शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

यवतमाळ शहरातील कचराकोंडी कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 21:12 IST

शहरातील कचराकोंडी कायम असून या विरोधात शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन पुकारले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या शशीमोहन नंदा यांनी प्रयत्न केले. त्यांना अपयश आल्यानंतर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावरगड येथे पोहाचले.

ठळक मुद्देसावरगड ग्रामस्थांचा विरोध । प्रशासनाची शिष्टाई फसली, घंटागाड्या केल्या परत, नगरसेवकाचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील कचराकोंडी कायम असून या विरोधात शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन पुकारले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या शशीमोहन नंदा यांनी प्रयत्न केले. त्यांना अपयश आल्यानंतर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावरगड येथे पोहाचले. मात्र ग्रामस्थांचा कचराडेपोत कचरा टाकण्याला विरोध कायम होता. त्यामुळे कचऱ्याने भरलेल्या घंटागाड्या तशाच परत आणाव्या लागल्या. शिवसेना नगरसेवकांनी कचरा भरलेल्या घंटागाड्या पालिका कार्यालयासमोर उभ्या केल्या आहेत. यावर तोडगा कसा काढायचा, हा प्रश्न प्रशासनापुढे आहे.यवतमाळ नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार ढेपाळला आहे. येथील राजकीय पुढाऱ्यांच्या भूमिकेमुळे अनेक समस्या उभ्या ठाकत आहे. सावरगड कचराडेपोचा प्रश्न हा अनेक वर्षापासून जाणीवपूर्वक चिघळत ठेवण्यात आला आहे. तेथील ग्रामस्थांचा विरोध कायम असूनही पर्यायी जागा शोधण्यात आली नाही. कचराडेपोच नसल्याने शहरात गोळा केलेला कचरा ठिकठिकाणी तुंबला आहे. पावसामुळे या कचºयातून उग्र वास येत आहे. ही समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी घेऊन शिवसेना गटनेते गजानन इंगोले यांनी आंदोलन सुरू केले. शहरात साथरोग पसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली. प्रभारी मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांनी पदभार घेताच पहिल्या दिवशी सावरगड येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याने उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार शैलेश काळे यांनीदेखील तेथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मात्र कचराडेपोमुळे संपूर्ण गावात रोगराई फैलावते, यापूर्वीसुद्धा नगरपरिषदेकडे तक्रार करून येथील कचºयावर योग्य प्रक्रिया केली जात नाही. हा कचराडोपो आमच्या जीवावर उठल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अधिकाºयांना डॉक्टरकडे उपचार घेत असलेल्या चिठ्ठ्याच दाखविल्या. त्यानंतरही तांगडे यांनी किमान १५ दिवस तरी कचरा टाकू द्या, असा प्रस्ताव ठेवला. त्यालाही ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. शेवटी नाईलाजास्तव कचºयाने भरलेल्या घंटगाड्या परत आणाव्या लागल्या. नगरपरिषदेसमोर गटनेते गजानन इंगोले, नगरसेवक गणेश धवणे, नितीन बांगर, अनिल यादव, नीलेश बेलोकार, काँग्रेस नगरसेवक विशाल पावडे, छोटू सवाई आदी उपस्थित होते. यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला.पालकमंत्र्यांनी केली ग्रामस्थांशी चर्चापालकमंत्री मदन येरावार यांनीही सावरगड ग्रामस्थांसोबत चर्चा केली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही बैठक झाली. त्यामध्येही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे सांगण्यात येते.नगरपरिषद प्रशासनाच्या चुकीने ही समस्या निर्माण झाली आहे. पूर्वीही कचºयावर योग्या प्रक्रिया केल्या गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ विरोध करत आहे. शेवटी आमच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.- सुहास सरगर, उपसरपंच सावरगडयवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संवेदनशील विषयावर कोणीच तोडगा काढण्यास तयार नाही. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. कचराकोंडी दूर होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार.- गजानन इंगोले,गटनेते (शिवसेना) नगरपरिषद