शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

वणीमार्गे जनावरांची तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 9:46 PM

कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले.

ठळक मुद्दे३४ जनावरांना जीवदान : साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त, एसडीपीओ पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले. ट्रकसह एकूण १३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र असलेल्या नागपुरातून दररोज शेकडो जनावरांना कत्तलीसाठी तेलंगाणातील आदिलाबाद येथे नेले जात आहे. शुक्रवारी जनावरांनी भरलेला एक ट्रक वणीमार्गे आदिलाबादकडे जाणार असल्याची गोपनिय माहिती वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने वणी शहरालगतच्या चंद्रपूर मार्गावरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री सापळा रचला. दरम्यान, नागपूरकडून एक संशयास्पद ट्रक टोलनाक्याजवळ पोहचताच, पोलीस पथकाने त्या ट्रकला अडविले असता, ट्रकचालकाने ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील पोलिसांनी जीव धोक्यात टाकून ट्रकचालकाच्या मुसक्या आवळल्या. ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये तब्बल ३४ बैल निर्दयपणे कोंबून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. यावेळी ट्रकचालक शेख महेफूस शेख महेबूब (२५) रा.आझादनगर नागपूर व इम्रानखान करीम खान पठाण (३०) रा.नागमंदिर गोधणी रोड नागपूर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम ११ घ.ड.झ.प्राणीमात्रांना निर्दयपणे वागणूक देणे प्रती कायदा सहकलम ५ अ.ब.प्राणी संरक्षक कायदा व ४२९, ३४ भादंवि ८३, १७७ मोवाका प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासात घेतला. जनावरांची सुटका करण्यात आल्यानंतर सर्व जनावरांना रासा येथील गुरू गणेश गोशालेत दाखल करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची किंमती सहा लाख ६० हजार रुपये आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस दिलीप अडकीने पोलीस शिपाई आशिष टेकाडे, रवी ईसनकर, संतोष अण्णा यांनी पार पाडली.पोलिसांच्या कारवाया वाढल्याने मधल्या काळात जनावरांची तस्करी थंडावली होती. मात्र तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नागपूर हे जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. तेथून आदिलाबादकडे जनावरांना कत्तलीसाठी नेले जाते. नागपूर ते आदिलाबादपर्यंत अनेक पोलीस ठाणी लागतात. परंतु पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून जनावरांना कत्तलीसाठी नेले जात आहे. तस्करीचे फार मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे बोलले जाते.