शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपेरण्या आटोपल्या, पावसाचा पत्ता नाही : साडेसात लाख हेक्टरवरील पिके वाचविण्यासाठी धडपड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत पाच वर्षातील पावसाचा आराखडा पाहिला तर जूनच्या अखेरीस पावसाला प्रारंभ झाला. मात्र यावर्षी जुनच्या पहिल्याच तारखेला पाऊस बरसला. नंतर पावसाने दडी मारली. त्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. यामुळे पीक वाचविण्यासाठी साडेसात लाख हेक्टरवर धडपड सुरू झाली आहे.जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.जिल्ह्यात पूर्वी ८० टक्के क्षेत्र कापसाचे होते. इतर क्षेत्रात संमिश्र पिके घेतली जात होती. पावसाच्या अनिश्चिततेने या पेरणी क्षेत्रात मोठे फेरबदल झाले आहे. अल्पावधीत हाती येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये जंगली जनावर आणि रानडुकरांपासून संरक्षण करता येईल असेच पीक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतले आहे.यामुळे जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत चालला आहे. अशातच बोगस बियाण्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. त्याला पर्यायी पीक नव्याने शोधत आहे.२०१६ ते २०१९ या वर्षात पावसाचे आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. या काळात हवामान खात्याने दरवर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. ऐनवेळी पावसाने उपघडीप दिली. जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. २०१६ मध्ये जूनमध्ये १०९ मिमी पाऊस झाला. हा पाऊस १५ ते २५ जूनच्या सुमारासच बरसला आहे.२०१७ मध्ये १४४ मिमी पावसाची नोंद झाली. मधात काही काळ पावसाचा खंड राहीला. यानंतर पाऊस बरसला. २०१८ मध्ये १५२ मिमी पाऊस झाला. २०१९ मध्ये पावसाचे सर्व गणित बिघडले. सुरूवातीला पाऊस आला. नंतर पाऊसच आला नाही. २५ जूनपर्यंत २१ मिमी पावसाचीच नोंद करण्यात आली. २०२० वर्षामध्ये सर्वात विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. २५ जूनपर्यंत १३४ मिमी पाऊस बरसला.निसर्गाच्या लहरीपणाचाच परिचय पावसाच्या आकडेवारीतून दिसून येतो. कुठल्या वर्षी किती पाऊस प्रारंभीच्या काळात पडेल, याचा नेम राहिला नाही. यातून शेतकऱ्यांच्या पेरणीचे गणित बिघडले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन क रावा लागला आहे.८५ टक्के पेरण्या आटोपल्या सर्वाधिक कपाशीजेमतेम उगविलेली पीक काही भागात दृष्टीस पडत आहेत. कोवळ्या पिकांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यातही कृषी फिडरवर वीज भारनियमन आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. प्रारंभापासून शेतकऱ्यांना या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चार लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आले आहे. दोन लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ९० हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. चार हजार हेक्टरवर मूग तर दोन हजार हेक्टरवर उडिदाची पेरणी झाली आहे. सात हजार हेक्टरवर ज्वारी तर २७०० हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. या सर्व पिकांना पावसाची नितांत गरज आहे. मात्र १२ दिवसांपासून पाऊसच गायब आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस