शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

झरीतील अनेक गावांवर घोंगावतेयं पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 11:35 PM

झरी तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट असून त्यामुळे यंदा पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहेत.

ठळक मुद्देनागरिकांचे होणार हाल : उपाययोजनांसाठी प्रशासनाची धडपड

ऑनलाईन लोकमतझरी : झरी तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट असून त्यामुळे यंदा पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहेत.या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तालुक्यातील नदी, नाले, विहिरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे. सध्या तीव्र पाणीटंचाई नसली तरी मार्चअखेर व एप्रिल महिन्यात पाणी टंचाईला काही गावांना तोंंड द्यावे लागणार आहे. पाणी टंचाई संदर्भात अजुनपर्यंत कुठल्याही गावचा प्रस्ताव आला नाही. निर्माण होणाºया समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमचा विभाग सज्ज आहे, असे गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.झरी तालुक्यातील सावळी, गाडेघाट, रायपूर, झमकोला, निंबादेवी खुर्द, मुकुटबन, नवीन हिरापूर, बैलमपूर, मांडवा ही संभाव्य पाणी टंचाईची गावे आहेत. हिरापूर या गावात नळयोजना सुरू आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी पुरवठा ठप्प होणार आहे. या गावांमध्ये पाण्याचा अन्य स्त्रोत नाही.पाटण येथे नदीवरून दिवसातून एकवेळ पाणी पुरवठा सुरू आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी पुरवठा ठप्प होतो. पैनगंगेचे ही पाणी आटण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये पाणी समस्या जटील बनणार आहे. गारगोटी या ५०० लोकसंख्येच्या वस्तीत दोन बोरवेल आहेत. त्यांपैकी एका बोरवेलला पाणी कमी आहे. येथे सोलरपंप होता, तो बंद पडला आहे.झरी येथे आता नगरपंचायत झाली आहे. यापूर्वी ग्रामपंचायत असताना पाण्यासंदर्भात समाधानकारक व्यवस्था न केल्यामुळे आता नगरपंचायती पुढे मोठे आव्हान आहे. १४ व्या वित्तयोजनेअंतर्गत वॉर्ड नंबर ९ ते १७ मध्ये पाईपलाईनचे काम सुरू आहे. वॉर्ड ३,४,८ मधील कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून लवकरच कामाला सुरूवात होईल, असे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पूनम कळम्बे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिरोला हे गाव याच नगरपंचयतीअंतर्गत असून त्या गावचा पाणी प्रश्ना सोडविण्यासाठी मांगुर्ला या गावातून पाईपलाईनने मांगुर्ला येथे पाण्याची व्यवस्था केली आहे.झरी व शिरोला येथे जलशुद्धीकरणाची व्यवस्था गरजेची आहे. त्यासाठी पैनगंगा नदीवरून पाणी पुरवठा करावा लागणार आहे. या संदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे नगराध्यक्ष मंदा सिडाम यांनी सांगितले. यासाठी १० ते १५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.३६ गावांत बोअरवेलचे काम पूर्णपाणी टंचाईची धास्ती घेऊन अडेगाव, डोंगरगावसह एकूण ३६ गावांत १४ व्या वित्त आयोगातून विंधन विहिरी तयार करण्यात येऊन काही प्रमाणात समस्या शिथिल करण्यात आली आहे. मात्र मेमध्ये या गावांनाही पाणी समस्या भेडसावणार आहे. झरी तालुक्यातील दाभाडी, मांडवा ही गावे नेहमी पाणी टंचाईग्रस्त होती. मांडवा या गावाने यापूर्वीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कारदेखील घातला होता. यावर्षी मांडवा या गावात एम.आर.जी.एसअंतर्गत दोन बोरवेल तयार करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये या बोरवेलचे पाणी आटले तर गावाबाहेरच्या विहिरीतला गाळ उपसून त्यातून एखादी टाकी बसवून त्यातून पाणी सप्लाय करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

टॅग्स :Waterपाणी