शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

पीक विमा अर्जास नकारघंटा

By admin | Updated: July 29, 2016 02:18 IST

अर्ज तुटवड्यामुळे आधीच विलंब झालेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज स्वीकारण्यास काही राष्ट्रीयकृत बँकांनी नकार दिला आहे.

राष्ट्रीयीकृत बँका : शेतकऱ्यांत रोष, ‘मिशन’ने केली थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार यवतमाळ : अर्ज तुटवड्यामुळे आधीच विलंब झालेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज स्वीकारण्यास काही राष्ट्रीयकृत बँकांनी नकार दिला आहे. सावरखेडा, बोरीअरबसह अन्य काही गावच्या शेतकऱ्यांना याचा अनुभव आला. दरम्यान, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी बँकांच्या या वागणुकीची थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात तक्रार केली आहे. राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या प्रत्येकच शाखेपुढे पीक विम्याचे अर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. शेतकरी जास्त व अर्ज कमी, प्रत्येक पिकाला स्वतंत्र अर्ज यामुळे आधीच विम्याचा गोंधळ आहे. त्यातच बँकांनी आणखी अडसर निर्माण केला आहे. सावरखेडा येथील स्टेट बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांचा विमा अर्ज स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तर बोरीअरबच्या स्टेट बँकेने ज्या पिकासाठी कर्ज घेतले, त्याच पिकाचा विमा अर्ज हवा, अशी ताठर भूमिका घेतली आहे. सवना येथील सेंट्रल बँक, वडकी, मारेगाव, मोहदा येथे बँकांची लिंक फेल असल्यामुळे गर्दी वाढली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्येही अशी स्थिती आहे. बाहेर प्रचंड गर्दी असल्याने बँकेचे काऊंटर किती वाजेपर्यंत सुरू ठेवावे, याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश नाही. नियमानुसार राष्ट्रीयकृत बँकांचे काऊंटर ५.३० वाजताच्या आधी बंद होते. मात्र आता ते गर्दीमुळे सायंकाळनंतरही सुरू ठेवावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांचा लंच टाईमही अडचणीत आला आहे. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे बँकांच्या कामाची गती मंदावली आहे. याप्रकरणी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी विम्याच्या मुदतवाढीची मागणी केली आहे. शिवाय बँकांकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. (शहर वार्ताहर) महागाव स्टेट बँकेत वेगळाच अनुभव एकीकडे राष्ट्रीयकृत बँका ताठर भूमिका घेत असताना महागाव येथील शेतकऱ्यांना स्टेट बँकेचा वेगळाच अनुभव आला. पीककर्ज घेतलेल्या व पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांचा त्यांच्या बँक खात्यातून परस्पर हप्ता कापून विमा काढला जात आहे. शेतकऱ्यांना बँकेत येण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ७०० शेतकऱ्यांचा विमा परस्पर उतरविण्यात आला. काही शेतकरी मूळ एकंदरित जमिनीवर कर्जाची उचल करून नंतर त्याच जमिनीची हिस्सेवाटणी दाखवून पुन्हा कर्ज उचलत असल्याचा गंभीर प्रकारही पुढे आला आहे. शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यास वेळ लागत असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले.