शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

ग्रामीण बांधकामांसाठी शेकडो कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

२५-१५ या लेखाशिर्षातून गावांमध्ये रस्ते, नाल्या, समाज मंदिर, रपटे या सारखी कामे केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यांंपासून या कामांना निधीच्या टंचाईचे ग्रहण लागले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये या कामांसाठी ३० कोटी ५७ लाख ५० हजार तर २०१९-२० साठी २८ कोटी २८ लाखांचा निधी लागणार आहे. २०१८-१९ मधील ९१२ कामे मंजूर होती. यातील यवतमाळच्या विशेष प्रकल्प विभागातील ९९ लाख ४४ हजार रुपये शिल्लक आहेत.

ठळक मुद्देगाव विकासांची कामे रखडली : उपलब्ध निधी वळविण्याचे प्रयत्न, ‘पीडब्ल्यूडी’ला हवे ५८ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या २५-१५ या लेखाशिर्षाअंतर्गत ग्रामीण भागात गावांच्या विकासाची कामे केली जातात. परंतु शासनाकडून निधी न आल्याने ही कामे प्रलंबित आहे. या कामांसाठी ग्रामीण विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला शेकडो कोटींची आवश्यकता आहे.२५-१५ या लेखाशिर्षातून गावांमध्ये रस्ते, नाल्या, समाज मंदिर, रपटे या सारखी कामे केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यांंपासून या कामांना निधीच्या टंचाईचे ग्रहण लागले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये या कामांसाठी ३० कोटी ५७ लाख ५० हजार तर २०१९-२० साठी २८ कोटी २८ लाखांचा निधी लागणार आहे. २०१८-१९ मधील ९१२ कामे मंजूर होती. यातील यवतमाळच्या विशेष प्रकल्प विभागातील ९९ लाख ४४ हजार रुपये शिल्लक आहेत. मंजूर परंतु सुरू न झालेल्या कामांचा हा निधी आहे. तर दुसरीकडे कामे पूर्ण करूनही देयके प्रलंबित आहे. प्रलंबित देयके मार्गी लावण्यासाठी उपरोक्त ९९ लाखांचा निधी वळविण्याची मागणी कंत्राटदारांमधून होत आहे.जिल्हा परिषदेचा विचार केल्यास या लेखाशिर्षाअंतर्गत किमान ७० ते ८० कोटी रुपये ग्रामीण विकासासाठी लागणार आहे. त्यातही सर्वाधिक ६६ कोटींची कामे एकाच विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी केली गेली होती. पूर्वी ‘एलआरएस’ प्रणालीनुसार निधी शासनाकडून खात्यात टाकला जात होता. आता पुन्हा ‘बीडीएस’प्रणाली अवलंबिली जात आहे. त्यानुसार हा निधी कार्यकारी अभियंता किंवा वित्त विभागामार्फत दिला जातो.जिल्हा परिषदेच्या निधीला कुणीही मध्यस्थ नाही. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीसाठी मध्यस्थ असून एका विभागाची मंजुरी घ्यावी लागते. देयके न निघाल्याने गावखेड्यातील छोटे कंत्राटदार त्रस्त आहेत. उपलब्ध निधी वळवून देयके मंजूर करण्याची मागणी होत आहे.राज्यात हवे एक हजार २५० कोटी रुपयेराज्यात २५-१५ या लेखाशिर्षाअंतर्गत एक हजार २५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती आहे. जुन्या भाजप-सेना सरकारमध्ये भाजप आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ही कामे केली गेली होती. पुन्हा सरकार आल्यास निधी देण्याचीही तयारी झाली. मात्र राज्यातील सरकार बदलले. नव्या सरकारने राजकीय डावपेच म्हणून या कामांना पैसाच दिला नाही, पैसे देताना विलंब केला. मार्च महिन्यात दुसरा हप्ता देण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामीण विकासाला हातभार लावणाऱ्या कंत्राटदारांची व त्यांच्या भूमिकेत वावरणाºया काही राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास