शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

वणीत बिल्डरांचं चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:31 IST

शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देखुलेआम रेती पुरवठा : घुग्गुस येथून टिप्परद्वारे आणली जाते वाळू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे. परंतु या सर्व प्रकाराकडे वणीच्या महसूल विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.सध्यास्थितीत तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव न झाल्यामुळे रेतीचा उपसा बंद आहे. आता हे रेतीघाट लिलाव करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. मात्र वणी परिसरातील रेती घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस येथील रेती तस्कर बिनधास्तपणे वणीत रेती आणून ती बिल्डरांना विकत आहे. गेल्या १२ मार्च रोजी वणी येथील बसस्थानकासमोरून एका टिप्परमधून चोरट्या मार्गाने रेती नेली जात होती. याबाबत तलाठी समाधान पाटील यांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी या वाहनाचा पाठलाग करून टिप्परला अडविले. या टिप्परची झडती घेतली असता, आतमध्ये तीन ब्रास रेती आढळून आली. त्यामुळे हे टिप्पर ताब्यात घेऊन संबंधित टिप्पर मालकाला तहसीलदारांनी दोन लाख ७५ हजार ९२० रूपयांचा दंड ठोठावला होता. वणी परिसरा हा क्षेत्रफळाने मोठा असून अनेक ठिकाणी बिल्डींगचे कामे सुरू आहे. तसेच शहरात अनेक शासकीय कामे मंजूर आहेत. मात्र हे काम सुरू करण्यासाठी रेतीच मिळत नसल्यामुळे सध्या हे काम ठप्प पडले आहे. परंतु बिल्डरांना मात्र बांधकामासाठी रेती कशी काय उपलब्ध होत आहे, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वर्धा नदीच्या पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रात्री १० ते पहाटेपर्यंत रेतीचा उपसा करून ती रेती वणी शहरात आणण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत महसूल विभाग अद्यापही मूग गीळून बसला आहे. १२ मार्च रोजी पकडलेल्या टिप्पर मालकाचा शोध घेऊन या रेती तस्करीच्या मुळाशी पोहोचले असते, तर अनेक तस्करांविरूद्ध कारवाई झाली असती. मात्र महसूल विभागाने केवळ दंड वसुल करण्यातच समाधान मानले.गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न अद्यापही अधुरेचवणी तालुक्यातील रेतीघाटांचा अद्यापही लिलाव करण्यात आला नाही. तालुक्यातील अनेक गोरगरिबांना व सर्वसामान्यांना शासनातर्फे घरकुल मंजुर करण्यात आले आहे. मात्र रेतीच नसल्यामुळे घर बांधायचे तरी कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही घरकुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. तसेच रेतीचे दर वाढविल्यामुळे ती रेती घेणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे.

टॅग्स :sandवाळू