शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लॉकडाऊनमध्ये निकृष्ट धान्य देऊन आदिवासींची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:53 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील धान्य वाटपाचे निर्देश आहेत. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यावर आणि त्यातही निकृष्ट धान्य वाटप करून गरीब आदिवासींच्या आरोग्यासोबत खेळ केला जात आहे.

ठळक मुद्देपाच वर्षे जुना चणा महामंडळ प्रमुखांना संचालिकेने भरला दम, मंत्र्यांकडे तक्रार

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संकटात आदिवासी मजुरांची उपासमार होऊ नये, म्हणून आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील धान्य वाटपाचे निर्देश आहेत. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यावर आणि त्यातही निकृष्ट धान्य वाटप करून गरीब आदिवासींच्या आरोग्यासोबत खेळ केला जात आहे.आता या गंभीर प्रकाराची तक्रार आदिवासी विकास महामंडळाच्या संचालिकेने थेट आदिवासी विकास मंत्र्यांकडे केली आहे. शिवाय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकालाही उचलबांगडी करण्याचा दम दिला.हातावर आणून पानावर खाणाऱ्या आदिवासी मजुरांची परिस्थिती लॉकडाऊनमध्ये अत्यंत बिकट झाली. त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या उपसचिवांनी ७ एप्रिलला आदेश काढून आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले अन्नधान्य आदिम जमातीस वाटप करण्याचे निर्देश दिले. त्यातही केवळ दोन किलो चणा किंवा अडीच किलो तूर वाटप करण्याच्या सूचना आहे. चणा आणि तुरी वाटपाच्या या आदेशाने आपली थट्टा उडविल्याची भावना आधीच आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झाली. त्यातच आता हा चणाही काही वर्ष जुना दिला जात असल्याने आरोग्यासोबत खेळ होत आहे.कोरोना संकटात रोजमजुरी नसताना या धान्याची गरज असताना प्रत्यक्षात लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यावर वाटप सुरु झाले. त्यातल्या त्यात जनावरेही खाणार नाहीत, असा निकृष्ट चणा वाटप होत आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या संचालिका मिनाक्षी वेट्टी यांनी या प्रकाराबाबत थेट आदिवासी विकास मंत्र्यांकडे तक्रार केली.पहापळमध्ये सहा क्ंिवटल खराब धान्यपांढरकवडा तालुक्यातील पहापळ परिसरात आदिवासी मजुरांना नुकतेच धान्य वाटप करण्यात आले. यात जनावरेही खाणार नाही, असा चणा वाटप करण्यात आला. तेथे साधारण २९७ बॅग म्हणजे अंदाजे सहा क्ंिवटल माल खराब निघाल्याची तक्रार संबंधित मजुरांनी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मिनाक्षी वेट्टी यांच्याकडे केली. वेट्टी यांनी लगेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना खरमरीत पत्र पाठवून या प्रकाराचा जाब विचारला. संचालक मंडळाची मंजुरी न घेता धान्य वाटपाचा प्रस्ताव परस्पर मंत्रालयात पाठविल्याबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला.जुन्या धान्यापेक्षा खावटी द्यामहामंडळाकडे पाच ते सात वर्षांपासून विक्रीअभावी धान व इतर धान्य पडून आहे. त्यामुळे हे जुने धान्य आदिवासींना वाटप करण्यापेक्षा हे धान्य विक्री करावे. त्यातून खावटीकरिता नवीन माल विकत घ्यावा. राज्यातील आदिवासींना पूर्वीप्रमाणे ७० टक्के धान्य व ३० टक्के रोख स्वरूपात रेशन कार्डच्या युनिटप्रमाणे वाटप करावे, अशी मागणी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मिनाक्षी वेट्टी यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती