शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

हजारो शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपेरण्या आटोपल्या, पावसाचा पत्ता नाही : साडेसात लाख हेक्टरवरील पिके वाचविण्यासाठी धडपड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत पाच वर्षातील पावसाचा आराखडा पाहिला तर जूनच्या अखेरीस पावसाला प्रारंभ झाला. मात्र यावर्षी जुनच्या पहिल्याच तारखेला पाऊस बरसला. नंतर पावसाने दडी मारली. त्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. यामुळे पीक वाचविण्यासाठी साडेसात लाख हेक्टरवर धडपड सुरू झाली आहे.जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.जिल्ह्यात पूर्वी ८० टक्के क्षेत्र कापसाचे होते. इतर क्षेत्रात संमिश्र पिके घेतली जात होती. पावसाच्या अनिश्चिततेने या पेरणी क्षेत्रात मोठे फेरबदल झाले आहे. अल्पावधीत हाती येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये जंगली जनावर आणि रानडुकरांपासून संरक्षण करता येईल असेच पीक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतले आहे.यामुळे जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत चालला आहे. अशातच बोगस बियाण्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. त्याला पर्यायी पीक नव्याने शोधत आहे.२०१६ ते २०१९ या वर्षात पावसाचे आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. या काळात हवामान खात्याने दरवर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. ऐनवेळी पावसाने उपघडीप दिली. जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. २०१६ मध्ये जूनमध्ये १०९ मिमी पाऊस झाला. हा पाऊस १५ ते २५ जूनच्या सुमारासच बरसला आहे.२०१७ मध्ये १४४ मिमी पावसाची नोंद झाली. मधात काही काळ पावसाचा खंड राहीला. यानंतर पाऊस बरसला. २०१८ मध्ये १५२ मिमी पाऊस झाला. २०१९ मध्ये पावसाचे सर्व गणित बिघडले. सुरूवातीला पाऊस आला. नंतर पाऊसच आला नाही. २५ जूनपर्यंत २१ मिमी पावसाचीच नोंद करण्यात आली. २०२० वर्षामध्ये सर्वात विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. २५ जूनपर्यंत १३४ मिमी पाऊस बरसला.निसर्गाच्या लहरीपणाचाच परिचय पावसाच्या आकडेवारीतून दिसून येतो. कुठल्या वर्षी किती पाऊस प्रारंभीच्या काळात पडेल, याचा नेम राहिला नाही. यातून शेतकऱ्यांच्या पेरणीचे गणित बिघडले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन क रावा लागला आहे.८५ टक्के पेरण्या आटोपल्या सर्वाधिक कपाशीजेमतेम उगविलेली पीक काही भागात दृष्टीस पडत आहेत. कोवळ्या पिकांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यातही कृषी फिडरवर वीज भारनियमन आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. प्रारंभापासून शेतकऱ्यांना या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चार लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आले आहे. दोन लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ९० हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. चार हजार हेक्टरवर मूग तर दोन हजार हेक्टरवर उडिदाची पेरणी झाली आहे. सात हजार हेक्टरवर ज्वारी तर २७०० हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. या सर्व पिकांना पावसाची नितांत गरज आहे. मात्र १२ दिवसांपासून पाऊसच गायब आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस