शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

१० एकर शेतातील कापसावर चोरट्यांचा डल्ला; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 17:13 IST

रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी १० एकर शेतातील कापूस पिकावर हात साफ केला. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून कापूस चोरीच्या घटना पाहता खेडा खरेदी बंद करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देखेडा कापूस खरेदी बंद करण्याची मागणी

यवतमाळ : मारेगाव तालुक्यात कापूसचोरीच्या घटनांत वाढ झाली असून रविवारच्या रात्री तालुक्यातील सराटी येथील शेतकरी नंदकिशोर सीताराम भोयर यांच्या १० एकर शेतातील कापसावर चोरट्यांनी हात साफ केला. या घटनेने तालुक्यातील शेतकऱ्यांत खळबळ निर्माण झाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या सगळीकडे कापूस वेचणीचा हंगाम जोरात सुरू आहे. सोयाबीनची कापणी व कापूस वेचणीचा हंगाम एकाच वेळी आल्याने मजुरांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सोयाबीनच्या शेंगा झाडाला फुटण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी कापूस वेचणी थांबवून सोयाबीन कापणीला प्राधान्य दिले. त्यामुळे शेतातील कपाशीची बोंडे मोठ्या प्रमाणात फुटून सर्व कपाशीचे शेत चांदण्या रात्रीप्रमाणे पांढरे फटक झाले आहे. कापूस वेचणीला मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने कापूस वेचणीचे दर एक किलो कापसासाठी १२ रुपयांवर गेले आहे. तरीही मजूर मिळणे कठीण झाले आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा कापसाच्या चोरीकडे वळविला आहे.

कापसाचे दरही सध्या खुल्या बाजारात वधारले आहेत. ८ हजारांचा आकडा कापसाने ओलांडला आहे. त्यामुळे कापसाचे महत्त्व वाढले आहे. यातून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी नंदकुमार सीताराम भोयर यांच्या १० एकर शेतातील कापूस पिकावर हात साफ केला. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात खेडा कापूस खरेदी होत असल्याने कापूस चोरी होत असून खेडा खरेदी बंद करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

खेडा कापूस खरेदीवर कार्यवाही करू

तालुक्यात कापूस चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. पेट्रोलिंगमध्ये वाढ करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. तालुक्यात कोणी अनधिकृत खेडा कापूस खरेदी करीत असेल तर कार्यवाही करण्यात येईल.

- राजेश पुरी, ठाणेदार, मारेगाव

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcottonकापूसtheftचोरी