शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चौकशीशिवाय केलेली बदली शिक्षा ठरते; ‘मॅट’चा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 4:09 PM

Yawatmal News शासकीय अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार असेल व त्याची चौकशी न करता बदली केली गेली असेल तर ती त्याच्यासाठी शिक्षा ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिला.

ठळक मुद्दे वित्त सहसंचालकांची बदली रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार असेल व त्याची चौकशी न करता बदली केली गेली असेल तर ती त्याच्यासाठी शिक्षा ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिला.राजेश गोपाल लांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्वाळा दिला. लांडे हे मुळ वित्त व लेखा विभागाचे सहसंचालक आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेंतर्गत समग्र शिक्षा अभियान मुंबई येथे होती. तीन आमदारांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांची बदली करण्यात आली होती.ते बदलीस पात्र नव्हते. या बदलीला त्यांनी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. यावेळी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला याचिकाकर्त्यांच्यावतीने देण्यात आला. शासकीय कर्मचाºयाविरूद्ध तक्रार असेल तर त्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देणे आवश्यक आहे, त्याची खातेनिहाय चौकशी, चार्जशीट झाली आहे का हे तपासणे बंधनकारक आहे. याशिवाय झालेली बदली त्या कर्मचाºयासाठी शिक्षा व अन्यायकारक ठरत असल्याचे ‘मॅट’ने स्पष्ट केले. लांडे यांची बदली आणि २४ जूनचा कार्यमुक्ती आदेश रद्द करून त्यांना ताबडतोब जुन्या जागेवर काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. आर.एस. आपटे, तर शासनाच्यावतीने मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मंचेकर यांनी काम पाहिले. याप्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर व अ‍ॅड. गायत्री गौरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

आमदारांचा विरोध अन् समर्थनहीया प्रकरणा तीन आमदार लांडे यांच्याविरोधात होते. त्यांचे काम चांगले नसल्याच्या तक्रारी केल्या. याचवेळी तीन आमदार लांडे यांच्या बाजूने होते. त्यांनी लांडे यांचे काम उत्तम असल्याचे पत्र दिले होते.‘मॅट’ने सांगितली मार्गदर्शक तत्त्वेराजेश लांडे प्रकरणाच्यानिमित्ताने ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी येथून पुढे बदली करायची असेल तर त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली. ४ बदलीचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळ व तेथून मुख्यमंत्र्यांकडे सादर करताना त्यात सुस्पष्टता असावी, विशिष्ट कारण नमूद असावे, विशेष बाब असेल तर नेमकी कशाच्या आधारे बदली करायची आहे ते नमूद असावे.बदलीला नागरी सेवा मंडळाची शिफारस आहे का, संबंधिताला बदलीवर पुढे नेमके कुठे देणार हे त्यात स्पष्टपणे नमूद असणे गरजेचे आहे. बदलीबाबत वेगळे धोरण ठरले असेल तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करावे, संबंधित जीआर, शासनाच्या बाजुचे न्यायनिवाडे जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.

टॅग्स :Governmentसरकार