नेहरुनगरात दोन लाखांची घरफोडी

By Admin | Updated: July 16, 2015 02:30 IST2015-07-16T02:30:00+5:302015-07-16T02:30:00+5:30

स्थानिक नेहरूनगरात रात्री ८.३० वाजता चोरट्यांनी एका घराला निशाणा बनवून २५ हजाराची रोख व ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला.

Two lakh bribe in Nehru city | नेहरुनगरात दोन लाखांची घरफोडी

नेहरुनगरात दोन लाखांची घरफोडी

अर्ध्या तासात वाजविला गेम : दागिन्यांसह रोखही लांबविली
यवतमाळ : स्थानिक नेहरूनगरात रात्री ८.३० वाजता चोरट्यांनी एका घराला निशाणा बनवून २५ हजाराची रोख व ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला.
गंगाप्रसाद सत्यनारायण गुप्ता यांनी या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी गुप्ता कुटुंबीय घराला कुलूप लावून हाकेच्या अंतरावरील स्टेट बँक चौकात डॉक्टरकडे गेले होते. तेथून अवघ्या अर्धा तासात ते परतले. मुख्य प्रवेशद्वाराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला. कपाटातील रोख व दागिने घेऊन मागील दाराने चोरटे पसार झाले. अर्ध्या तासात गेम वाजविल्याने चोरटे पाळतीवर असावे असा संशय आहे. गुप्ता कुटुंबीय दवाखान्यात जात असताना त्यांच्या घराच्या समोर दुचाकी वाहनावर एक युवक मोबाईलवर खेळत होता. शेजारील कुणाची तरी तो प्रतीक्षा करीत असावा असा समज झाल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. तोच या चोरीत सहभागी असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. विशेष असे चोरट्यांनी बॅगेतील दहाच्या नोटांकडे फारसे लक्ष दिले नाही. ५०० व हजाराच्या नोटाच त्यांनी घेतल्या. (शहर वार्ताहर)
सायंकाळच्या वेळीच चोऱ्या
एरव्ही रात्री २ ते ४ ही चोरीची निश्चित वेळ मानली जाते. या काळात कुणीही साखर झोपेत असतो. म्हणून याच वेळी चोरटे हात मारतात. परंतु गेल्या काही दिवसात चोरट्यांनी आपला प्राईम टाईम बदलविला की काय अशी शंका येऊ लागली आहे. कारण अनेक चोऱ्या या सायंकाळी ७ ते ९ या वेळातच झाल्या आहे. विशेष असे अवघ्या काही तासासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले असतानाच चोरटे आपले काम दाखवितात.

Web Title: Two lakh bribe in Nehru city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.