शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

उद्धव ठाकरे यांना रामदास आठवलेंनी दिली उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

By रूपेश उत्तरवार | Updated: August 22, 2023 18:09 IST

यवतमाळमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा : लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा मागणार

यवतमाळ : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिपाइंमध्ये यावे, आम्ही त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद देऊ, अशी ऑफर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. मंगळवारी यवतमाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी निवडणूकीत लोकसभेसाठी दोन, तर विधानसभेच्या १५ जागा भाजपकडे मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यवतमाळात पक्षबांधणीसह कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना फुटीला उध्दव ठाकरे जबाबदार आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. यामुळे त्यांच्याकडून पक्षचिन्ह आणि पक्षही हिरावला गेला, असे ते म्हणाले. भाजप सर्व पक्षांना संपवायला निघाला आहे, असे म्हटले जात आहे. मात्र, तसे काहीच नाही, भाजपने एकट्याने सत्ता स्थापन केली नाही, तर सर्वांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली असल्याचे ते म्हणाले. 

येणाऱ्या निवडणुकीत मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा झेंडा मुंबईत फडकेल. विधानसभेसाठीच्या १५ जागा भाजपकडे मागू त्यातील पाच जागा विदर्भातील असतील असेही त्यांनी सांगितले. मणिपूर आता शांत होत आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तीन वेळा मणिपूरला भेट दिली आहे तरीही विरोधक या विषयावरुन लोकसभेचे सभागृह कामकाज रोखून व्यत्यय आणत आहे, हे बरोबर नाही, असे ते म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. कोणत्या वेळी कोणती भूमिका घ्यावी, हे त्यांना कळत नाही. मात्र, केव्हा कशी भूमिका घ्यावी, याच मला चांगल आकलन आहे अस ते म्हणाले. मोदींना हरवणे विरोधकांना शक्य नसल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला भूपेश थुलकर, दयाल बहादुरे, राजा सरोदे, बापुराव कदम, गौतम सोनवणे, सुधाकर तायडे, माेहन भोयर, महेंद्र मानकर, नवनीत महाजन, गोविंद मेश्राम, अश्वजित शेळके, राजन वाघमारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरे