शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे शेतात पोहोचली ‘विकासगंगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:39 PM

सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीवेने काम केल्यास सर्वसामान्यांच्या जगण्यात परिवर्तन घडण्यास वेळ लागत नाही. घाटंजी येथील सामाजिक संस्थेने हीच जबाबदारी पार पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ‘विकासगंगा’ आणली आहे.

ठळक मुद्देघाटंजी, नेर : धरणातील गाळ वापरून वाढविले उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीवेने काम केल्यास सर्वसामान्यांच्या जगण्यात परिवर्तन घडण्यास वेळ लागत नाही. घाटंजी येथील सामाजिक संस्थेने हीच जबाबदारी पार पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ‘विकासगंगा’ आणली आहे. एकीकडे जलसमृद्धी आणि दुसरीकडे गाळ टाकून शेतीसमृद्धी साधण्यात आली आहे.घाटंजी येथील विकासगंगा संस्थेच्या माध्यमातून ही कामगिरी पार पडली. नेर तालुक्यातील शिंगाडोह प्रकल्पाचा उन्हाळ्यात उपसा करण्यात आला. त्यातील गाळ शेतकºयांना मोफत पुरविण्यात आला. उत्तरवाढोना येथील शेतकरी प्रितम राठोड यांनी या गाळाचा उत्तम वापर केला. या शेतकºयाकडे सहा एकर शेती असून चार एकरमध्ये धरणातील गाळ टाकला. पाऊस लवकर आल्याने दोन एकरमध्ये गाळ टाकणे शक्य झाले नाही. या शेतात सहा एकरमध्ये सोयाबीनचे पीक घेतले. गाळ टाकलेल्या जागेत एकरी साडेसात क्विंटल व गाळ न टाकलेल्या जागेत एकरी साडेचार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले.त्याचवेळी विकासगंगा संस्थेतर्फे घाटंजी तालुक्यातील घोटी लघुप्रकल्पाचाही उपसा करण्यात आला. तेथील गाळ शेतकºयांना देण्यात आला. घोटी येथील शेतकरी जितेंद्र खडतरे यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यांनी दोन एकरमध्ये धरणातील गाळ टाकला आहे. या शेतात एक एकरमध्ये कापूस व एक एकरमध्ये पाषाणभेद या औषधी वनस्पतीचे पीक घेतले. पिकास कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत वापरलेले नाही. रसायनमुक्त शेती केली. तसेच फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्काचा वापर केला. त्यामुळे शेतीवरील खर्चात बचत झाली असून पीकही जोमदार आहे. गाळ टाकलेल्या जागेत एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. गाळामुळे भुसभुशीत झालेल्या जागेत पाषाणभेद या कंदवर्गीय औषधी वनस्पतीची उत्तम वाढ झाल्याने एकरी सात क्विंटल वाळलेल्या मुळांचे उत्पादन मिळणार आहे. पाषाणभेद लावलेल्या शेतात गाळ टाकलेल्या व गाळ न टाकलेल्या जागेवरील पिकाच्या वाढीमध्ये फरक दिसून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती