शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कुलकॅनच्या अप्रमाणित पाण्याचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:22 IST

जिल्ह्यात कुलकॅनमध्ये पाणी विकण्याचा गोरखधंदा गल्लीबोळात सुरू असून कोणत्याही नियमाचे पालन न करता अप्रमाणित पाणी ‘शुद्धते’च्या नावाखाली विकले जात आहे.

ठळक मुद्देमानवी आरोग्याशी खेळ : फुकटच्या पाण्यातून कोट्यवधींची उलाढाल, तक्रार कुठे करावी हा प्रश्नच

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कुलकॅनमध्ये पाणी विकण्याचा गोरखधंदा गल्लीबोळात सुरू असून कोणत्याही नियमाचे पालन न करता अप्रमाणित पाणी ‘शुद्धते’च्या नावाखाली विकले जात आहे. या गोरखधंद्याला भीषण पाणीटंचाईने सुगीचे दिवस आले आहे. शुद्ध आणि अशुद्धतेचा विचार न करता ग्राहक कुलकॅन घेऊन आपली तहान भागवित आहे. यातून मानवी आरोग्याशी खेळ सुरू असून प्रशासनासह आरोग्य विभागाचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.उन्हाळ्यातच नव्हे तर बाराही महिने कुलकॅनमधील पाणी विकण्याचा व्यवसाय अलिकडच्या काळात तेजीत आला आहे. प्रत्येक जण आरोग्याला जपत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. हॉटेल, पानटपरी यासह पाणपोईवरसुद्धा कुलकॅनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. थंडगार असणारे पाणी शुद्धच असेल या मानसिकतेतून कोणताही विचार न करता प्रत्येक जण पाणी पित आहे. मात्र या मागील वास्तविकता अतिशय भीषण आहे.कुलकॅनचा व्यवसाय करताना कुठलेही मापदंड पाळले जात नाही. इतकेच काय तर यवतमाळ शहरात शेकडोच्या घरात असे वॉटर प्लांट ठिकठिकाणी आहेत. विहीर, बोअरवेल आणि टंचाई काळात टँकरचे पाणी घेऊन कुलकॅनच्या नावाखाली विकले जात आहे. विशेष म्हणजे कुलकॅनमधील पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणे गरजेचे असते. मात्र अशा कोणत्याही मापदंडाचा विचार केला जात नाही. पाणी थंड व नितळ केले की ते थेट १५ ते २० लिटरच्या कॅनमध्ये भरले जाते. वाहनाद्वारे घरपोच सेवा दिली जाते. एका कॅनमागे ३० ते ३५ रुपये घेतले जातात. यवतमाळ शहराचा विचार करता दररोज हजारो कॅन नागरिकांची तहान भागवित आहे. जिल्ह्यात प्रत्येक मोठ्या गावातही असे प्लांट लावण्यात आले आहे. या फुकटच्या पाण्यावर कोट्यवधींची उलाढाल करण्याचा हा धंदा आता तेजीत आहे.अन्न व औषधी प्रशासन म्हणते, आमचा विषय नाहीकुलकॅनसाठी तयार होणारे पाणी आणि त्याची विक्री हे अन्न व औषधी प्रशासनाच्या अखत्यारीत मोडत नाही. आमच्याकडे पॅकेज वॉटर संदर्भातच तपासणी व परवाना देण्याचे अधिकार आहे. कुलकॅन ही लुज पॅकिंगमध्ये मोडल्या जाते. त्यामुळे त्यावर आमचे कुठलेही नियंत्रण नाही. साधा गुस्माता परवाना घेऊन हा व्यवसाय सुरू करता येतो. शिवाय नगरपरिषद आरोग्य विभाग व ग्रामीण आरोग्य विभागाने अशा प्लांटच्या पाणी शुद्धतेची तपासणी करणे क्रमप्राप्त असल्याचे अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त जयंत वाणे यांनी सांगितले.प्लांटची नगरपरिषदेकडे नोंदच नाहीयवतमाळात सद्यस्थितीत किती कुलकॅन प्लांट कार्यरत आहेत, याची साधी माहिती नगरपरिषदेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडे नाही. हा प्रकारच आपल्या अखत्यारीत येतो याचीही जाण येथील अधिकाऱ्यांना नाही. यामुळे तपासणी, गुणवत्ता नियंत्रण हा सर्व सोपस्कार, कोसोदूर आहे. टंचाई काळात पाण्याचा व्यापार करणाºया कुलकॅन प्लांटधारकांकडून अक्षरश: मानवी आरोग्याशी खेळ सुरू आहे.आयएसआय मानकासाठी एफडीएची परवानगीजिल्ह्यात केवळ सहा प्लांटलाच भारतीय मानक ब्युरो (आयएसआय) परवानगी दिली आहे. त्यांचीच नोंदणी व तपासणी अन्न व औषधी विभागाच्या अखत्यारीत येते. विशेष म्हणजे या ठिकाणचे पाणी पॅकेजड् असणे आवश्यक आहे. हे पाणी तयार करताना त्या प्लांटवर यु.व्ही. स्टेरियालझेशन, मायक्रो फिल्टरेशन, ओझनायझेशन सयंत्र असणे गरजेचे आहे. ही यंत्रणा असेल तरच पॅकेज वॉटर विकता येते. मात्र यवतमाळ शहरात कुलकॅनसाठी असे कोणतेही मापदंड वापरले जात नाही.

टॅग्स :Waterपाणी