शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

लाखोंना जगविणारी वर्धा नदी मरणाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:12 IST

सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते.

ठळक मुद्देपूर्वी बारमाही.. आता कधीच नाही : ३०० तालुक्यांतील जनजीवनावर परिणाम, पुनरुज्जीवनाची गरज

के.एस.वर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते. वर्धा नदीचा असाच ऱ्हास होत राहिला तर काही वर्षात तिचे केवळ नावच शिल्लक राहण्याचा धोका आहे.एकेकाळी हिरवागार राहणारा वर्धा नदीकाठावरील परिसर आता ओसाड होत चालला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या शेतीचे सिंचन, ग्रामीण-शहरी भागातील नळयोजना, जनावरांसाठी उपलब्ध पाणी आणि चारा, मासे उत्पादन, टरबुज, डांगर, शिंगाडे आदींची शेती, नदीमुळे आसपासच्या गावात टिकून असलेली भूजल पातळी, उद्योग व्यवसाय आदी गोष्टींवर आताच परिणाम होऊ लागला आहे.देशात नदीजोड प्रकल्पाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही ठिकाणी त्यावर कामेही सुरू झाली आहे. गंगा स्वच्छता अभियानावरही कोट्यवधी रुपये खर्च केल्या जात आहे. नमामी गंगे, नर्मदा परिक्रमा आदी कार्यक्रमांद्वारे या नद्यांचे महत्व समजून ते टिकविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. राजस्थानमधील जलदूत राजेंद्र सिंग यांनी लोकचळवळ उभारून दुष्काळाच्या छायेत मृतप्राय झालेल्या विविध नद्या बारामाही वाहत्या केल्या आहे. वर्धा नदी कोरडी पडल्याने परिसरातील नळयोजना, विहिरी, हातपंप कोरडे पडले. त्यामुळे नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना टँकर वा तत्सम साधनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे, विविध उपाययोजना करण्यात पर्यायाने जनतेचा पैसा खर्च होत आहे.वर्धा नदी बारामाही वाहती राहावी याकरिता शासनस्तरावर कृती आराखडा बनवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तोपर्यंत नदीपात्राच्या परिसरातील गावे, शहरे, तालुके, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या परीने लोकचळवळ उभारून वर्धा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. नदीपात्रात उभी नांगरणी करणे, नदीपात्र खोल व रूंद करणे, पात्राच्या कडेचे क्षेत्र स्वच्छ, साफ करून मोकळे करणे आवश्यक आहे. याकरिता अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील धुरिणांनी आपआपला सहयोग मे-जून महिन्यात देणे आवश्यक झाले आहे.असा आहे वर्धा नदीचा उदयास्तवर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातून झाला आहे. बैतुल जिल्ह्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून ती वाहते. ३०० किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी ही विदर्भातील महत्त्वपूर्ण नदी गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वैनगंगा नदीत विलीन होते.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी