शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

धान्याच्या पैशासाठी बळीरामने घेतला व्यापाऱ्याचा बळी

By admin | Updated: April 2, 2017 00:22 IST

गावातीलच अल्पवयीन मुलीशी आंतरजातीय विवाह करणे बळीला चांगलेच महागात पडले. त्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेम असलेल्या मुलीशी विवाह केला.

गावातीलच अल्पवयीन मुलीशी आंतरजातीय विवाह करणे बळीला चांगलेच महागात पडले. त्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेम असलेल्या मुलीशी विवाह केला. त्या मुलीच्या कुटुंबियांची सामाजिक व आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची असल्याचे कारण पुढे करून बळीला त्याच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढून दिले. हाताशी काम नाही आणि घरच्यांचा आधार नाही अशा स्थिती बळीने सासऱ्याकडेच त्याच्या झोपडीवजा घरात आश्रय घेतला. घरच्या शेतातील उत्पन्नाचा वाटाही बळीला नाकारण्यात आला. मोठ्या भावाने गावातील व्यापाऱ्याला विकलेल्या धान्यापैकी काही रक्कम मिळावी यासाठी बळीने वाद घातला. यातूनच खुनाची घटना घडली. प्रेमाचा खडतर मार्ग अनेक परीक्षा द्यायला लावतो. संसाराचा गाडा हाकताना प्रेमाची नशा पार उतरुण जाते. असाच काहीसा प्रत्यय उमरखेड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बिटरगाव येथील बळीराम उर्फ बळी गणपत तुपेकर (२४) याला विवाहानंतर अगदी काही महिन्यातच आला. घरची स्थिती बऱ्यापैकी आणि गावात दगडामातीचे का होईना टुमदार घर अशा कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या बळीचे गावातीलच एका मुलीवर प्रेम जडले. त्याने समाजच नव्हे तर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेयसीला दिलेला शब्द पाळला. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. बळीला त्याच्या भावाने घरातून बाहेर काढले. या स्थितीत हाताला रोजगार नाही. गाठीशी पैसा नसल्यामुळे शेवटी सासऱ्याकडेच आश्रय घ्यावा लागला. तेथेही बेताची परिस्थिती असल्याने बळीने गावात पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. यातून जमवलेली रक्कम सुरक्षेच्यादृष्टीने विश्वासू असलेल्या धान्य व्यापारी व्यंकटेश वसंतरा वट्टमवार (४७) यांच्याकडे ठेवण्यास दिली. गावगाड्यातील विश्वासाचा व्यवहार नेहमीच केला जात होता. घटनेच्या दिवशी बळी हा कुऱ्हाड घेऊन जंगलात २५ मार्चच्या सायंकाळी लाकुड तोडण्यासाठी जात होता. सहजच त्याची नजर वट्टमवार यांच्या दुकानावर पडली. तेथे सावकार वट्टमवार हे एकटेच बसून होते. हीच संधी साधून बळीने वट्टममवार यांच्याकडे ठेवलेले पैसे आणि भावाने विकलेल्या १५ पोते सोयाबीनपैकी अर्ध्या रकमेची मागणी केली. याला वट्टमवार यांनी विरोध केला. व्यवहार भावासोबत असल्याने पैसेही त्यालाच देणार, असे सांगितले. यातून शाब्दीक वाद वाढत गेला. सावकाराचा शब्द जिव्हारी लागल्याने बळीने हातातील कुऱ्हाडीने वार केला. यानंतर वट्टमवार हे उठून बाहेर आले. आता आपली तक्रार होईल, आपण यात अडकू या भीतीतून बळीने वट्टमवार यांच्यावर कुऱ्हाडीने तीन घाव घातले. यामुळे वट्टमवार रक्ताच्या थारोळ््यात जागेवरच कोसळले. त्यानंतर बळीने घटनास्थळावरून पळ काढला. तो आपल्या पत्नीला घेऊन शेताच्या रस्त्याने कोठा येथे आला. नंतर त्याने १० किलोमीटर अंतरावर असलेले हिमायत नगर पायदळ गाठले. तेथे रेल्वे स्टेशन परिसरात गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड फेकून दिली. रेल्वेत बसून बळी व त्याची पत्नी दोघेही परभणी जिल्ह्यातील मिरखेल या गावी आश्रयाला गेले. तेथे एका ओळखीच्या व्यक्तीच्या शेतावर ते थांबल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. इकडे सायंकाळी पोलीस ठाण्यासमोर व्यापाऱ्याचा खून झाल्याने खळबळ निर्माण झाली. पोलिसांवर आरोपींचा शोध घेण्यासाठी दबाव वाढला. इतकेच नव्हे तर वट्टमवार कुटुंबियांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेऊन आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली. एकाचवेळी तपास, कायद व सुव्यवस्था राखण्याचा पेच पोलिसांपुढे निर्माण झाला. घटनेत प्रत्यक्षदर्शी नसल्याने तसेच वट्टमवार यांचा तसा कुणाशी वाद नसल्याने संशय व्यक्त करणेही शक्य होत नव्हते. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घेऊन ठाणेदार सहाय्यक निरीक्षक सूरज बोंडे यांनी तपासाची दिशा निश्चित केली. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू झाला. मदतीसाठी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक शिवाजी लष्करे, उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पथकातील कर्मचारी हरीश राऊत, भीमरा शिरसाट आणि बिटरगाव ठाण्यातील कर्मचारी दिगांबर मुसळे, रवी गीते, गणेश सूर्यवंशी, युनूस भातन्से, अल्ताफ शेख यांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. गावात असलेली डावखुरी व्यक्ती कोण, सोबतच उजव्या पायात व्यंग एवढ्या सुगाव्यावर तपास सुरू केला. अखेर बळीचे नाव पुढे आले. नंतर सायबर सेलची तांत्रिक मदत घेऊन बळीचा माग काढण्यात आला. शेवटी त्याला परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथून ताब्यात घेतले. आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्याून वाद झाला. याच वादातून खून केल्याचे बळीने पोलिसांपुढे सांगितले.