शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी गेला वेदिकाचा जीव ! 'हर घर जल' योजनेचे कोट्यवधी खर्च केले कुठे?

By शुभांगी काळमेघ | Updated: April 18, 2025 15:25 IST

Yavatmal : २०१९ मध्ये सुरू झालेली 'हर घर जल' योजना वस्त्यांपर्यंत पोहचली का नाही?

यवतमाळ : उन्हाळा सुरु झाला की राज्यात दरवर्षी पाण्यासाठी होणारी पायपीट आपल्याला दिसते. पण राज्यात सर्वात जास्त उन्हाच्या कळा सोसणारा विदर्भातील 'हर घर जल' योजनेचे वास्तव काय आहे हे निदर्शनास आणून देणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कठोडा गावात घडली. पारधी वस्तीत राहणारी १२ वर्षांची वेदिका सुरेश चव्हाण हिला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला. वेदिका नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा अरुणावती नदीत बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

आर्णी तालुक्यातील कठोडा येथे पारधी वस्तीमधील वेदिका नेहमीप्रमाणे पाण्यासाठी नदीवर गेली पाय घसरून ती नदीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समोर येताच परिसरात शोककळा पसरली. कठोडा गावाजवळील पारधी वस्तीत आजही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महिलांना आणि मुलांना पाण्यासाठी रोज नदीकाठी जावं लागतं. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' योजना 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेत कठोडा वस्तीचा समावेश असूनही, प्रत्यक्षात एकही घर पाण्याने जोडलेलं नाही.

कठोडा गावात फक्त एक हातपंप असून तो संपूर्ण गावासाठी अपुरा आहे. या घटनेमुळे काठोडा गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण गावकऱ्यांपर्यंत पाणी आलंच नाही. मग हे पैसे गेले कुठे?” अशे प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.  वेदिकाच्या मृत्यूला थेट प्रशासन जबाबदार असल्याचं नातेवाईक आणि गावकरी म्हणत आहेत. 

आर्णी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या वस्तीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, एक निष्पाप जीव गमावल्यावर प्रशासनाला जाग येते, ही बाब दुर्दैवी आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातYavatmalयवतमाळarni-acअर्णी