रेती वाहतुकीसाठी टोकण
By Admin | Updated: February 11, 2015 00:10 IST2015-02-11T00:10:04+5:302015-02-11T00:10:04+5:30
यावर्षीपासून रेती उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी ‘रॉयल्टी’ऐवजी टोकण पध्दत सुरू झाली आहे़ ही पध्दत सरळ मुंबईशी आॅनलाईन जोडण्यात आली.

रेती वाहतुकीसाठी टोकण
वणी : यावर्षीपासून रेती उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी ‘रॉयल्टी’ऐवजी टोकण पध्दत सुरू झाली आहे़ ही पध्दत सरळ मुंबईशी आॅनलाईन जोडण्यात आली. मात्र या पध्दतीमुळे रेतीच्या चोरीला पाठबळ मिळण्याची शक्यता वाढली आहे़
दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेती घाटांचे लिलाव होऊन वाहतुकीसाठी उपविभागीय महसूल कार्यालयाकडून ‘रॉयल्टी पास’ दिले जात होते़ यावर्षी ही रॉयल्टी पास बंद करण्यात आली आहे. आता त्याऐवजी टोकण पध्दती सुरू करण्यात आली आहे़ रेती वाहतुकदाराने ट्रॅक्टर क्रमांक, ग्राहकांचे नाव व वेळ, घाटांचे नाव या संबंधीचा ‘एसएमएस’ संबंधित महसूल यंत्रणेला केल्यानंतर त्याच मोबाईलवर टोकण क्रमांकाचा एसएमएस परत येतो़
रेती वाहतुकीच्या अंतरावरून वाहतुकीचा कालावधी दिला जातो़ मात्र रेती वाहतूकदार त्यामध्ये लांबवरचे खोटे ग्राहक दाखवून टोकणचा कालावधी वाढवून घेतात. त्याच कालावधीत जवळच्या ग्राहकांना एकाच टोकणवरून अनेक ट्रीप रेती टाकण्याचा प्रकार सध्या सर्रास सुरू आहे़ पाटाळा घाटावरून तर एकाच टोकणवर चार हजार रूपयांत चार ट्रीप टाकण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. वास्तविक पाटाळा घाटाची रायल्टी १८०० ते १९०० रूपये पडते. मग चार हजार रूपयांत चार ट्रीप कशा टाकल्या जातात, हे न उलगडणारे कोडे आहे़
दोन दिवसांपूर्वीच असा प्रकार उघडकीस आला होता. काही रेती घाट लिलावधारकांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रारही केली होती. तक्रारीसोबतच त्यांनी एकाच टोकणवर चार ट्रीप मारण्यात येत असल्याबाबतची पावती जोडली होती.
त्यानंतरही असे प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. या टोकण पद्धतीमुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडण्याची शक्यता निर्माण जाली आहे. या पध्दतीमुळे आता महसूल विभागाला अधिक सजग राहण्याची गरज आहे़ अन्यथा महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास रेती चोरीला उधाण येण्याची शक्यता बळावली आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)
वणी : यावर्षीपासून रेती उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी ‘रॉयल्टी’ऐवजी टोकण पध्दत सुरू झाली आहे़ ही पध्दत सरळ मुंबईशी आॅनलाईन जोडण्यात आली. मात्र या पध्दतीमुळे रेतीच्या चोरीला पाठबळ मिळण्याची शक्यता वाढली आहे़
दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेती घाटांचे लिलाव होऊन वाहतुकीसाठी उपविभागीय महसूल कार्यालयाकडून ‘रॉयल्टी पास’ दिले जात होते़ यावर्षी ही रॉयल्टी पास बंद करण्यात आली आहे. आता त्याऐवजी टोकण पध्दती सुरू करण्यात आली आहे़ रेती वाहतुकदाराने ट्रॅक्टर क्रमांक, ग्राहकांचे नाव व वेळ, घाटांचे नाव या संबंधीचा ‘एसएमएस’ संबंधित महसूल यंत्रणेला केल्यानंतर त्याच मोबाईलवर टोकण क्रमांकाचा एसएमएस परत येतो़
रेती वाहतुकीच्या अंतरावरून वाहतुकीचा कालावधी दिला जातो़ मात्र रेती वाहतूकदार त्यामध्ये लांबवरचे खोटे ग्राहक दाखवून टोकणचा कालावधी वाढवून घेतात. त्याच कालावधीत जवळच्या ग्राहकांना एकाच टोकणवरून अनेक ट्रीप रेती टाकण्याचा प्रकार सध्या सर्रास सुरू आहे़ पाटाळा घाटावरून तर एकाच टोकणवर चार हजार रूपयांत चार ट्रीप टाकण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. वास्तविक पाटाळा घाटाची रायल्टी १८०० ते १९०० रूपये पडते. मग चार हजार रूपयांत चार ट्रीप कशा टाकल्या जातात, हे न उलगडणारे कोडे आहे़
दोन दिवसांपूर्वीच असा प्रकार उघडकीस आला होता. काही रेती घाट लिलावधारकांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रारही केली होती. तक्रारीसोबतच त्यांनी एकाच टोकणवर चार ट्रीप मारण्यात येत असल्याबाबतची पावती जोडली होती.
त्यानंतरही असे प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. या टोकण पद्धतीमुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडण्याची शक्यता निर्माण जाली आहे. या पध्दतीमुळे आता महसूल विभागाला अधिक सजग राहण्याची गरज आहे़ अन्यथा महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास रेती चोरीला उधाण येण्याची शक्यता बळावली आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)