शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षातील कर्ज पुनर्गठनाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 8, 2016 02:09 IST

तालुक्यात २०१२-१३ या वर्षामध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर सतत तीन वर्षे कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे.

दिग्रस : तालुक्यात २०१२-१३ या वर्षामध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर सतत तीन वर्षे कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे. म्हणूनच मागील दोन वर्षातील थकीत पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. शासनाने २०१४-१५ व २०१५-१६ मधील थकीत शेतकऱ्यांना पीककर्जाचे पुनर्गठन करून पुन्हा कर्ज दिले. मात्र अतिवृष्टी व नापिकीत सापडलेल्या २०१२-१३ ते २०१४ या वर्षामधील पीडित शेतकरी पीककर्जाचा भरणा करू शकलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर शासनाने एक प्रकारे अन्यायच केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील २५ सहकारी सोसायटीमधील २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षामधील थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा घेतल्यास साधारण दीड हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांची संख्या आहे. तालुक्यातील आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असताना व तीन-चार वर्षांपासून नापिकी असताना यंदा पेरणी कशी करावी, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तीन-चार वर्षापासून बँकेचे पीककर्ज थकल्यामुळे नवीन कर्जासाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहे. खासगी सावकारांनी कर्ज देणे बंद केले आहे. नापिकीच्या काळात कर्ज न मिळाल्यास २०१२-१३ मधील थकीत शेतकऱ्यांना शेती विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. (शहर प्रतिनिधी)