शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तीन लाख शेतकऱ्यांनी उतरविला पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

यवतमाळ जिल्हा हमखास पाऊस बरसणारा प्रांत आहे. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हैराण झाले आहेत. अवेळी येणाऱ्या पावसाने दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. यातून दरवर्षी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी पीक विमा कंपनीने स्वीकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात खरिपाचा पीक विमा उतरविला. 

ठळक मुद्दे२२ कोटींचा प्रीमियम जमा

रुपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार २२५ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. यातून सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीदाचे क्षेत्र संरक्षित केले. याकरिता शेतकऱ्यांनी २२ कोटींचा विमा हप्ता भरला आहे.यवतमाळ जिल्हा हमखास पाऊस बरसणारा प्रांत आहे. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हैराण झाले आहेत. अवेळी येणाऱ्या पावसाने दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. यातून दरवर्षी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी पीक विमा कंपनीने स्वीकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात खरिपाचा पीक विमा उतरविला. विमा उतरविण्यासाठी प्रारंभी १५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर विमा उतरविण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार २२५ शेतकऱ्यांना आपले पीक  संरक्षित करता आले. यावर्षी शेतकऱ्यांनी कापसाचे पीक संरक्षित करण्यासाठी तयारी दर्शविली. मात्र, पिकांचा विमा अधिक होता. त्यामुळे इच्छा असतानाही शेतकऱ्यांना कपाशीचा विमा काढता आला नाही. त्या तुलनेत सोयाबीनचा विमा प्रीमियम कमी होता. परिणामी विमा उतरविताना शेतकऱ्यांचा सर्वाधिक जोर सोयाबीनच्या क्षेत्राकडे राहिला. याशिवाय मूग, उडीद आणि इतर पिकेही संरक्षित करण्यात आली.जितक्या रुपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला, तितक्याच रुपयांचा वाटा केंद्र आणि राज्य शासनाने विमा कंपनीकडे जमा केला आहे. यातून पीक संरक्षित झाले आहे. मात्र मोबदला देताना विमा कंपन्यांकडून अनेक निकष टाकून भरपाई टाळली जाते. 

कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेशपीक विमा उतरविताना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विमा ऐच्छीक असल्याने गतवर्षाचा अनुभव पाहता बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमाच उतरविला नाही. यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा