शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

ग्रामीण बांधकामांसाठी शेकडो कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

२५-१५ या लेखाशिर्षातून गावांमध्ये रस्ते, नाल्या, समाज मंदिर, रपटे या सारखी कामे केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यांंपासून या कामांना निधीच्या टंचाईचे ग्रहण लागले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये या कामांसाठी ३० कोटी ५७ लाख ५० हजार तर २०१९-२० साठी २८ कोटी २८ लाखांचा निधी लागणार आहे. २०१८-१९ मधील ९१२ कामे मंजूर होती. यातील यवतमाळच्या विशेष प्रकल्प विभागातील ९९ लाख ४४ हजार रुपये शिल्लक आहेत.

ठळक मुद्देगाव विकासांची कामे रखडली : उपलब्ध निधी वळविण्याचे प्रयत्न, ‘पीडब्ल्यूडी’ला हवे ५८ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या २५-१५ या लेखाशिर्षाअंतर्गत ग्रामीण भागात गावांच्या विकासाची कामे केली जातात. परंतु शासनाकडून निधी न आल्याने ही कामे प्रलंबित आहे. या कामांसाठी ग्रामीण विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला शेकडो कोटींची आवश्यकता आहे.२५-१५ या लेखाशिर्षातून गावांमध्ये रस्ते, नाल्या, समाज मंदिर, रपटे या सारखी कामे केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यांंपासून या कामांना निधीच्या टंचाईचे ग्रहण लागले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये या कामांसाठी ३० कोटी ५७ लाख ५० हजार तर २०१९-२० साठी २८ कोटी २८ लाखांचा निधी लागणार आहे. २०१८-१९ मधील ९१२ कामे मंजूर होती. यातील यवतमाळच्या विशेष प्रकल्प विभागातील ९९ लाख ४४ हजार रुपये शिल्लक आहेत. मंजूर परंतु सुरू न झालेल्या कामांचा हा निधी आहे. तर दुसरीकडे कामे पूर्ण करूनही देयके प्रलंबित आहे. प्रलंबित देयके मार्गी लावण्यासाठी उपरोक्त ९९ लाखांचा निधी वळविण्याची मागणी कंत्राटदारांमधून होत आहे.जिल्हा परिषदेचा विचार केल्यास या लेखाशिर्षाअंतर्गत किमान ७० ते ८० कोटी रुपये ग्रामीण विकासासाठी लागणार आहे. त्यातही सर्वाधिक ६६ कोटींची कामे एकाच विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी केली गेली होती. पूर्वी ‘एलआरएस’ प्रणालीनुसार निधी शासनाकडून खात्यात टाकला जात होता. आता पुन्हा ‘बीडीएस’प्रणाली अवलंबिली जात आहे. त्यानुसार हा निधी कार्यकारी अभियंता किंवा वित्त विभागामार्फत दिला जातो.जिल्हा परिषदेच्या निधीला कुणीही मध्यस्थ नाही. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीसाठी मध्यस्थ असून एका विभागाची मंजुरी घ्यावी लागते. देयके न निघाल्याने गावखेड्यातील छोटे कंत्राटदार त्रस्त आहेत. उपलब्ध निधी वळवून देयके मंजूर करण्याची मागणी होत आहे.राज्यात हवे एक हजार २५० कोटी रुपयेराज्यात २५-१५ या लेखाशिर्षाअंतर्गत एक हजार २५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती आहे. जुन्या भाजप-सेना सरकारमध्ये भाजप आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ही कामे केली गेली होती. पुन्हा सरकार आल्यास निधी देण्याचीही तयारी झाली. मात्र राज्यातील सरकार बदलले. नव्या सरकारने राजकीय डावपेच म्हणून या कामांना पैसाच दिला नाही, पैसे देताना विलंब केला. मार्च महिन्यात दुसरा हप्ता देण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामीण विकासाला हातभार लावणाऱ्या कंत्राटदारांची व त्यांच्या भूमिकेत वावरणाºया काही राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास