तीन महिन्यांपासून रोहित्र बंदच

By Admin | Updated: November 22, 2014 01:59 IST2014-11-22T01:59:13+5:302014-11-22T01:59:13+5:30

विद्युत कंपनीचे दुर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मूळावर उठले आहे. ऐन पिकाला पाणी देण्याच्या काळातच ट्रान्सफार्मर बंद पडले आहे.

Three months later, | तीन महिन्यांपासून रोहित्र बंदच

तीन महिन्यांपासून रोहित्र बंदच

सचिन राडे झाडगाव
विद्युत कंपनीचे दुर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मूळावर उठले आहे. ऐन पिकाला पाणी देण्याच्या काळातच ट्रान्सफार्मर बंद पडले आहे. गेली तीन महिन्यांपासून वरूड(ज) परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
येथून चार किलोमीटर अंतरावरील वरूड(ज) येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. परिणामी विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकरी आपल्या शेतातील पिकाला पाणी देवू शकत नाही. या बाबी नागरिकांनी झाडगावच्या वीज अभियंत्यापुढे मांडल्या. परंतु त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. ते मुख्यालयी राहात नाही, अशा तक्रारी आहेत. शेतकरी वर्ग विविध कारणांमुळे आधीच अडचणीत सापडला आहे. आता विद्युत कंपनीच्या मनमानी कारभाराला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब गजानन चिव्हाणे, विजय ठाकरे, तुळशीराम कोवे, सखुबाई वडते, रामभाऊ भोरे, विलास खैरी, दिगांबर उईके, प्रभाकर निमट, गंगाधर निमट, सुकलाबाई उईके, जयसिंग वडते, श्रावणसिंग वडते आदींनी आमदार अशोक उईके यांना निवेदनातून मांडली.

Web Title: Three months later,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.