शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंना जगविणारी वर्धा नदी मरणाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:12 IST

सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते.

ठळक मुद्देपूर्वी बारमाही.. आता कधीच नाही : ३०० तालुक्यांतील जनजीवनावर परिणाम, पुनरुज्जीवनाची गरज

के.एस.वर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते. वर्धा नदीचा असाच ऱ्हास होत राहिला तर काही वर्षात तिचे केवळ नावच शिल्लक राहण्याचा धोका आहे.एकेकाळी हिरवागार राहणारा वर्धा नदीकाठावरील परिसर आता ओसाड होत चालला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या शेतीचे सिंचन, ग्रामीण-शहरी भागातील नळयोजना, जनावरांसाठी उपलब्ध पाणी आणि चारा, मासे उत्पादन, टरबुज, डांगर, शिंगाडे आदींची शेती, नदीमुळे आसपासच्या गावात टिकून असलेली भूजल पातळी, उद्योग व्यवसाय आदी गोष्टींवर आताच परिणाम होऊ लागला आहे.देशात नदीजोड प्रकल्पाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही ठिकाणी त्यावर कामेही सुरू झाली आहे. गंगा स्वच्छता अभियानावरही कोट्यवधी रुपये खर्च केल्या जात आहे. नमामी गंगे, नर्मदा परिक्रमा आदी कार्यक्रमांद्वारे या नद्यांचे महत्व समजून ते टिकविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. राजस्थानमधील जलदूत राजेंद्र सिंग यांनी लोकचळवळ उभारून दुष्काळाच्या छायेत मृतप्राय झालेल्या विविध नद्या बारामाही वाहत्या केल्या आहे. वर्धा नदी कोरडी पडल्याने परिसरातील नळयोजना, विहिरी, हातपंप कोरडे पडले. त्यामुळे नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना टँकर वा तत्सम साधनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे, विविध उपाययोजना करण्यात पर्यायाने जनतेचा पैसा खर्च होत आहे.वर्धा नदी बारामाही वाहती राहावी याकरिता शासनस्तरावर कृती आराखडा बनवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तोपर्यंत नदीपात्राच्या परिसरातील गावे, शहरे, तालुके, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या परीने लोकचळवळ उभारून वर्धा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. नदीपात्रात उभी नांगरणी करणे, नदीपात्र खोल व रूंद करणे, पात्राच्या कडेचे क्षेत्र स्वच्छ, साफ करून मोकळे करणे आवश्यक आहे. याकरिता अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील धुरिणांनी आपआपला सहयोग मे-जून महिन्यात देणे आवश्यक झाले आहे.असा आहे वर्धा नदीचा उदयास्तवर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातून झाला आहे. बैतुल जिल्ह्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून ती वाहते. ३०० किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी ही विदर्भातील महत्त्वपूर्ण नदी गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वैनगंगा नदीत विलीन होते.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी