शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वणीत बिल्डरांचं चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:31 IST

शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देखुलेआम रेती पुरवठा : घुग्गुस येथून टिप्परद्वारे आणली जाते वाळू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे. परंतु या सर्व प्रकाराकडे वणीच्या महसूल विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.सध्यास्थितीत तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव न झाल्यामुळे रेतीचा उपसा बंद आहे. आता हे रेतीघाट लिलाव करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. मात्र वणी परिसरातील रेती घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस येथील रेती तस्कर बिनधास्तपणे वणीत रेती आणून ती बिल्डरांना विकत आहे. गेल्या १२ मार्च रोजी वणी येथील बसस्थानकासमोरून एका टिप्परमधून चोरट्या मार्गाने रेती नेली जात होती. याबाबत तलाठी समाधान पाटील यांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी या वाहनाचा पाठलाग करून टिप्परला अडविले. या टिप्परची झडती घेतली असता, आतमध्ये तीन ब्रास रेती आढळून आली. त्यामुळे हे टिप्पर ताब्यात घेऊन संबंधित टिप्पर मालकाला तहसीलदारांनी दोन लाख ७५ हजार ९२० रूपयांचा दंड ठोठावला होता. वणी परिसरा हा क्षेत्रफळाने मोठा असून अनेक ठिकाणी बिल्डींगचे कामे सुरू आहे. तसेच शहरात अनेक शासकीय कामे मंजूर आहेत. मात्र हे काम सुरू करण्यासाठी रेतीच मिळत नसल्यामुळे सध्या हे काम ठप्प पडले आहे. परंतु बिल्डरांना मात्र बांधकामासाठी रेती कशी काय उपलब्ध होत आहे, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वर्धा नदीच्या पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रात्री १० ते पहाटेपर्यंत रेतीचा उपसा करून ती रेती वणी शहरात आणण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत महसूल विभाग अद्यापही मूग गीळून बसला आहे. १२ मार्च रोजी पकडलेल्या टिप्पर मालकाचा शोध घेऊन या रेती तस्करीच्या मुळाशी पोहोचले असते, तर अनेक तस्करांविरूद्ध कारवाई झाली असती. मात्र महसूल विभागाने केवळ दंड वसुल करण्यातच समाधान मानले.गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न अद्यापही अधुरेचवणी तालुक्यातील रेतीघाटांचा अद्यापही लिलाव करण्यात आला नाही. तालुक्यातील अनेक गोरगरिबांना व सर्वसामान्यांना शासनातर्फे घरकुल मंजुर करण्यात आले आहे. मात्र रेतीच नसल्यामुळे घर बांधायचे तरी कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही घरकुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. तसेच रेतीचे दर वाढविल्यामुळे ती रेती घेणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे.

टॅग्स :sandवाळू