शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या हवामानाने कीड नियंत्रण करणेही अशक्य होत आहे. व्यापारी नफा ठेवून शेतमालाची विक्री करतात. हा नियम शेतकऱ्यांसाठी मात्र पायदळी तुडवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परंपरागत पिकाला पर्याय म्हणून नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड करण्यात येते. तत्काळ पैसे हातात येतात. या मोहापायी अनेक जण भाजीपाला लावतात, मात्र विक्रीसाठी गेल्यावर हातात पैसे येत नाहीत. उलट खिशातून पैसे जातात. शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या हवामानाने कीड नियंत्रण करणेही अशक्य होत आहे. व्यापारी नफा ठेवून शेतमालाची विक्री करतात. हा नियम शेतकऱ्यांसाठी मात्र पायदळी तुडवण्यात आला आहे. वाटेल त्या दरात शेतमालाची खरेदी करायची आणि ग्राहकांना नफा ठेवून विक्री करायची, असेच समीकरण आहे.  

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना... 

यावर्षी मी अडीच एकरमध्ये भाजीपाला लावला होता. वांगे दोन वेळेस जळाले. बरबटी दीड एकरामध्ये लावली आहे. त्याचा तोडण्याचा खर्च ७०० रुपये होता. हातात ५०० रुपयांची पट्टी आली. - प्रवीण ठाकरे

भाजीपाला लावणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. साधा निंदणाचा खर्चही निघत नाही. हातात पाच पैसे पडत नाहीत. एखाद्या वेळेस भाव मिळतो, मात्र बारमाही भाजीपाल्याचे दर पडलेलेच असतात. याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो. - अविनाश तिडके

ग्राहकांना परवडेना 

कोरोनामुळे रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पैसा महत्त्वाचा असताना महागड्या दरात भाजीपाला खरेदी करणे परवडत नाही. प्रत्येकांस आहारामध्ये विविध जीवनसत्त्व मिळविण्यासाठी भाजी घ्यावी लागते.        - रोशनी देवकते

मुख्य बाजारपेठेतील शेतमालाचे दर आणि भाजी मंडीतील शेतमालाचे दर यामध्ये दरवेळेस मोठी तफावत पाहायला मिळते. याच प्रमुख कारणाने मोठ्या मंडीतून भाजीपाल्याची खरेदी होते. - प्रियंका वानखडे

भावात एवढा फरक का?भाजीपाल्याची खरेदी करताना त्याची बोली लावली जाते. ही बोली कमीत कमी किती रुपयांची असावी, याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. यामुळे व्यापारी वाटेल तितक्या दरापासून खरेदीसाठी सर्रास सुरू करतात. खरेदी झालेला शेतमाल विक्रीसाठी निर्बंध नाही. नफा ठरवून विक्री होते.

 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या