शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

अब की बार भाजप तडीपार...राळेगावमध्ये उद्धव ठाकरे गरजले

By विशाल सोनटक्के | Updated: March 12, 2024 17:54 IST

आता 'अब की बार चारसौ पार'ची नव्हे तर 'अब की बार भाजप तडीपार'ची तयारी मतदार करीत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

राळेगाव (यवतमाळ) : याच यवतमाळमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपची सभा झाली. म्हणे, यवतमाळमध्ये सभा घेतली की भाजपला यश मिळते. हे पूर्वीचे झाले. तेव्हा ठाकरेंची शिवसेना सोबत होती. आता 'अब की बार चारसौ पार'ची नव्हे तर 'अब की बार भाजप तडीपार'ची तयारी मतदार करीत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणूक रोख्यावरूनही त्यांनी भाजपला चांगलेच फटकारले. मिळत असलेल्या माहितीनुसार, ५० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या खात्यात निवडणूक रोख्यातून ६०० कोटी जातात, तर दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपच्या खात्यात सहा ते सात हजार कोटी रुपये पडतात. यावरूनच कोणता पक्ष देशाला लुटत आहे हे स्पष्ट होते, असे सांगत भ्रष्टाचाराचे पाठीराखे असलेल्या भाजपला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राळेगाव येथील गांधी मैदानावर मंगळवारी दुपारी जनसंवाद सभा झाली. भरदुपारी झालेल्या या सभेला तळपत्या उन्हातही सुमारे २० हजारांवर नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित होता. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, दुपारचे अडीच वाजले आहेत. मात्र, उन्हाची पर्वा न करता तुम्ही एवढ्या प्रचंड गर्दीने भाषणासाठी थांबला आहात. यालाही भाग्य लागते. नाहीतर लाखोंची बिर्याणी चारूनही विरोधकांच्या सभेतील खुर्च्या रिकाम्या राहतात. तर इकडे एकही भाडोत्री आणलेला नसताना सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित आहे. यवतमाळच्या दोघांनी गद्दारी केली आहे. या दोघांनी केवळ शिवसेनेशीच नाही तर तुम्हा जनतेचाही विश्वासघात केल्याचे सांगत खोक्यात बंद झालेल्या या गद्दारांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.

मागील दहा वर्षांत भाजपवाल्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांना याच यवतमाळमधून काय आश्वासने दिली होती, ते एकदा आठवा. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची ग्वाही दिली होती. उत्पन्न दुप्पट झाले का, अशी विचारणा करीत कापसाचा भाव ११ हजार होता तो आता सात हजारांवर आला आहे. तिच स्थिती सोयाबीनची आहे. दुसरीकडे शेतीसाठीचा लागवड, बी-बियाण्यांचा खर्च दुप्पट झाला आहे आणि हजार-दोन हजारांची मदत खात्यावर टाकून हे सरकार टेंभा मिरवित असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली. हे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात चार हजार ७५६ आत्महत्या झाल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. पाणंद रस्त्यासाठी निधी दिला, घेणाऱ्यांनी टक्केवारी खाल्ली, मात्र त्यानंतरही बारमाही रस्त्यापासून जिल्ह्यातील वाडे-तांडे दूर असल्याचे ते म्हणाले. समाजातील विद्यार्थ्यांच्या होस्टेलसाठीचा मुंबईतील भूखंड स्वत:च्या ट्रस्टच्या नावे करवून घेणाऱ्यांनाही येणाऱ्या निवडणुकीत जाब विचारा, असे आवाहन दानवे यांनी केले.

मंचावर माजी मंत्री संजय देशमुख, शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी, माजी आमदार विश्वास नांदेकर, दुष्यंत चतुर्वेदी, संगीता ढवळे, आशावरी देशमुख, उद्धव कदम यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संजय देशमुख यांनी केले. या जिल्ह्यातील मतदार मागील २५ वर्षांपासून शिवसेनेसोबत राहिला आहे. याच सेनेच्या बळावर दोघेजण मोठे झाले. मात्र, त्यांनी गद्दारी केली. ते सेनेसोबत होते म्हणून रूबाब होता. आता ठाकरे घराण्याचे नाव सोबत नसल्यावर काय होते हे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत कळेल, असे ते म्हणाले. राळेगाव येथे आगमन होताच उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर वीर बापूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला हार घातला. बाजार समितीच्या वतीने माजी मंत्री वसंत पुरके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल मानकर यांनी ठाकरे यांचे स्वागत केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेYavatmalयवतमाळ