवड होत नसल्याचे स्पष्ट होते.