शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटावर तुंबळ हाणामारी; वाहनांची तोडफोड, हवेत गोळीबार

By विशाल सोनटक्के | Updated: March 29, 2024 18:12 IST

चार आरोपी अटकेत : मुख्य आरोपीच्या शोधासाठी पाच पथके रवाना

यवतमाळ :  महागाव तालुक्यातील भोसा रेती घाटावर वर्चस्ववादातून गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. अनेक जण जखमी झाले असून हवेत गोळीबार झाल्यामुळे परिसर हादरला. घटनास्थळी २० ते २५ राउंड फायर झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चार राउंड रिकामे, तर दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीसह २० ते २५ आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

महागाव तालुक्यातील भोसा व आर्णी तालुक्यातील साकुर घाटाच्या रस्त्यावरून रेती उपसा आणि वाहतुकीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. रात्रीच्या अंधारात हवेत गोळीबार करण्यात आला. मुख्य आरोपी अंजुम लाला यांनी फिर्यादीला घटनास्थळावर दमदाटी करून मारहाण केली व त्यांच्या दिशेने राउंड फायर केल्याची फिर्याद सुरेश ऊर्फ कृष्णा ढाले यांनी महागाव पोलिसांत दाखल केली. या फिर्यादीवरून अंजूम लाला व २० ते २५ जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी पहाटे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. घटनास्थळावरून एक कार, सहा मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर घटना घडल्यानंतरही स्थानिक प्रभारी पोलिस अधिकारी घटनास्थळावर उपस्थित नसल्यामुळे जगताप यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे.

महागाव येथील सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकाटे हे रात्री १२ वाजता कर्मचाऱ्यांसह पोहोचले होते. उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड रात्रीपासूनच घटनास्थळी ठाण मांडून आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार केली. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना रात्रीच अटक केली आहे. भादंवि कलम ३०७, ३२४, ३४१, १४३, १४४, १४६, १४७, १४९ सह कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ नुसार आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

स्थानिक प्रशासनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी

शासन आणि उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाची पायमल्ली करून येथे रेतीच्या व्यवसाय सुरू आहे. त्यातील स्पर्धेकडे स्थानिक तहसील दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आहेत. महसूल प्रशासन या घटनेवर मात्र चुप्पी साधून बसले आहे. तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थानिक पोलिस प्रशासनाच्या व महसूल प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेतृत्व कमी पडत असल्याने जनतेमध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध नाराजी पसरली आहे.