शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

दोन वर्षातील कर्ज पुनर्गठनाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 8, 2016 02:09 IST

तालुक्यात २०१२-१३ या वर्षामध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर सतत तीन वर्षे कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे.

दिग्रस : तालुक्यात २०१२-१३ या वर्षामध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर सतत तीन वर्षे कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे. म्हणूनच मागील दोन वर्षातील थकीत पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. शासनाने २०१४-१५ व २०१५-१६ मधील थकीत शेतकऱ्यांना पीककर्जाचे पुनर्गठन करून पुन्हा कर्ज दिले. मात्र अतिवृष्टी व नापिकीत सापडलेल्या २०१२-१३ ते २०१४ या वर्षामधील पीडित शेतकरी पीककर्जाचा भरणा करू शकलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर शासनाने एक प्रकारे अन्यायच केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील २५ सहकारी सोसायटीमधील २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षामधील थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा घेतल्यास साधारण दीड हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांची संख्या आहे. तालुक्यातील आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असताना व तीन-चार वर्षांपासून नापिकी असताना यंदा पेरणी कशी करावी, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तीन-चार वर्षापासून बँकेचे पीककर्ज थकल्यामुळे नवीन कर्जासाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहे. खासगी सावकारांनी कर्ज देणे बंद केले आहे. नापिकीच्या काळात कर्ज न मिळाल्यास २०१२-१३ मधील थकीत शेतकऱ्यांना शेती विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. (शहर प्रतिनिधी)