शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

हंडाभर पाण्यासाठी गेला वेदिकाचा जीव ! 'हर घर जल' योजनेचे कोट्यवधी खर्च केले कुठे?

By शुभांगी काळमेघ | Updated: April 18, 2025 15:25 IST

Yavatmal : २०१९ मध्ये सुरू झालेली 'हर घर जल' योजना वस्त्यांपर्यंत पोहचली का नाही?

यवतमाळ : उन्हाळा सुरु झाला की राज्यात दरवर्षी पाण्यासाठी होणारी पायपीट आपल्याला दिसते. पण राज्यात सर्वात जास्त उन्हाच्या कळा सोसणारा विदर्भातील 'हर घर जल' योजनेचे वास्तव काय आहे हे निदर्शनास आणून देणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कठोडा गावात घडली. पारधी वस्तीत राहणारी १२ वर्षांची वेदिका सुरेश चव्हाण हिला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला. वेदिका नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा अरुणावती नदीत बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

आर्णी तालुक्यातील कठोडा येथे पारधी वस्तीमधील वेदिका नेहमीप्रमाणे पाण्यासाठी नदीवर गेली पाय घसरून ती नदीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समोर येताच परिसरात शोककळा पसरली. कठोडा गावाजवळील पारधी वस्तीत आजही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महिलांना आणि मुलांना पाण्यासाठी रोज नदीकाठी जावं लागतं. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' योजना 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेत कठोडा वस्तीचा समावेश असूनही, प्रत्यक्षात एकही घर पाण्याने जोडलेलं नाही.

कठोडा गावात फक्त एक हातपंप असून तो संपूर्ण गावासाठी अपुरा आहे. या घटनेमुळे काठोडा गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण गावकऱ्यांपर्यंत पाणी आलंच नाही. मग हे पैसे गेले कुठे?” अशे प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.  वेदिकाच्या मृत्यूला थेट प्रशासन जबाबदार असल्याचं नातेवाईक आणि गावकरी म्हणत आहेत. 

आर्णी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या वस्तीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, एक निष्पाप जीव गमावल्यावर प्रशासनाला जाग येते, ही बाब दुर्दैवी आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातYavatmalयवतमाळarni-acअर्णी