आश्रमशाळा कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ
By Admin | Updated: May 22, 2014 01:31 IST2014-05-22T01:31:55+5:302014-05-22T01:31:55+5:30
जिल्ह्यातील ५९ विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील कर्मचार्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

आश्रमशाळा कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ
ढाणकी : जिल्ह्यातील ५९ विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील कर्मचार्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या शाळातील कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे विमुक्त जाती-भटक्या जमातीतील मुला-मुलींसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. प्राथमिक ३७ आणि माध्यमिक २२ अशा ५९ आश्रमशाळा जिल्ह्यात आहेत. या आश्रमशाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सेवक, स्वयंपाकी, कामठी, अधीक्षक असे शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु या कर्मचार्यांना फेब्रुवारी २0१४ पासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचार्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या आश्रमशाळांतील कर्मचार्याचे पगार विशेष समाज कल्याण अधिकार्यांकडून होतात. कर्मचार्यांच्या पगारासाठी ‘ग्रॅन्ट’ नसल्याने पगार झाले नाहीत. या महिन्यात पगारासाठी एक कोटी रुपये प्राप्त झाले. परंतु थकीत पगाराची रक्कम यापेक्षा कितीतरी अधिक आहे. पगारासाठी निधीची तरतूद नसल्यास ‘मायनस’ मधून पगार काढण्यात येतात. परंतु तसे करण्यास समाजकल्याण विभागाच्या संचालकांनी संमती दिली नाही. त्यामुळे आश्रमशाळातील शेकडो कर्मचार्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आश्रमशाळातील कर्मचार्यांनी विविध बँका, पतसंस्थांकडून घरबांधणी, मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्नकार्य इत्यादीसाठी कज्रे काढली आहेत. चार-चार महिने होत नसल्याने या कर्मचार्यांना व्याजाचा भूर्दंड विनाकारण सहन करावा लागत आहे. याशिवाय विम्याचे हप्ते थकीत झाल्याने एखादी अनुचित घटना घडल्यास विम्याच्या लाभापासून वंचित होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. आश्रमशाळा कर्मचार्यांना अनियमित पगाराला वारंवार तोंड द्यावे लागते हे विशेष. चार महिन्याच्या थकीत पगाराबाबत समाजकल्याण अधिकार्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते पुण्याला असल्याचे समजले. ‘मायनस’ मधून पगार करण्याचा आदेश निघाल्याचे परंतु अद्याप यवतमाळ समाज कल्याण विभागास प्राप्त न झाल्याचे एका अधिकार्याने सांगितले. (वार्ताहर)