शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिकविताना शिक्षकांकडून मोबाइलचा वापर; शिक्षण विभागाचं लक्ष कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:35 IST

Yavatmal : विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा खेळखंडोबा, शिक्षण विभाग लक्ष देणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : शाळेत विद्यार्थ्यांना शिकविताना मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत अनेक शाळांत शिक्षक सर्रास मोबाइलचा वापर करताना दिसून येत आहेत. यामुळे अध्यापनावर परिणाम होत आहे. तेव्हा शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन या प्रकाराला निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

मोबाईलचे फॅड हे सर्वांनाच लागले असून या मोबाईलवरून आता केवळ संपर्कच साधता येत नाही, तर विविध प्रकारच्या साईटस् मोबाईलवरच उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येकजण मोबाईलचा वापर करून आपली कामे करू लागला आहे. यामध्ये शिक्षकवर्गसुद्धा मागे राहिला नसल्याने अनेक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविताना आता शिक्षकवर्ग मोबाईलमधील विविध साईटस् उघडून करमणूक तसेच एकमेकांना संपर्क करून आपली कामे किंवा शाळाबाहेरील आपले अन्य व्यवसाय ऑन ड्युटी ऑनलाईन करू लागल्याने त्यांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याबाबतच्या तक्रारी विद्यार्थीच आपल्या पालकांकडे करू लागल्याने याबाबतची खरी परिस्थिती ही समोर येऊ लागली आहे. 

विद्यार्थ्यांना शिकविताना जर शिक्षकाला त्यांच्या शाळाबाहेरील कामासंदर्भातील काही निरोप मोबाईलवर आला, तर त्या शिक्षकाचे पूर्णपणे अध्यापनाकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत जर शिक्षक मुलांना शिकविण्याऐवजी जर मोबाईलवरील विविध साईटस् वर आपला वेळ घालवत असेल किंवा मोबाईलवरून आपली बाहेरील कामे सांभाळत असेल तर देशाची भावी पिढी कशी घडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मोबाईलबहाद्दर शिक्षकांना रंगेहाथ पकडून कारवाई करण्यासाठी फ्लाईंग स्कॉड नेमण्याचा निर्णय घेतला होता; मात्र काही वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रभावात सर्व शैक्षणिक प्रक्रिया ही ऑनलाईन झाली होती. त्यामुळे मोबाईल-शिक्षक आणि विद्यार्थी हे समीकरण निर्माण झाले होते; मात्र कोरोना जाऊन आज तीन ते चार वर्षे झाले असतानासुद्धा शाळेमध्ये ऑनलाइन व मोबाईलच्या वापराला कुठलेही निर्बंध लादण्यात आलेले दिसत नाही. त्यामुळेच की काय अनेक शाळांमध्ये शिक्षक हे आपल्या कामकाजावेळी मोबाईलचा वापर करीत असल्याच्या बाबी समोर येत आहेत. तेव्हा शिक्षण विभागाने याची दखल घेत या प्रकाराला निर्बंध घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना राबविणे तेवढेच गरजेचे झाले आहे. 

"जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षक यांचे मोबाईल शालेय कालावधीत संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांच्याकडे जमा करण्याबाबत यापूर्वीच निर्देश देण्यात आलेले आहेत."- स्नेहल काटकर, गटशिक्षणाधिकारी, वणी

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रYavatmalयवतमाळTeacherशिक्षक