शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

पुसदला अखेर तीन आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:06 IST

विधान परिषदेसाठी काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक बिनविरोध निवडले गेले असून त्याच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. या निमित्ताने पुसदला पहिल्यांदाच एक नव्हे तर तीन आमदारांची लॉटरी लागली आहे.

ठळक मुद्देविधान परिषद : मिर्झा, नाईक बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषदेसाठी काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक बिनविरोध निवडले गेले असून त्याच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. या निमित्ताने पुसदला पहिल्यांदाच एक नव्हे तर तीन आमदारांची लॉटरी लागली आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी भाजपानेही पुसदवर लक्ष केंद्रीत करीत बंगल्याला सुरुंग लावताना अ‍ॅड. निलय नाईक यांना उमेदवारी दिली. एकापाठोपाठ दोन उमेदवार एकट्या पुसदमधून दिले गेल्याने राज्याच्या राजकारणात पुसदची चर्चा होऊ लागली. अपेक्षेनुसार मिर्झा व नाईक हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडले गेले. कारण ११ जागा व ११ उमेदवार आहेत. १२ व्या उमेदवाराने अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने प्रत्यक्ष मतदानाची वेळ न येता उमेदवार बिनविरोध झाले.पुसदला राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक हे विधानसभेचे आमदार आहेत. त्यात आता वजाहत मिर्झा व निलय नाईक यांच्या रुपाने आणखी दोघांची भर पडली आहे. या तीन आमदारांवर आता आपला पक्ष गावखेड्यापर्यंत वाढविणे, तो सर्व अंगांनी बळकट करणे व पुसदचा सर्वांगिण विकास साधण्याची जबाबदारी आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुसदमधून त्या-त्या पक्षाला मिळणाºया मतांवर या दोन्ही नव्या आमदारांची राजकीय उपयोगिता मोजली जाणार एवढे निश्चित.पुसद जिल्हा निर्मीती जबाबदारी वाढलीगेली कित्येक वर्ष पुसद जिल्हा होणार याची चर्चा आहे. मात्र अद्याप पुसदकरांचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेले नाहीत. पुसदकरांची ही स्वप्नपूर्ती करण्याची जबाबदारी आता या तीन आमदारांवर आली आहे. त्यातही निलय नाईक सत्ताधारी भाजपाचे असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक प्रमाणात आल्याचे मानले जाते.काँग्रेसमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची चर्चा!सुमारे वर्षभरापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनलेल्या डॉ. वजाहत मिर्झा यांना अल्पावधीतच थेट आमदारकी दिली गेली. एक व्यक्ती एक पद या न्यायाने आता डॉ. मिर्झा यांच्या जागी काँग्रेसमध्ये नवा जिल्हाध्यक्ष नेमला जाईल का याची चर्चा जिल्हा काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक जण इच्छुकही आहेत. मात्र लोकसभा तोंडावर आल्याने जिल्हाध्यक्ष बदलतील की नाही याबाबत नेते मंडळी साशंकता व्यक्त करीत आहेत.