शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

उपविभागावर तिबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 10:24 PM

१२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा करावी लागली.

ठळक मुद्देखंडित पावसाचा परिणाम : हवामान खात्याचे अंदाज खोटे, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा करावी लागली. अद्याप जोरदार पाऊस येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने या शेतकºयांना आता तिसऱ्यांदा पेरणी करावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी मृग नक्षत्रावर पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली. तत्पूर्वी यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यातच मृग नक्षत्रावर पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामान खात्यावरील विश्वास दुनावला. त्यामुळे उपविभागातील अनेक शेतकऱ्यांनी ८ ते १० जून या दरम्यान शेतात कपाशी, तूर व सोयाबीनची लागवड केली. वातावरण पावसाळीच असल्याने ११ जूननंतरही अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली. मात्र इथेच घात झाला. १० जूननंतर पावसाने चांगलीच दडी मारली. या भागात गेल्या १५ दिवसांपासून अद्याप सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस, तर काही भागात पावसाची दडी, अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी ७ ते १० जूनपर्यंत पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांची पिके अद्यापही तग धरून आहेत. जमिनीत काहीसा ओलावा असल्याने ही पिके वाढत आहे. मात्र ११ जूननंतर पेरण्या झालेली पिके उगवलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्याहीउपरांत जोमदार पाऊस न झाल्याने आता ही दुबार पेरणीही धोक्यात आली असून तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. आजपर्यंत वणी तालुक्यात केवळ १८६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.पावसाअभावी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भावखंडित पावसामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यात काही ठिकाणी कपाशीवर लष्करी अळीच प्रादूर्भाव दिसून आला. जवळपास प्रत्येकच शेतांमध्ये देवगायींचा (तेलण्या) प्रकोप वाढला असून य देवगायी तूरी व कपाशीची पाने कुरतडून खात आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी शेतांमध्ये थिमेटचा वापर करीत आहे. मात्र तरीही तेलण्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी