शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

महागाव तालुक्यात महावितरणचा तुघलकी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:42 IST

महागाव : महावितरण कंपनीच्या मनमानी व तुघलकी कारभारामुळे उमरखेड, महागाव व पुसद विधानसभा क्षेत्रातील जनता कमालीची त्रस्त आहे. लोकप्रतिनिधींना ...

महागाव : महावितरण कंपनीच्या मनमानी व तुघलकी कारभारामुळे उमरखेड, महागाव व पुसद विधानसभा क्षेत्रातील जनता कमालीची त्रस्त आहे. लोकप्रतिनिधींना या समस्येकडे लक्ष देण्यास सवड मिळत नाही.

पुसद, उमरखेड, महागाव या तीन तालुक्यातील कृषिपंप, घरगुती वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी केली आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे अनेक गावांचा पाणी पुरवठा बंद पडून नागरिकांना नदी, नाल्यांचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. कृषिपंपाची वीज गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे.

सध्या शेतकऱ्यांनी पैशांची कशी तरी जुळवाजुळव करून शेती केली. त्यात महावितरणच्या मनमानीमुळे पिके वाळून जात आहेत. शेजारील तेलंगाणा राज्यात शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज मिळत असताना आपल्याकडे मात्र दहा ते १५ तास भारनियमन केले जाते. उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रायलात ऊर्जामंत्री व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेउन पाणी पुरवठा, पथदिव्यांचे तोडलेले कनेक्शन पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले. मात्र, महावितरण वीज कनेक्शन कापत आहे. यामुळे शेतकरी व नागरिक कमालीचे त्रासले आहेत. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी अपेक्षा पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी व्यक्त केली.

कोट

विजेच्या सर्व ग्राहकांकडून २७ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. विजेचा वापर सर्वांकरिता अत्यावश्यक आहे. परंतु बिल कोणी भरत नाही. त्यामुळे थकीत वीज बिलाची रक्कम वाढत आहे. ग्राहकांनी बिल भरून कंपनीला सहकार्य करावे.

विनोद चव्हाण,

सहाय्यक कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, महागाव