शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
5
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
6
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
7
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
8
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
9
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
10
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
11
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
12
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
13
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
14
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
15
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
16
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
17
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
18
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
19
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
20
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

फार्मर आयडीविना सात जिल्ह्यांतील तीन लाख शेतकरी प्रक्रियेबाहेर

By रूपेश उत्तरवार | Updated: June 5, 2025 13:01 IST

Yavatmal : फळबागेच्या विम्याला मुकणार, १५ जूनपर्यंत प्रक्रिया अवलंबणे अशक्यच

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना योजनेच्या अंमलबजावणीसाठी फार्मर आयडी सक्तीचा केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभझाला आहे. पुनर्रचित फळ पिकांच्या विमा योजनेला याचा पहिला फटका सहन करावा लागणार आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने फार्मर आयडी नसेल तर खरीप हंगामातील पीक आणि फळपिकांचा विमाच काढता येणार नाही. असे आदेश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी काढले आहेत. १५ जूनपर्यंत फार्मर आयडी न काढल्याने लाखो शेतकऱ्यांना विमा संरक्षणाला मुकावे लागणार आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत मृग आणि आंबिया बहार फळपिकांच्या विम्यासाठी अॅग्रिस्टॅक बंधनकारक करण्यात आले आहे. 

यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, पालघर या जिल्ह्यातील १७ लाख ८७ हजार ३९६ शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायचे होते. प्रत्यक्षात १४ लाख ६७ हजार २४७शेतकऱ्यांनाच फार्मर आयडी काढता आला. तीन लाख २० हजार १४९ शेतकरी अजूनही या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. राज्यातील इतर जिल्ह्याची परिस्थिती अशीच आहे. यातून चिंता व्यक्त केली जात आहे.

नुकसानीची मदत मिळणार नाहीहवामानात कधीही बदल घडून येतो. यात फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत पिकांचा विमा असेल तर शेतकऱ्यांना मोठा आधार होतो. मात्र फार्मर आयडी नसल्याने अनेक शेतकऱ्यांना फळ पिकांचे संरक्षण अर्ज भरता येणार नाही. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांना मदत मिळण्याचे मार्ग बंद होणार आहेत.

तांत्रिक कारणामुळे वाढल्या अडचणी....

  • फार्मर आयडी काढण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच झाला नाही. यामुळे फार्मर आयडीची प्रक्रिया करताना त्याचा ओटीपी शेतकऱ्यांना मिळाला नाही. ओटीपी मिळाल्यानंतरच फार्मर आयडीची प्रक्रिया पुढे जाते. यातून अनेक शेतकरी फार्मर आयडी काढू शकले नाही.
  • अनेक शेतकरी स्थलांतरित आहेत. या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडीची प्रक्रिया पूर्ण केली नाही.
  • काही शेतकरी परराज्यात राहतात. महाराष्ट्रात त्यांची 3 शेती आहे. याठिकाणी नोंदणी करताना अडचणी येत आहेत.
  • अनेक शेतकरी मयत आहे. त्यांच्याच नावावर शेती आहे. फेरफार प्रक्रिया न झाल्याने अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढता आला नाही.
टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरीfarmingशेती