लेव्हीद्वारे हर्रास पद्धती बंद करावी
By Admin | Updated: June 22, 2015 02:07 IST2015-06-22T02:07:26+5:302015-06-22T02:07:26+5:30
लेव्हीद्वारे शेतजमिनीची हर्रास पद्धती बंद करण्यात यावी, तसेच अधर पूस प्रकल्पाद्वारे ...

लेव्हीद्वारे हर्रास पद्धती बंद करावी
निवेदन : अधिग्रहीत शेती परत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
आर्णी : लेव्हीद्वारे शेतजमिनीची हर्रास पद्धती बंद करण्यात यावी, तसेच अधर पूस प्रकल्पाद्वारे अधिग्रहण करण्यात आलेल्या शेतींना परत देण्यात यावे, अशा प्रकारचे निवेदन पीडित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना शुक्रवारी दिले.
१९८२-८३ मध्ये शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत कालवा व पाटसऱ्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी अधर पूस प्रकल्पाद्वारे अधिग्रहीत करण्यात आल्या. परंतु या संपूर्ण क्षेत्रास पाणी देण्यास पूस प्रकल्प असमर्थ असून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सदर शेतजमिनीवर प्रकल्पाचे कुठलेही उद्दिष्ट गेल्या २७ वर्षांत यशस्वी न झाल्यामुळे या जमिनी आता आम्हाला परत करण्यात याव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनी परत करण्याची मागणी वारंवार करण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शासनाने या संदर्भात कोणतीच कारवाई न केल्यामुळे दरवर्षीप्रमाणे शेतकरी या जमिनींच्या हर्रास प्रक्रियेचा विरोध दर्शवून बहिष्कार टाकत आहे. गेल्या वर्षीची जमीन परत देण्यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा व लेव्हीद्वारे शेतजमिनीचा हर्रास होवू नये, अशी मागणी कवठाबाजार, साकूर, मुकिंदपूर शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी विवेक दहीफळे, प्रकाश हजारे, विजय ठाकरे, भगाजी हजारे, शिवाजी दहीफळे, पुंजाबाई ढोरे, रामराव हजारे, अरविंद दहीफळे, उद्धव गादेवार, सुनील गादेवार, विनायक शिंदे, प्रशांत जाधव, नारायण व्यवहारे, गजानन जेठेवाड, दिनकर कागने, रामदास जेठेवाड, गजानन रामनबोईनवाड, हरीबाजी पांडे, आशा जाधव, धनंजय जाधव, सुभाष हजारे, भगवंत जाधव, मोरेश्वर पाटील, मालती जागिरदार, शिवराज जाधव, योगेश दहीफळे, सुरज तिळे, अनिता जाधव, लक्ष्मीकांत पांडे, लक्ष्मण पांडे, गोविंद पांडे आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)