शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

हंडाभर पाण्यासाठी गेला वेदिकाचा जीव ! 'हर घर जल' योजनेचे कोट्यवधी खर्च केले कुठे?

By शुभांगी काळमेघ | Updated: April 18, 2025 15:25 IST

Yavatmal : २०१९ मध्ये सुरू झालेली 'हर घर जल' योजना वस्त्यांपर्यंत पोहचली का नाही?

यवतमाळ : उन्हाळा सुरु झाला की राज्यात दरवर्षी पाण्यासाठी होणारी पायपीट आपल्याला दिसते. पण राज्यात सर्वात जास्त उन्हाच्या कळा सोसणारा विदर्भातील 'हर घर जल' योजनेचे वास्तव काय आहे हे निदर्शनास आणून देणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कठोडा गावात घडली. पारधी वस्तीत राहणारी १२ वर्षांची वेदिका सुरेश चव्हाण हिला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला. वेदिका नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा अरुणावती नदीत बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

आर्णी तालुक्यातील कठोडा येथे पारधी वस्तीमधील वेदिका नेहमीप्रमाणे पाण्यासाठी नदीवर गेली पाय घसरून ती नदीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समोर येताच परिसरात शोककळा पसरली. कठोडा गावाजवळील पारधी वस्तीत आजही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महिलांना आणि मुलांना पाण्यासाठी रोज नदीकाठी जावं लागतं. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' योजना 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेत कठोडा वस्तीचा समावेश असूनही, प्रत्यक्षात एकही घर पाण्याने जोडलेलं नाही.

कठोडा गावात फक्त एक हातपंप असून तो संपूर्ण गावासाठी अपुरा आहे. या घटनेमुळे काठोडा गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण गावकऱ्यांपर्यंत पाणी आलंच नाही. मग हे पैसे गेले कुठे?” अशे प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.  वेदिकाच्या मृत्यूला थेट प्रशासन जबाबदार असल्याचं नातेवाईक आणि गावकरी म्हणत आहेत. 

आर्णी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या वस्तीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, एक निष्पाप जीव गमावल्यावर प्रशासनाला जाग येते, ही बाब दुर्दैवी आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातYavatmalयवतमाळarni-acअर्णी