शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंना जगविणारी वर्धा नदी मरणाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:12 IST

सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते.

ठळक मुद्देपूर्वी बारमाही.. आता कधीच नाही : ३०० तालुक्यांतील जनजीवनावर परिणाम, पुनरुज्जीवनाची गरज

के.एस.वर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते. वर्धा नदीचा असाच ऱ्हास होत राहिला तर काही वर्षात तिचे केवळ नावच शिल्लक राहण्याचा धोका आहे.एकेकाळी हिरवागार राहणारा वर्धा नदीकाठावरील परिसर आता ओसाड होत चालला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या शेतीचे सिंचन, ग्रामीण-शहरी भागातील नळयोजना, जनावरांसाठी उपलब्ध पाणी आणि चारा, मासे उत्पादन, टरबुज, डांगर, शिंगाडे आदींची शेती, नदीमुळे आसपासच्या गावात टिकून असलेली भूजल पातळी, उद्योग व्यवसाय आदी गोष्टींवर आताच परिणाम होऊ लागला आहे.देशात नदीजोड प्रकल्पाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही ठिकाणी त्यावर कामेही सुरू झाली आहे. गंगा स्वच्छता अभियानावरही कोट्यवधी रुपये खर्च केल्या जात आहे. नमामी गंगे, नर्मदा परिक्रमा आदी कार्यक्रमांद्वारे या नद्यांचे महत्व समजून ते टिकविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. राजस्थानमधील जलदूत राजेंद्र सिंग यांनी लोकचळवळ उभारून दुष्काळाच्या छायेत मृतप्राय झालेल्या विविध नद्या बारामाही वाहत्या केल्या आहे. वर्धा नदी कोरडी पडल्याने परिसरातील नळयोजना, विहिरी, हातपंप कोरडे पडले. त्यामुळे नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना टँकर वा तत्सम साधनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे, विविध उपाययोजना करण्यात पर्यायाने जनतेचा पैसा खर्च होत आहे.वर्धा नदी बारामाही वाहती राहावी याकरिता शासनस्तरावर कृती आराखडा बनवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तोपर्यंत नदीपात्राच्या परिसरातील गावे, शहरे, तालुके, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या परीने लोकचळवळ उभारून वर्धा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. नदीपात्रात उभी नांगरणी करणे, नदीपात्र खोल व रूंद करणे, पात्राच्या कडेचे क्षेत्र स्वच्छ, साफ करून मोकळे करणे आवश्यक आहे. याकरिता अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील धुरिणांनी आपआपला सहयोग मे-जून महिन्यात देणे आवश्यक झाले आहे.असा आहे वर्धा नदीचा उदयास्तवर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातून झाला आहे. बैतुल जिल्ह्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून ती वाहते. ३०० किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी ही विदर्भातील महत्त्वपूर्ण नदी गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वैनगंगा नदीत विलीन होते.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी