शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अब की बार भाजप तडीपार...राळेगावमध्ये उद्धव ठाकरे गरजले

By विशाल सोनटक्के | Updated: March 12, 2024 17:54 IST

आता 'अब की बार चारसौ पार'ची नव्हे तर 'अब की बार भाजप तडीपार'ची तयारी मतदार करीत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

राळेगाव (यवतमाळ) : याच यवतमाळमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपची सभा झाली. म्हणे, यवतमाळमध्ये सभा घेतली की भाजपला यश मिळते. हे पूर्वीचे झाले. तेव्हा ठाकरेंची शिवसेना सोबत होती. आता 'अब की बार चारसौ पार'ची नव्हे तर 'अब की बार भाजप तडीपार'ची तयारी मतदार करीत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणूक रोख्यावरूनही त्यांनी भाजपला चांगलेच फटकारले. मिळत असलेल्या माहितीनुसार, ५० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या खात्यात निवडणूक रोख्यातून ६०० कोटी जातात, तर दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपच्या खात्यात सहा ते सात हजार कोटी रुपये पडतात. यावरूनच कोणता पक्ष देशाला लुटत आहे हे स्पष्ट होते, असे सांगत भ्रष्टाचाराचे पाठीराखे असलेल्या भाजपला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राळेगाव येथील गांधी मैदानावर मंगळवारी दुपारी जनसंवाद सभा झाली. भरदुपारी झालेल्या या सभेला तळपत्या उन्हातही सुमारे २० हजारांवर नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित होता. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, दुपारचे अडीच वाजले आहेत. मात्र, उन्हाची पर्वा न करता तुम्ही एवढ्या प्रचंड गर्दीने भाषणासाठी थांबला आहात. यालाही भाग्य लागते. नाहीतर लाखोंची बिर्याणी चारूनही विरोधकांच्या सभेतील खुर्च्या रिकाम्या राहतात. तर इकडे एकही भाडोत्री आणलेला नसताना सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित आहे. यवतमाळच्या दोघांनी गद्दारी केली आहे. या दोघांनी केवळ शिवसेनेशीच नाही तर तुम्हा जनतेचाही विश्वासघात केल्याचे सांगत खोक्यात बंद झालेल्या या गद्दारांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.

मागील दहा वर्षांत भाजपवाल्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांना याच यवतमाळमधून काय आश्वासने दिली होती, ते एकदा आठवा. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची ग्वाही दिली होती. उत्पन्न दुप्पट झाले का, अशी विचारणा करीत कापसाचा भाव ११ हजार होता तो आता सात हजारांवर आला आहे. तिच स्थिती सोयाबीनची आहे. दुसरीकडे शेतीसाठीचा लागवड, बी-बियाण्यांचा खर्च दुप्पट झाला आहे आणि हजार-दोन हजारांची मदत खात्यावर टाकून हे सरकार टेंभा मिरवित असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली. हे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात चार हजार ७५६ आत्महत्या झाल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. पाणंद रस्त्यासाठी निधी दिला, घेणाऱ्यांनी टक्केवारी खाल्ली, मात्र त्यानंतरही बारमाही रस्त्यापासून जिल्ह्यातील वाडे-तांडे दूर असल्याचे ते म्हणाले. समाजातील विद्यार्थ्यांच्या होस्टेलसाठीचा मुंबईतील भूखंड स्वत:च्या ट्रस्टच्या नावे करवून घेणाऱ्यांनाही येणाऱ्या निवडणुकीत जाब विचारा, असे आवाहन दानवे यांनी केले.

मंचावर माजी मंत्री संजय देशमुख, शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी, माजी आमदार विश्वास नांदेकर, दुष्यंत चतुर्वेदी, संगीता ढवळे, आशावरी देशमुख, उद्धव कदम यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संजय देशमुख यांनी केले. या जिल्ह्यातील मतदार मागील २५ वर्षांपासून शिवसेनेसोबत राहिला आहे. याच सेनेच्या बळावर दोघेजण मोठे झाले. मात्र, त्यांनी गद्दारी केली. ते सेनेसोबत होते म्हणून रूबाब होता. आता ठाकरे घराण्याचे नाव सोबत नसल्यावर काय होते हे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत कळेल, असे ते म्हणाले. राळेगाव येथे आगमन होताच उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर वीर बापूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला हार घातला. बाजार समितीच्या वतीने माजी मंत्री वसंत पुरके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल मानकर यांनी ठाकरे यांचे स्वागत केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेYavatmalयवतमाळ